मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आरोग्य विज्ञान विभागातंर्गत अर्थात वैद्यकिय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राज्यात ७०:३० ची प्रवेश पध्दत कार्यान्वित होती. त्यामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी वंचित रहात होते. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता एक महाराष्ट्र एक मेरिट …
Read More »ड्रग घेत असल्याची कबुली देणाऱ्या कंगणाचीही एनसीबीने स्वतःहून चौकशी करावी ! झाशीच्या राणीचा अपमान करणाऱ्या भाजपाने देशाची माफी मागावी आणि राम कदमवर कारवाई करा
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत हीने स्वतःच ड्रग घेत असल्याची एका व्हिडिओमध्ये कबुली दिली आहे. कंगणा मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती अशी विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वाची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने कंगणाची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस …
Read More »मुंबई महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाला केंद्राने दिली वाय दर्जाची सुरक्षा गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली असून ही बाब धक्कादायक असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करत महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचीच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी …
Read More »या विधेयकावरून फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये झाली खडाजंगी हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवारांच्या उत्तराने झाले नाही समाधान
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासंदर्भातील विधेयक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधासभेत मांडले. मात्र त्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेत सध्या हे याप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने त्याबाबतचे विधेयक सभागृहात मांडता येत नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे …
Read More »ठाकरे सरकार पावसाळी अधिवेशनात हे अध्यादेश आणि विधेयके मंजूर करणार ९ अध्यादेश आणि १२ विधेयके मंजूरीसाठी विधिमंडळात ठेवणार
मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे तिसरे अधिवेशनास उद्या सोमवारपासून सुरु होत असून या पावसाळी अधिवेशनात ९ अध्यादेश आणि १२ विधेयके मांडण्यात येणार आहेत. यातील बहुतांष अध्यादेश हे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणूका कोरोनामुळे पुढे ढकलण्यासांदर्भात आहेत. तर विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रम, जीएसटी आदींसंदर्भातील काही अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. याशिवाय राज्यातील जनतेच्या अनुषंगाने …
Read More »विद्यार्थ्यांना दिलासा : सीईटी परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी सामाईक प्रवेश परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ मिळाली असून ०८ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. ज्यांना अर्ज सादर करता आले नाही, त्यांच्यासाठी मोठी सोय होणार असून हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उच्च …
Read More »केंद्रिय मंत्री आठवलेंची मागणी, शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा सूचनेचा निर्णय काँग्रेस आणि शरद पवारांना घेण्याची विनंती
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून …
Read More »परीक्षा घेण्याचा शिक्षण मंत्र्यांचा निर्णय म्हणजे ‘चटावरचे श्राद्ध’ उरकण्यासारखे भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने ना इलाजाने घेतला. परंतु परीक्षा अहवालातील शिफारसींबाबत कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवण्यात आले व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही युवराजांचा अहंकार जपण्यासाठी थातुरमातुर परीक्षा घेण्याचे नाटक केले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे …
Read More »…आणि मनसे धावली शिवसेनेच्या मदतीला कंगनाच्या वक्तव्याला ५ टक्क्याचीही किंमत नाही- संदिप देशपांडे
मुंबई : विशेष प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या मुंबई शहराबद्दल बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हिने असंबध्द वक्तव्य करत प्रसिध्दीचा झोत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या वक्तव्याला ५ टक्क्याचीही किंमत नसताना तिने लावलेल्या जाळ्यात अडकायला शिवसेना इतकी निर्बुध्द नसल्याचे वक्तव्य मनसे नेते संदिप देशपांडे यांनी करत शिवसेनेला …
Read More »अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभाध्यक्षच कोरोना पॉझिटीव्ह नाना पटोले यांनी ट्विट करत दिली माहिती
नागपूर-मुंबई : प्रतिनिधी दोन दिवसांनंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार, आमदाराचे पीएपर्यंत कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असलेल्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र आता दस्तुरखुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे च कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने त्या्ंच्या उपस्थितीशिवाय पावसाळी अधिवेशन होणार का? असा प्रश्न …
Read More »
Marathi e-Batmya