मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला …
Read More »आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा आकाशवाणी आमदार निवासमधील कॅन्टींनमधील वेटरला मारहाण
शिळे आणि वास येणारे अन्न दिल्यावरून एसशिंचे आमदार संजय गायकवाड यांनी टॉवेलवर कॅटींनमध्ये येत वेटरला मारहाण केली. त्यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटले. विरोधकांनी याविषयीचा मुद्दा विधिमंडळाच्या विधान परिषदेत लावून धरला. त्यानंतर याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांना योग्य ती कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »मुद्दा मराठी माणसाच्या हक्काच्या घराचाः पण शिवसेनेच्या दोन गटात गद्दारीवरून रंगला वाद अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात गद्दारीवरून एकमेकांना धमकी
मागील काही दिवसांपासून मराठी -अमराठीचा वाद सातत्याने चांगलाच रंगला आहे. त्यातच मराठी माणसांना मुंबईतील विविध सोसायट्यांमध्ये घरे नाकारण्याचा प्रकारातही चांगलीच वाढ होत आहे. या मुद्यावरून आज विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच शाब्दीक वाक्ययुद्ध रंगल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विधान परिषदेत यासंदर्भात शिवसेना उबाठाचे …
Read More »संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदेंकडून कडक शब्दांत समज रितसर तक्रार करता आली असती, मारहाणीचे समर्थन करणार नाही
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांना समज दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, पण …
Read More »मंत्रीच आमदाराला मंत्री म्हणून संबोधतो तेव्हा…. सॉरी म्हणत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मागितली माफी
विधिमंडळाच्या कामकाजात तसे पाह्यला गेले तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि कधी खडाजंगीमुळे वातावरण तप्त होते. तर कधी अनेकां आमदार, मंत्री किंवा दोन पक्षामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे विधिमंडळातील वातावरण क्षुब्ध पाहिल्याचे आपण अनेकांनी पाहिले असेल. मात्र रोजच्या कामकाजाच्या मानसिक गोंधळामुळे सत्ताधारी पक्षातील एक मंत्री दुसऱ्या सत्ताधारी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहंचे गुलाम महाराष्ट्राला लागलेला गद्दारी व लाचारीचा कलंक
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, असा …
Read More »१२ वर्षानंतर बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण अर्थात बार्टी संस्थेत मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहे. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, …
Read More »विनायक राऊत यांची मागणी, एकनाथ शिंदे, उदय सामंत, निलेश राणे यांच्यावर कारवाई करा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी करण्याची केली मागणी
न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावून जाहिर कार्यक्रम, जाहिर सभा घेऊ नये घेता येत नसताना कुडाळ येथे रात्री १० नंतर जाहिर सभा घेतली. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असून या अवमानप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते विनायक राऊत यांनी …
Read More »संजय निरूपम यांची स्पष्टोक्ती, वक्फ आणि मंदीराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न चुकीचा विचारांपासून दूर गेलाला उबाठा पक्षच कृत्रिम झालाय
बाळसाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेला आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडणारा उबाठा पक्षच कृत्रिम झालाय, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय निरुपम पुढे म्हणाले की, उबाठा गटाने बाळासाहेबांचे भाषण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धीमत्ता) वापर करुन दाखवले. पण खरतर उबाठा …
Read More »आशिष शेलार यांची घोषणा, पुनर्विकासित कामाठीपुराला नामदेव ढसाळ नगर नाव सार काही समष्टीसाठी कार्यक्रमात केली घोषणा
ज्या कामाठी पुरातील व्यथा वेदना कवी नामदेव ढसाळ यांनी मांडल्या त्या कामाठी पुराच्या पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागात उभी राहिल तेव्हा या भागाला महान कवी नामदेव ढसाळ नगर असे यांचे नाव दिले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी कल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. …
Read More »
Marathi e-Batmya