Tag Archives: केंद्र सरकार

केंद्र सरकारचे कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला चर्चेचे आमंत्रण तुमच्या सोयीने आणि वेळेनुसार सरकार चर्चेस तयार असल्याची मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

२० जुलैच्या आंदोलनादरम्यान झालेल्या “पोलिसांच्या क्रूरते” विरोधात कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) उद्या शुक्रवारी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले असताना, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या मोठ्या प्रयत्नात केंद्र सरकारने गुरुवारी त्यांना त्यांच्या “सोयीनुसार” आणि “कोणत्याही वेळी” चर्चेसाठी पुन्हा आमंत्रित केले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले की, सरकारने गेल्या २४ तासांत “आमच्या …

Read More »

सोनम वांगचुक यांचा सरकारला आंदोलनातून बाहेर पडण्यासाठी तीन मार्गी पर्याय नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळतेय

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला जर कोणी केंद्रबिंदू म्हणून एकत्र धरून ठेवले असेल, तर ते सोनम वांगचुक आहेत. लडाखमधील या कार्यकर्त्यांने या आंदोलनाला बळ देण्यासाठी आठवडेभर अन्नाचा त्याग केला आहे. केंद्र सरकारला जर कशाची चिंता वाटत असेल, तर ती बेमुदत उपोषणावर बसलेल्या वांगचुक यांची आहे. त्यांचे उपोषण सोडवल्यास या समस्येवर …

Read More »

तृणमूलच्या बंडखोर खासदारांची स्वतंत्र आसन व्यवस्थाः इंडिया आघाडी बैठकीतून बाहेर सर्वपक्षिय बैठकीतून इंडिया आघाडीचे सर्व सदस्य बाहेर पडले

बंडखोर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदारांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्थेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, इंडिया आघाडीच्या खासदारांनी बैठकीतून सभात्याग केल्याने रविवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्राच्या सर्वपक्षीय बैठकीत मोठा नाट्यमय प्रसंग घडला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिशिष्टात बोलावलेल्या या बैठकीत, सरकारच्या कायदेविषयक अजेंड्यावर आणि आगामी अधिवेशनात चर्चेत राहण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश ही गंभीर घटनात्मक चिंता केंद्र सरकारच्या निर्णयावर केली टीका

एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करणे हे गंभीर घटनात्मक चिंता निर्माण करते आणि समाजावरील याच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करते, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती पूर्णपणे नाकारली होती. त्यांचे असे मत …

Read More »

केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या तयारीसाठी किसान सभेची बैठक राष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाच्या नियोजनासाठी मुंबईत बैठक

अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची राष्ट्रीय बैठक मुंबई येथील वायएमसीए YMCA इंटरनॅशनल हाऊस, मुंबई येथे २८ व २९ जून २०२६ रोजी दोन दिवस संपन्न होत आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सरचिटणीस विजू कृष्णन, उपाध्यक्ष खासदार आमरा राम, माजी खासदार हनन मोला, पी. कृष्णप्रसाद, …

Read More »

राज्यमंत्री योगेश कदम यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रात समान नागरी कायदा तीन तलाक लक्षवेधी सुचनेवरील चर्चे दरम्यान दिली माहिती

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन तलाक कायद्यातील प्रश्नी विधानसभेत आज चर्चा झाली. या चर्चेवेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी लक्षवेधीच्या मेरिटला आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ही संभ्रमात पडल्याचे चित्र विधानसभेत पाह्यला मिळाले. तसेच राष्ट्रवादीच्या …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा द्या मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलने कमी झाला

मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलने कमी झाला आहे. केंद्र सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने कपात करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी याबाबत सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी द्या केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली प्रभावी बाजू

महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली. या खाणी राज्य शासनाला मिळाल्यास दोन वर्षात कार्यान्वित करून २०३० पर्यंत उत्पादन सुरू करून पुढील काळात स्टील …

Read More »

जयराम रमेश यांची टीका, तो एक फालतू युक्तीवाद निकोबार जंगलतोडची भरपाई हरियाणामध्ये भरून काढणार

निकोबारमधील जंगलतोड करून हरियाणामध्ये काही प्रमाणात भरपाई म्हणून वृक्षारोपण करून त्याच्या पर्यावरणीय परिणामाचे व्यवस्थापन करता येईल, हा एक फालतू युक्तिवाद आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी शुक्रवारी (५ जून, २०२६) बंगळूरु येथे ‘द हिंदू हडल’चा म्हणून आयोजित ‘अरवली पर्वतरांगांपासून निकोबारपर्यंत: पर्यावरणाच्या उंबरठ्यावर’ या सत्रात बोलताना …

Read More »

सुप्रिया सुळे यांची माहिती, केंद्राच्या अहवालानुसार पुणे क्राईमच्या बाबतीत देशात ५ व्या क्रमांकाचे शहर पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का?

केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रिया …

Read More »