देशातील वाढत्या महागाईच्या प्रश्नावरून चर्चेची आणि अन्नधान्यावर लावण्यात आलेली जीएसटी रद्द करण्याची मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात फलक घेऊन निदर्शने केली. फलक फडकाविल्याबद्दल काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा इशारा दिला होता. तरीही काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात आंदोलन …
Read More »मुलीवरील ‘त्या’ आरोपावरून स्मृती इराणी यांची काँग्रेस नेत्यांना नोटीस आरोप मागे घ्या लेखी माफी मागा
मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात अवैध मद्यालय आणि बीफ आणि पोर्क मासांचे जेवण त्यांच्या हॉटेलच्या ग्राहकांना देण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. आता या आरोपानंतर स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नीता डिसुजा …
Read More »मंगळवारी २६ जुलै रोजी मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचा ‘सत्याग्रह’ सोनियाजी गांधींना चौकशीच्या नावाखाली हुकूमशाही मोदी सरकारकडून नाहक त्रास !: नाना पटोले
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या या दहपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. सोनियाजी गांधी आजारी असून वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष मंगळवार २६ जुलै रोजी पुन्हा …
Read More »नाना पटोले म्हणाले, काँग्रेसचे माजी मंत्री अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर नुकसान भरपाईसाठी काँग्रेस राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार
राज्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. दोघांचे सरकार असुन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे मंत्री आहेत. सरकार अस्तित्वात नाही आणि प्रशासन ठप्प आहे. रब्बीच्या धान, चना याची खरेदी झाली नाही जी खरेदी झाली त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. शेतकरी हंबरडा फोडत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. राज्यातील ही परिस्थिती …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आरपारची लढाई मुंबई आणि नागपूरच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा
सोनिया गांधी यांची ईडीकडून केली जात असलेली चौकशी केंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱ्यावरून केली जात आहे. २०१५ साली मोदी सरकारनेच नॅशनल हेराल्ड प्रकरण काही तथ्य नसल्याने बंद केले होते. परंतु महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस पक्ष, सोनिया, राहुल हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने ईडीच्या माध्यमातून गांधी कुटुंबाला त्रास दिला जात …
Read More »राष्ट्रवादीचा आरोप, …हा तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा एक कुटील प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा आरोप
महागाई, बेरोजगारी यांसारखे गंभीर विषय हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकार विरोधात आवाज उचलला जातो, तेव्हा त्या विरोधकांना केंद्रीय यंत्रणांद्वारा समन्स देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आज होत असताना दिसत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी भाजपा सरकारवर केला. २०१९ मध्ये सुद्धा देशाचे नेते शरदचंद्रजी …
Read More »न्यायालयाच्या निकालानंतर अतुल लोंढे म्हणाले, दोघांचे मंत्रिमंडळ आणि विस्तार टांगणीवरच विरोधी पक्ष संपवणे व सत्तेसाठी भाजपाकडून लोकशाहीचे धिंडवडे
भारतीय जनता पक्षाने राज्यातील विरोधी पक्ष संपवून सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी लोकशाहीचे धिंडवडे काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून न्यायालयाच्या ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यामुळे सध्यातरी शिंदे–फडणवीसांचे असंवैधानिक सरकार दोघांचेच राहिल व मंत्रिमंडळ विस्तारही करता येणार नाही तसेच महत्वाचे निर्णयही घेता येणार नाहीत, असा खोचक टोला काँग्रेसचे मुख्य …
Read More »लोकशाही आणि संविधानाला धाब्यावर बसवित मोदी सरकारची हुकूमशाही मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात उद्या गुरुवारी राज्यभर काँग्रेसचे तीव्र आंदोलन !: नाना पटोले
लोकशाही मुल्ये व संविधानाला धाब्यावर बसवून केंद्रातील मोदी सरकारचा हुकूमशाही कारभार सुरु असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी व त्यांचा छळ करण्यासाठी या यंत्रणांचा गैरवापर सर्रास केला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा …
Read More »काँग्रेसची मागणी, अतिवृष्टीमुळे मृत्यू पावलेल्यांना १० लाखाची मदत करा काँग्रेस शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यात मागील १५-२० दिवसांत अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती प्रती हेक्टरी ५० हजार रु, व बागायती शेतकऱ्यांना १ लाख रु प्राथमिक मदत तत्काळ द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »शरद पवार यांनी केली घोषणा, विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा भाजपाचे उमेदवार धनकड यांच्याशी देणार लढत
राष्ट्रपती पदासाठी भाजपाने द्रोपदी मुर्मु यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर काल संध्याकाळी उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांचे नाव भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहिर केले. त्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी झाली. त्यानंतर विरोधकांकडून धनखड यांच्या विरोधात काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी निश्चित …
Read More »
Marathi e-Batmya