Tag Archives: काँग्रेस

राहुल गांधी आणि पीएमओ मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात चर्चा, पण ठिय्या आंदोलन सोडण्यास नकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकिय निवासस्थानाबाहेर पोलिसांचे आगमन

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, जनतेला होणाऱ्या गैरसोयीचे कारण देत आणि ते ठिकाण आंदोलनासाठी निश्चित केलेले नसल्याचे सांगून, प्रशासनाने राहुल गांधी यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील धरणे आंदोलन संपवण्याची विनंती केली. जितेंद्र सिंह म्हणाले की, नीट (NEET) आणि सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यास …

Read More »

राहुल गांधी यांची मागणी, लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी आपला मुर्खपणा थांबवावा, हे काय चालले आहे असा सवालही यावेळी केला

ग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी या कृत्याला ‘अभारतीय’ म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संतप्त दिसले आणि त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जे काही …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह खासदारांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सीजेपीच्या नेतृत्वाखालील तरूणांच्या मोर्चावर हल्ला पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावरून मोदींच्या राजीनाम्यासाठी आंदोलन

नुकतेच काल बुधवारी कॉकरोच जनता पक्षाच्या अर्थात सीजेपीने काढलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, मंगळवारी नवी दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे अनेक खासदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धरणे आंदोलन केले. …

Read More »

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद संसदेत, ५ पेक्षा जास्त वेळा तहकूब लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित

सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर कॉकरोच जनता पार्टीने काढलेल्या मोर्चाचे पडसाद संसदेत उमटले. त्यातच विद्यार्थी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे संसदेत शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेत केली. राज्यसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मागणी करताच उपसभापतींकडून संसदेचे कामकाज स्थगित केले …

Read More »

प्रविण सहानी यांची माहिती, बदलत्या समीकरणात भारताला फार स्थान नाही, पाकिस्तानचा दबदबा मात्र वाढणार चीन, रशिया व अमेरिकेशी चांगले संबंध असणारा पाकिस्तान एकमेव देश

अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धानंतर जगाचे समिकरणच बदलले जाणार आहे. जग आता दोन शक्तीमध्ये विभागलेले राहिले नाही तर जग आता बहुधृवीय झाले आहे आणि त्याची सुरुवात २०१३ पासूनच झालेली आहे. अमेरिकेने महायुद्ध व शीतयुद्ध जिंकले आहे पण जग आता पूर्णपणे बदलले आहे, जगाचे नेतृत्व बदलले आहे. रशिया, चीन अमेरिकेबरोबर इतर शक्तीही …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पण नरेंद्र मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही? रा. स्व. संघ व मुख्यमंत्री यांच्यात हिम्मत असेल तर ठाकरेंच्या रामरक्षा कार्यक्रमास जावे; राम मंदिरातील चोरीस भाजपा-आरएसएसच जबाबदार

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे मुद्दे व काँग्रेस पक्षाचे मुद्दे सारखेच असून काँग्रेस पक्षाने वांगचुक यांच्या आधीपासूनच नीट परीक्षेचा मुद्दा हाती घेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दोघांचा लढा एकाच मुद्द्यासाठी, त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांची भेट का घेतली नाही, यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांगचुक यांची अद्याप भेट का घेतली नाही? शिक्षण …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप,… पण सरकार व रेल्वे प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत मुंबई लोकल प्रवास रामभरोसे, प्रवाशांवर हल्ले, खून, मारामाऱ्या, महिला अत्याचारांत वाढ

मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक व चिंताजनक बनला आहे. लोकलमध्ये चाकू हल्ला, खून, मारमारी, महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झालेली दिसत आहे. लोकल प्रवास सुरक्षित राहिलेला नाही. आधीच लोकलमधील गर्दीमुळे लोंबकळत प्रवास कारावा लागत असताना आता वाढलेल्या हिंसक घटनामुळे लोकल प्रवास रामभरोसे झाला आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे व्यवस्थापन व राज्य सरकार कोणालाही प्रवाशांची …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, वीजबील माफी शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी एमएसईबी अदानीला आंदण देण्याचा डाव

शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप कर्जमाफी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे. वीज बील माफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर लाडका उद्योगपती अदानीसाठी केलेली आहे. भाजपा सरकारला …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही देशाचा कारभार ‘बंच ऑफ थॉट’नुसार चालतो; दिल्लीतील सरकार ‘हम दो, हमारे दो’साठी; शेतकरी प्रश्न, महागाई, बेरोजगारीवर पंतप्रधान मोदी गप्प

मागील १२ वर्षापासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी पार्श्वभूमी आपल्या देशाला लाभली असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतमालाला भाव नाही, शेती करणे महाग झाले आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र शेतकरी, महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई यावर गप्प आहेत. अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी सरेंडर झाल्याने आता आपला …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, राम मंदिरावर दरोडा टाकणाऱ्यांना संघातून निष्काशित करण्याची हिम्मत आरएसएसने दाखवावी राज्यात दुबार पेरणीचे संकट, दुष्काळाशी मुकाबला करण्याचे सरकारचे नियोजन नाही, बोगस बियाणांप्रमाणे बोगस सरकारचा बोगस कारभार

अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिरातील देणगीवर दरोडा टाकून भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे. दरोड्यावर आता आरएसएस मधून नाराजी व्यक्त केली जात आहे पण नाराजी व्यक्त करून काही फायदा नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हिम्मत असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामाच्या नावावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या संघाशी संबंधित सर्वांना …

Read More »