Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची विधानसभेसाठी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर ६ नव्या चेहऱ्यांना संधी, ३२ विद्यमान आमदारांना संधी त्यामध्ये ९ मंत्र्यांचा समावेश...

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये विद्यमान ३२ आमदारांना आणि नव्या ६ जणांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित उमेदवारांची यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अर्जुनी मोरगाव येथून राजकुमार बडोले, इगतपुरीमधून हिरामण …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या सना मलिक-शेख अणुशक्तीनगरमधून लढणार… लवकरच उमेदवारी अर्ज भरणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक – शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. अनुशक्ती नगरमधून विद्यमान आमदार नवाब मलिक हे प्रतिनिधित्व करत होते. आता नवाब मलिक यांच्या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सना मलिक-शेख या आता उमेदवारी अर्ज भरत निवडणूकीला …

Read More »

नांदगाव -मनमाडमधील सुहास कांदेंच्या उमेदवारीला अजित पवाराच्या कार्यकर्त्यांचा विरोध जागा राष्ट्रवादीला घ्या किंवा उमेदवार बदला राष्ट्रवादीची मागणी

नांदगाव – मनमाड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदारांच्या उमेदवारीला विरोध वाढत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी थेट अजित पवार यांचे निवासस्थान गाठत आपली कैफियत मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा देण्यात यावी या मागणीसाठी जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्ते देवगिरी या …

Read More »

भाई जगताप यांची मागणी, बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षिततेतील त्रुटींची चौकशी करा महायुतीच्या काळात मुंबई ‘गुन्हेगारीत’ पुढारलेलं शहर

बदलापूरच्या घटनेत ताब्यात असलेल्या आरोपीला गोळ्या घालणारे पोलीस बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली तेव्हा कुठे होते, असा सवाल करत या प्रकरणाची चौकशीची मागणी करत महायुतीच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, मुंबई शहर तर ‘गुन्हेगारीत’ दुसऱ्या क्रमांकावर आलं असल्याचा घणाघातही भाई जगताप यांनी केला. मुंबई काँग्रेसमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईसह महाराष्ट्र जंगलराज बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या ही महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना

राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या लोकप्रतिनिधीला वांद्र्यासारख्या भागात खुलेआम गोळ्या घातल्या जातात ही गंभीर बाब आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे कुठे? असा संतप्त सवाल करत भाजपा-शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईसह महाराष्ट्र …

Read More »

अजित पवार यांचा इशारा, बाबा सिद्दीकींच्या हत्यारांना शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही या भयावह घटनेचे राजकारण करू नये अजित पवार यांचे आवाहन

पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला. अजित पवार आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये म्हणाले की, अनेकांचे मनापासून प्रेम करणारे नेते बाबा सिद्दीकी यांच्या दु:खद निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस उद्ध्वस्त झाली आहे …

Read More »

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, हत्येची जबाबदारी बिष्णोईने घेतली? कायदा आणि सुव्यवस्थेवरून महाविकास आघाडीने केली टीका

वांद्र्यांचे माजी आमदार मंत्री बाबा सिद्धीकी यांच्यावर काल अज्ञात मारेकऱ्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांना तातडीने लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी कूपर रूग्णालयात हलविले. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

३२ लाख परिक्षार्थींच्या प्रश्नी शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित मागितली वेळ स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थ्यांच्या असंतोषातून मार्ग काढण्यासाठी लिहिले पत्र

राज्यातील जळपास ३२ लाख परिक्षार्थी विविध स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी अहोरात्र अभ्यास करतो. मात्र या परिक्षार्थींच्या परिक्षा वेळेवर होत नाहीत की, झाल्यातर त्याच्या नियुक्त्या वेळेत होत नाहीत, तसेच परिक्षाच्या तारखा प्रलंबित राहणे आदी प्रश्नी परिक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होत आहे. या असंतोषातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका,… अराजक पसरवण्याचे ‘मविआ’ चे कारस्थान काँग्रेसने शिवाजी महाराजांच्या केलेल्या अवमानाबद्दल राहुल गांधी बोलणार का ?

महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणेघेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. काँग्रेसचे शिवरायांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, असा हल्लाबोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना परखड सवालही करत …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, जागवाटपाची चर्चा अद्याप नाही, पण मुख्यमंत्री पदाचा… काहीही झालं तरी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूकांना सामोरे जाणार

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढविण्यावरून रस्सीखेच सुरु असतानाच मुख्यमंत्री पदावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यावरून शिवसेना उबाठा गटाकडून आग्रह असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सावध भूमिका मांडली …

Read More »