राजकारण

अंबादास दानवे यांचा आरोप, मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएल क्रिकेटमध्ये बेटींग आयपीएल बेटींगच्या संभाषणाचा पेनड्राइव्ह सभापतींकडे सादर

मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत बेटींग संदर्भातील पोलिसांच्या संभाषणाचा पेन ड्राइव्हच सभापतींकडे सादर केला. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील आरोप केला. …

Read More »

फार्मसी एक्झिट परीक्षा शुल्कबाबतचा विषय राज्य शासन जीएसटी कौन्सिलकडे मांडणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) यांच्या अधिसूचनेद्वारे पदविका धारक विद्यार्थ्यांना राज्य फार्मसी कौन्सिलकडे फार्मासिस्ट म्हणून (परवाना करिता) नोंदणी करण्यापूर्वी डिप्लोमा इन फार्मसी “एक्झिट एक्झामिनेशन” ही परीक्षा देणे आवश्यक केले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत असून प्रमाणपत्राकरिता “एक्झिट” परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली …

Read More »

‘एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यरत अधिकाऱ्यांची बदली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार …

Read More »

महात्मा जोतीबा फुले व सावित्रीमाई फुलेंना ‘भारत रत्न’ द्या खासदार वर्षा गायकवाड यांची संसदेत मागणी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले या महान विभूतींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्नने गौरवण्यात यावे, अशी शिफारस करणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने पारित केला, त्याचा आनंद आहे. काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी २०१५ साली फुले दांपत्याला भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी लोकसभेत केली होती. आता केंद्र सरकारने सर्व …

Read More »

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी ५० टक्के सहाय्यक अनुदान शासनाकडून तर उर्वरित ५० टक्के खर्च ग्रामपंचायतीने करावयाचा आहे. त्या अनुषंगाने कमी उत्पन्न व कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे सुलभ व्हावे म्हणून ग्रामपंचायतींना लोकसंख्या  व उत्पन्नानुसार वाढीव साहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन २०२२ पासून सुधारित किमान वेतन …

Read More »

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची विधानसभेची शिफारस विधानसभेत एकमुखी मागणी ठरावः जयकुमार रावल यांनी मांडला ठराव

मागील अनेक वर्षापासून स्त्री शिक्षणाचे उद्गाते आणि पहिली मुलींची शाळा आणि शाळेच्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात यावी अशी मागणी सातत्याने राज्यातील सर्वच स्थरातून करण्यात येत होती. तसेच राज्यातील महायुती सरकारनेही यासंदर्भात राज्यातील जनतेला आश्वासन दिले जात होते. अखेर यासंदर्भात आज …

Read More »

कुणाल कामरा प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन,…कठोर कारवाई करणार स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही

स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विडंबनात्मक गाण्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करणारे वक्तव्य केल्यावरून कुणाल कामरा यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे पक्षाचे अर्जून खोतकर यांनी केली. तसेच मंत्री शंभूराजे देसाई यांनीही याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अपमानजनक शब्द …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शिंदेंचा सरकार, गृहविभागावर विश्वास नाही का? कुणाल कामराने कोणाचेही नाव घेतले नसताना एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी चिडून हल्ला करण्याचे कारण काय?

हास्यकलाकार कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेऊन तोडफोड केली. हल्ला करणारे सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का, त्यांना कायदा हातात का घेतला. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडलेला हा उच्छाद पाहून …

Read More »

एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार, विधानसभेत अभिंदनाचा प्रस्ताव सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज विधानसभेत अभिनंदन परस्पर मांडला. त्याला उपमुख्यमंत्री शिंदे उत्तर देत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. मला आणि माझ्या …

Read More »

त्या गाण्यावरून उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, कामराने अयोग्य केलं नाही शिवाजी महाराजांचा अपमान चालतो अन् गद्दारांचा अपमान चालत नाही

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा त्यांच्या विडंबनात्मक कलेमुळे नेहमीच चर्चेत आला आहे. त्यातच आज कुणाल कामरा याचे महाराष्ट्रातील विद्यमान राजकिय परिस्थितीवर आधारीत आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवरून एक गाणं काल रविवारी संध्याकीळ रिलीज झालं. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच घमासान निर्माण झालं आहे. तसेच राजकिय वर्तुळातही त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या …

Read More »