नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असे विधान केले. त्यावरून भाजपाने अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सावरकर आणि गोळवलकर गुरूजी यांच्या पुस्तकातील संदर्भ देत …
Read More »अध्यक्षा चाकणकरांना चित्रा वाघ यांचा खोचक सवाल, आयोग पण बेफाम झालंय का? उर्फी जावेद यांच्यावर सु-मोटो कारवाई करायला वेळ नाही का?
‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली. यावरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केलं होतं. मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. …
Read More »मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या धर्माचे राजकारण करण्याऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कोण गुंतवणूक करेल? !:- नाना पटोले
महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर …
Read More »अजित पवारांचे समर्थन करणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे समर्थन सामनाने केले. मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्या सामनात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पालघर येथे केली. पालघर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात असताना पत्रकार परिषदेत …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, या मागण्यांवर एकमत, वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे ४० हजार कर्मचारी पुन्हा कामावर हजर होणार
राज्यातील ८६ हजार कर्मचारी, अभियंते व अधिकारी तसेच ४० हजाराच्या वर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी ३.१.२०२३ रोजीच्या मध्यरात्री पासून ३१ कामगार संघटना ७२ तासाच्या संपावर गेले होते. संपकऱ्यांच्या प्रतिनिधीशी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर लेखी स्वरूपात कार्यवृत्त दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. राज्यातील विज …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कवाडेंचा लाँग मार्च योग्य ठिकाणी येऊन थांबला अखेर गटाची कवाडेंच्या पीआरपीसोबत युती बाळासाहेबांची शिवसेनेशी युती
शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाची अर्थात पीआरपी आज युती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीआरपीचे प्रमुख प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार …
Read More »अजित पवार म्हणाले, मी युक्तीवाद करणार नाही विरोधी पक्षनेते पद भाजपाने नव्हे तर राष्ट्रवादीने दिले
हिवाळी अधिवेशन काळात संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून अधिवेशन संपताच भाजपाने अजित पवार यांना लक्ष्य करत त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. त्याचबरोबर भाजपाकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणीही केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मंगळवारी वाद संपविण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर आज बुधवारी विरोधी …
Read More »ईडीकडून अखेर साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची संपत्ती जप्त अनिल परब यांची १०.२० कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केल्याचे प्रसिध्द पत्रकान्वये दिली माहिती
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आरोप केले. त्यानंतर ईडीने अनिल परब यांची दोन ते तीन वेळा चौकशी केली. परंतु त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली नाही. अखेर आज ईडीने अनिल परब यांची साई रिसॉर्टसह १० कोटी २० लाख …
Read More »अजित पवार म्हणाले,… पण आजही मी स्वराज्य रक्षक भूमिकेवर ठाम महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपाच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी आंदोलनाचे षडयंत्र...
‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपाच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून माझ्याविरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, धारावी प्रकल्पानंतर वीज कंपनीही अदानीच्या घशात शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस काढला आहे का ?
महावितरण कंपनीवर खाजगी कंपन्यांचा डोळा असून या कंपनीचे खाजगीकरण होऊ नये म्हणूनच राज्यातील वीज कंपन्यांचे कर्मचारी संपावर गेले. महावितरण ही महत्वाची तसेच फायद्यात असलेली कंपनी अदानीसारख्या खाजगी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव आहे. महावितरणचे खाजगीकरण सुलभ व्हावे यासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची राज्याच्या आर्थिक सल्लागार मंडळावर निवड केल्याचे दिसत असून शिंदे-फडणवीस …
Read More »
Marathi e-Batmya