राजकारण

काँग्रेसची मागणी, MPSC ने नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीतील संभ्रम दूर करावा नवा अभ्यासक्रमानुसार २०२५ पासून परिक्षा घेण्याचे प्रसिद्धीपत्र आयोगाने जाहीर करावे

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२३ पासून करण्याऐवजी २०२५ पासून करावी असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. परंतु एमपीएसीने राज्यसेवा परिक्षेसंदर्भात अजूनही या निर्णयाबद्दल स्पष्टपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. दोन दिवसापूर्वी आयोगाने कृषी, वन, अभियांत्रिकी या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने २०२३ पासून होतील असे जाहीर केले …

Read More »

सुप्रिया सुळेंचा सवाल, पंतप्रधानांनी पेन्शनरांना वचन दिले होते काय झाले त्याचे? पंतप्रधान मोदींनी काही राज्य सरकारांनी जूनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सुळे यांनी केली मागणी

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशाला सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे अभिभाषण झाले. या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनी पेन्शनवरून काँग्रेसशासित राज्य सरकारांचे कान टोचत यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असे भाकित केले. त्यामुळे जूनी पेन्शन योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाही विरोधात असल्याचे दिसून आले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …

Read More »

पदुम विभाग म्हणतो व्हॅलेनटाईन डे ला गाईला मिठी.., अजित पवार म्हणाले, मी मिठ्या मारा म्हणालो का? सदसदविवेक बुध्दीला स्मरून योग्य निर्णय घ्या

जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. मात्र या दिवसाला भारतातील एका वर्गाकडून विरोध केला जातो. या वर्षाचा व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असतानाच केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने प्रेमवीरांना सल्ला देत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात …

Read More »

ठाकरे गटाच्या टीकेवर अतुल लोंढे म्हणाले, पटोलेंचा राजीनामा अध्यक्षांच्या सूचनेनुसार मित्रपक्षाच्या निर्णयावर मतमतांतर व्यक्त करणे अयोग्य

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे …

Read More »

वरळीतील सभेवरून अजित पवार म्हणाले, सर्वसामान्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांची जंगी सभा… एकाच वाक्यात उडविली खिल्ली

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरळी येथील जांबोरी मैदानावर कोळी बांधवांकडून जाहिर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भाषण करत असताना काही लोक उठून जात असल्याचा आणि सभेच्या ठिकाणच्या अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचा एक व्हिडिओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला. …

Read More »

डॉ प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची आई म्हणाली, दारूच्या नशेत केलं… सातव यांच्या कोहिनूर बंगल्यासमोर हल्लेखोर महेंद्र डोंगरदिवेच्या आईनी मांडली व्यथा

कोविड काळात काँग्रेसचे दिवंगत आमदार राजीव सातव यांच्या झालेल्या निधनानंतर पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी रात्री हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला. प्रज्ञा सातव यांनी स्वत: या प्रकाराची माहिती दिली आहे. हिंगोलीतील कळमनुरीच्या कसबे धवंडा गावात प्रज्ञा सातव गेल्या असता हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या …

Read More »

डॉ सातव हल्याप्रकरणी नाना पटोलेंचा निशाणा, फडणवीसांची पोलिस दलावर पकड नाही… काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करा

काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नसून काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा …

Read More »

महसूल मंत्री विखे-पाटील यांचे संकेत, शहरी भागातील अकृषिक कर माफ होणार शहरी भागातील निवासी, औद्योगिक आणि वाणिज्यिक जमीनीवरील अकृषिक कर

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 नुसार नागरी क्षेत्रातील अकृषिक आकारणीचा प्रमाणदर ठरविण्यात येत असतो. निवासी, औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनाकरिता वापरण्यात येणाऱ्या जमिनींवरील अकृषिक कर घेण्यात येतो. मात्र, शहरी भागातील जमीनधारकांसाठी अकृषिक कर माफ करण्यासंदर्भातील मागणीचा विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण …

Read More »

अंबादास दानवेंचा आरोपः आदित्य ठाकरेंवरील हल्याप्रकरणी पोलिसांचा गाफीलपणा पोलिस महासंचालकांकडे केली तक्रार

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात झालेल्या दगडफेकीमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला असून . स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत गाफीलपणा केल्याचा तक्रार त्यांनी पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे आदित्य ठाकरेंच्या दिशेने आलेले दगड जणू कुणीतरी त्या लोकांच्या हातात आणून …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा करा शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळया हत्या करण्यात आली आहे. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा बनाव करण्यात आला परंतु ही हत्या असल्याचे उघड झाले आहे. पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. यासंदर्भात …

Read More »