राजकारण

नाना पटोलेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला ? ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे ही भाजपाची खेळी

पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असा खोचक सवाल करत काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे मुलभूत प्रश्न महत्वाचे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः शिंदे विरूध्द ठाकरे प्रकरणात नाबिया निकालाचे मापदंड नाही ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण उद्या शिंदे गटाकडून युक्तीवाद

शिवसेनेतील बंडखोरीप्रकरणी आणि विधासभा उपाध्यक्षाच्या विरोधात आणलेला अविश्वासाच्या ठरावाच्या अनुषंगाने सध्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी सुरु आहे. उध्दव ठाकरे गटाने केलेल्या मागणीनुसार ७ सदस्यीय खंडपीठाकडे सरदची याचिका पाठवावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर सध्या नेमण्यात आलेल्या ५ सदस्यीय घटनापीठासमोर दोन्ही गटाना बाजू मांडण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज सुनावणी दरम्यान ठाकरे …

Read More »

गोध्रा दंगलप्रकरणी मोदींच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बीबीसीवर छापेमारी दिल्लीतील बीबीसी कार्यालयावर आयकर विभागाने केली कारवाई

गुजरातच्या मुख्यमंत्री पदी नरेंद्र मोदी असताना २००२ साली गोध्राकांड घडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक डॉक्युमेंटरी “इंडिया- द मोदी क्वेश्चन” ही काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत्तवाहीनीने प्रसारीत केली. त्यावेळी बीबीसीने प्रसारीत केलेली ही डॉक्टमेंटरी सोशल नेटवर्कींग साईटसवरून काढून टाकाली असे निर्देश केंद्र …

Read More »

फडणवीसांच्या त्या दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, अजून ते झोपेतून उठले नाहीत… पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांशी बोलूनच निर्णय फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचा पलटवार

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अडीच वर्षापूर्वी पहाटेच्या शपथविधीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे सांगत पुन्हा एकदा राजकारणात गोंधळ उडवून दिला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याबाबत अडीच वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा आता काय संबध असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, भारतीयांना हिंदूत्व म्हणजे काय ? याचे उत्तर हवेय केवळ एकमेकांचा द्वेष म्हणजे हिंदूत्व नव्हे

भाषा कुठलीही असो मनं मिळायला हवीत. जो संवाद होतो तो ह्दयातून असायला हवा. मन मिळाली की मार्ग स्पष्ट होतो. मी आता हिंदीतून बोलातोय, पण मला खात्री आहे माझ्या हिंदी पेक्षा तुमची मराठी अधिक उत्तम असेल. पिढ्या न पिढ्या तुम्ही इथे आहात. हा मेळावा नव्हे बैठक. मेळाव्यासाठी मैदान अपुरे पडेल. परिचयाची …

Read More »

संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा व धवल सेवाध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात संत सेवालाल महाराज यांचा २१ फुट उंच पंचधातुच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि १३५ फुट उंच धवल रंगाच्या सेवाध्वजाची स्थापना रिमोट कंट्रोलद्वारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व …

Read More »

राष्ट्रपती मुर्मु यांनी महाराष्ट्रासह या १३ राज्याच्या नव्या राज्यपालांची केली नियुक्ती राज्यपाल कोश्यारी यांच्यासह १३ राज्यपाल पदमुक्त

मागील महिन्यात आपल्याला पदमुक्त करावे अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यानंतर दुसरा महिना उजाडला तरी त्यावर केंद्र सरकारने निर्णय न घेतल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या कृतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाराजी दाखवून दिली. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर …

Read More »

फडणवीसांच्या आरोपाला भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर, म्हणूनच त्यांच्या मनात अटकेची भीती चर्चाच नव्हती पण कोठे तरी काही तरी घडलं असावं

आगामी महापालिका निवडणूका आणि त्यानंतर होणार असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय धोरण ठरविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक नाशिक येथे पार पडली. या बैठकीत पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप करताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने भाजपा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. …

Read More »

काँग्रेसची टीका, राजीनामा मंजूर करून केंद्राने कोश्यारींचा सन्मान केला तर महाराष्ट्राचा अवमान कोश्यारींच्या पापाची फळे भाजपाला भोगावी लागतील

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारीच्या आडून भारतीय जनता पक्षाने सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली …

Read More »

पत्रकार वारिशे हत्याप्रकरणी संजय राऊतांनी ट्विट करत केला या नेत्यांकडे अंगुली निर्देश हत्येसाठी वापरण्यात आलेल्या गाडीवर कंपनीचा लोगो तर कंपनीसाठी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर साधला निशाणा

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शशिकांत वारिशे यांचा रत्नागिरीतील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरीला विरोध होता. याबाबतच्या अनेक बातम्या त्यांनी दिल्या होत्या. याच कारणामुळे शशिकांत वारिशे यांना चिरडून मारण्यात आलं, असा संशय विरोधी पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच अंगणेवाडीत झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »