राजकारण

महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वोदयी हर्षवर्धन सपकाळः कोण आहेत सपकाळ तर विधानसभेच्या काँग्रेस गटनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्विकारून नाना पटोले यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरु झाली होती. तसेच नाना पटोले यांच्याऐवजी यापुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी नव्य़ा व्यक्तीची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आज अखेर बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन …

Read More »

ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून सभासद नोंदणी आणि बक्षिस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास

महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. ” या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे ” या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो …

Read More »

अजित पवार यांनी घेतला ‘पीएमयू’च्या कामाचा आढावा राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी

राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच पुण्यात ‘एम्स’च्या उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान, जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने मृद व जलसंधारण विभागात रूजू झाले ६०१ अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण

राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून झालेली कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्राचे (‍रिमोटद्वारे ऑन लाईन …

Read More »

शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सन्मान, महाराष्ट्रात धुमशान शरद पवार यांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे आले पुढे

मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद गट) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला. शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला पण त्या पुरस्काराच्या सन्मानावरू महाराष्ट्रात मात्र घमासान सुरू झाले. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे? महिनाभरात ८ मृत्यू होऊनही राज्य सरकारला जीबीएस आजाराचे गांर्भीय नाही

राज्यात जीबीएस GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता क्रीडा गणवेश दर्जा, क्रीडा मार्गदर्शक मानधन, प्रशिक्षणार्थी भोजन दरात वाढ करण्याचा निर्णय- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यात, काही सुविधा आवश्यतेनुसार नव्याने कराव्यात,असे निर्देश देत गणवेश दर्जा, प्रशिक्षक मानधन, भोजन दरात वाढ करण्याचा तसेच फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे क्रीडामंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची टीईएएमच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई टेक वीक २०२५ या आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. टेक आंत्रप्रेन्योअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) सोबत झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी मुंबईच्या तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईला ‘आशियाचा एआय …

Read More »

बाल संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’, ‘बालस्नेही पुरस्कार’ची घोषणा महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड्. सुशीबेन शहा यांची माहिती

बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’ आणि ‘बालस्नेही पुरस्कार’ हे दोन उपक्रम राबवले जाणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालक, शिक्षक, पोलिस, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क, समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे असून त्यादृष्टीने राज्य बाल …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा सरकारने न्याय दिला नाही तर लाखो आंबेडकरी जनतेचा ३ मार्चला मंत्रालयाला घेराव

परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली, अनेक निष्पाप नागरिकांना अटक केली. आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यालाही अटक करुन कोठडीत मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला पण सरकारने या प्रकरणी पोलिसांवर …

Read More »