कोरोना मृत्यु लपवल्याबद्दल केंद्रातले मोदी सरकार आणि गुजरात राज्य सरकार मोठे बदनाम झालेले आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सुद्धा कोरोना मृत्यु लपवल्याची माहिती सरकारच्याच आकडेवारीतून उघड झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोरोना बळी लपवलेले नाहीत हा दावा पूर्ण खोटा पडला आहे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात ७८ लाख ८१ …
Read More »माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने सोडून दिले तब्बल ३१ वर्षानंतर पेरारिवलन तुरूंगाबाहेर येणार
निवडणूक प्रचाराच्या दरम्यान माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लिट्टेच्या आत्मघातकी पथकाने बॉम्बस्फोट घडवून आणत जीवे मारले. त्यावेळी राजीव गांधी यांच्या मृतदेहाचे इतक्या चिंधड्या उडाल्या होत्या की, त्यांच्या शरीराचे अवयव शोधावे लागले होते. या कटातील एक आरोपी ए जी पेरारिवलन यास आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने सोडून देण्याचा निकाल दिला. त्यामुळे ३१ …
Read More »न्यायालयाने निकाल फिरविला; आरक्षणासह निवडणूका घ्या, मध्य प्रदेशला आदेश पण ५० टक्क्यांपेक्षा टक्केपेक्षा जास्त असू नये
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्याचे मध्य प्रदेश सरकारला १० मे रोजी दिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश स्वतःच फिरवत आता आरक्षणासह निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. तसेच सदरचे आरक्षण ५० टक्के पेक्षा जास्त नसावे असेही स्पष्ट केले. त्यामुळे मध्य प्रदेशातील निवडणूका ओबीसी आरक्षणासह होणार असल्याचे स्पष्ट झाले. काही महिन्यांपूर्वी …
Read More »ज्ञानवापी मस्जिदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय, ते ठिकाण फक्त… मुस्लिम समुदायांना प्रार्थनेसाठी येण्या-जाण्यास परवानगी द्या
वाराणसी येथील ज्ञानवापी मस्जिदीच्या सर्व्हेक्षण प्रकरणी मुस्लिम समुदायाने उच्च न्यायालयात धाव घेत सर्व्हेक्षणाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम समुदायाची मागणी फेटाळून लावत म्हणाले, की जे शिवलिंग सापडले आहे. तेवढे संरक्षित करा आणि मुस्लिम समुदायाला प्रार्थनेसाठी येण्या-जाण्यास परवानगी द्या असे निर्देश दिले. त्यामुळे हा विषय आणखीनच चिघळला. …
Read More »अधिकारी संघटनेची मागणी: महसूलसह सर्व विभाग स्टेट केडरमध्ये समाविष्ट करा चेन्नई उच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने निर्णय घेण्याची मंत्रालयीन अधिकारी संघटनेची मागणी
महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य स्थापना झाल्यापासून स्वंतत्र प्रशासकिय यंत्रणा निर्माण करण्यात आली. मात्र या प्रशासकिय यंत्रणेत येणाऱ्या सर्व विभागांना स्टेट केडर म्हणून मान्यता अद्याप मिळाली नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या उपजिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी पदेच आणि इतर जे राज्य सरकारला वाटेल त्या विभागातील समकक्ष पदावरील व्यक्तींना केंद्रीय सेवेत अर्थात …
Read More »लक्ष्य सेन, चिराग, सात्विक, किदांबीने १४ वेळचा इंडोनेशियाचा इतिहास मोडला पहिल्यांदाच भारताला बॅडमिटनमध्ये थॉमस कप
थॉमस कप स्पर्धेत १४ वेळा विजेते पटकाविणाऱ्या इंडोनेशियाच्या खेळाडूंना एकेरी आणि दुहेरी अशा तीन बॅडमिटन स्पर्धेत पराभूत करत पहिल्यांदाच लक्ष्य सेन, सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि किदांबी यांनी विजय मिळवित भारताच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला. त्यामुळे इंडोनेशियाच्या ताकदवर खेळाडूंना पराभूत करत एकप्रकारे इतिहासही घडविला आहे. भारताने रविवारी सलग तिसऱ्या सामन्यात …
Read More »शरद पवारांनी ऐकवलेली ‘पाथरवट’ कविता वाचली का? वाचण्यासाठी क्लिक करा विद्रोही कविता म्हणून त्याकाळी गाजलेली जवाहर राठोड यांची कविता खास वाचकांसाठी
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात धर्माच्या नावावरील राजकारणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसिध्द कवी जवाहर राठोड यांची ‘पाथरवट’ ही कविता वाचून दाखवित धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना अप्रत्यक्ष चपराक लगावली. त्यातच हा कवितेवरून भाजपाकडून शरद पवारांचा तो व्हिडिओ शेअर करत …
Read More »ताज महल कोणी बांधला हे ठरविण्यासाठी आम्ही इथे बसलोय का? अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारत याचिका फेटाळून लावली
मागील काही दिवसांपासून उत्तर भारतात ताज महल हा हिंदू मंदिरावर बांधण्यात आल्याचा अपप्रचार भाजपाकडून जाणीवपूर्वक पसरविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या अयोध्या येथील प्रसारमाध्यमाचे प्रमुख डॉ.रजनीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करत भारतीय पुरातत्व विभागाला याबाबत आदेश देण्याची मागणी केली. मात्र आम्ही ताजमहल कोणी बांधला हे ठरविण्यासाठी इथे …
Read More »देशद्रोह कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीः केंद्राचा अंतिम निर्णय होईपर्यंत केंद्राकडून पुर्नविलोकन होत नाही तो पर्यंत कोणतीही सुनावणी नाही
ब्रिटीशकालीन देशद्रोह कायद्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा करत हा कायदा ठेवणार की त्याचे पुनर्विलोकन करणार असा सवाल केला होता. त्यावेळी सुरुवातीला केंद्र सरकारने पुनर्विलोकनाची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र पुन्हा त्यास ४८ तास पुर्ण होण्याआधीच पुन्हा केंद्र सरकारने देशद्रोह अर्थात १२४ ऐ या कायद्याचे पुनर्विलोकन करण्याची …
Read More »भाग २: कोणत्याही परवानग्या नसताना मंत्री चंद्रकांत पाटील यांची ज्ञानेश्वरीवर मेहेरनजर कोणतेही परवानग्या नसताना शासन जमा केलेली पुन्हा दिली
पुण्यातील येरवडा येथील ५ एकरचा शासकिय भूखंड महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेकडून काढून घेतल्यानंतर तो भूखंड ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेला २००७ मध्ये देण्यात आला. त्यानंतर २०१९ पर्यत या संस्थेने त्या जमिनीवर कोणतेही काम केले नाही. तसेच कॅगने ठेवलेल्या ठपक्याच्या आधारे आणि २०१७ च्या शासन निर्णयानुसार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो भूखंड पुन्हा …
Read More »
Marathi e-Batmya