Tag Archives: bjp

नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी, संध्याकाळी ६ वाजता होणार शपथविधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केला सत्तास्थापनेचा दावा

लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर सर्वाधिक जागा एनडीएला मिळाल्या. त्यानंतर एनडीएची बैठक आज संसदेत बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या सर्व सदस्यांनी एकमताने लोकसभा सभागृहाच्या नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड केली. त्यानंतर एनडीएच्या सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनीही नरेंद्र …

Read More »

मनसेने पुन्हा घेतली निवडणूकीच्या रिंगणातून माघार अभिजित पानसे पुन्हा अर्ज काढून घेणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला पाठिंबा जाहिर करत पक्षाच्यावतीने उमेदवारही उभे केले नाहीत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीतही राज ठाकरे यांनी उमेदवार न देता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला …

Read More »

भाजपाकडून एनडीएतील सहकाऱ्यांसाठी आखली सीमारेषा चंद्राबाबू नायडू आणि नितीनकुमार यांना हवे असलेल्या मंत्री पदाबाबत नकारघंटा

चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड (जेडीयू) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आले आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदांची मागणी केली आहे. तथापि, भाजपा आपल्या मित्रपक्षांना काही प्रमुख पदे सहजासहजी स्वीकारू शकत नाही आणि संरक्षण, वित्त, गृह …

Read More »

राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप, मोदी, शाह यांनी ३० लाख कोटींचा आर्थिक घोटाळा गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांना सहभाग- जेपीसी कमिटीमार्फत चौकशी करा

लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होवून काही तासांचाच अवधी लोटला आहे. तोच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक निकाला आधी गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअकर मार्केट मधील माहिती जाहिर करत ३० लाख कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा खळबळजनक घोटाळा केला असून त्याची जेपीसी …

Read More »

नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेते पदी निवड, चंद्राबाबू आणि नितीशकुमार खास उपस्थित नितीशकुमार म्हणाले की, सत्ता स्थापनेची प्रक्रिया राबवा

भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ७ जून रोजी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा केल्याची, माहिती सूत्रांनी दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना नरेंद्र मोदींनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर “जलद गतीने काम” करावे अशी इच्छा …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, … देवेंद्र फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक भाजपाने लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवली तर मोदींनीच राजीनामा द्यावा

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा देत निवडणुक लढवली तर महाराष्ट्रात ४५ जागा जिंकणार असा भाजपाचा अहंभाव होता परंतु देशातील जनतेप्रमाणे राज्यातील जनतेनेही भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात भाजपाची कामगिरी अत्यंत खराब झालेली आहे याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीव झाली, आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली, राजीनामा स्विकारा पक्षात काम करण्याची पूर्ण मोकळी द्यावी केंद्रातल्या नेत्यांना भेटून सांगणार

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी नुकतीच झाली. या निकालात महाराष्ट्रातील लोकसभेच्या २३ जागांवर असलेली भाजपा अवघ्या ९ जागांवर आली. या पार्श्वभूमीवर या पराभवाची जबाबदारी स्विकारत भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला मिळालेल्या कमी जागांची जबाबदारी स्विकारत राजीनामा स्विकारण्याबाबात केंद्रीय नेतृत्वाला सांगणार असल्याचे सांगत पूर्ण वेळ पक्षाचे काम करण्यासाठीची जबाबदारी …

Read More »

एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील निकालाचा परिणाम शेअर बाजारावर भाजपाबाबत अपेक्षा वाढवून ठेवल्याने शेअर बाजार ६ हजार अंशाने गडगडला

बीएसई सेन्सेक्सने त्याची घसरण ६,१०० अंकांपर्यंत वाढवल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदार खचले आहेत. गुंतवणूकदारांना भीती वाटते की भाजपा २७२ चे स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरू शकते आणि एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सत्तेत आल्यास राजकीय प्रभाव सोडावा लागेल. टीम NDA सध्या २९७ जागांसह आघाडीवर आहे, ३५०-अधिक जागा जिंकण्यापेक्षा खूपच कमी, काही प्रकरणांमध्ये ४००-अधिक, एका …

Read More »

बीडात तणावः ईशान्य मुंबईत वायकर आणि किर्तीकर यांच्यात चुरसीची लढत अखेर रविंद्र वायकर १ मतांनी विजयी

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून बीड लोकसभा मतदारसंघात कधी भाजपाच्या पंकजा मुंडे या पुढे तर कधी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे पुढे असे चित्र पाह्यला मिळत होते. तर अशीच काहीशी परिस्थिती ईशान्य मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर …

Read More »

भाजपा बहुमतापासून दूरः नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीचे किंगमेकर? सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीकडून पत्ते पिसायला सुरुवात

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश आणि इतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंडिया आघाडी आणि घटकपक्षांना मतदारांना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ज्या भाजापाने ४०० पारचा नारा दिला होता. त्या भाजपाला ४०० काय आता २५० जागा मिळणेही अवघड होऊन बसला आहे. तर इंडिया आघाडीच्या विजयी …

Read More »