मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली असून त्या विषयीचा प्रस्ताव मागील पावसाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यावेळीही राज्यपालांनी निवडणूकीस मंजूरी दिली नव्हती. आता याविषयीचा प्रस्ताव पुन्हा महाविकास आघाडीने पाठविल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर राज्यपालांनी सदरचा प्रस्ताव आज राज्य सरकारला …
Read More »शेतकऱ्यांच्या वीज तोडणी प्रश्नी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले हे निवेदन वीज तोडणीपासून शेतकऱ्यांना तीन महिन्यांची मुदत
सभागृह सुरू झाल्यापासून सातत्याने संसदीय आयुधे वापरून सदस्यांनी तसेच सभागृहाच्या बाहेरही कृषी पंप वीज तोडणीचा विषय उपस्थित केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा अनेकदा या विषयावर प्रश्न उपस्थित करून सभागृहाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, कुणाल पाटील,प्रकाश सोळंके,आमदार कल्याणकर यांनी तसेच विरोधी पक्षांनी हे मुद्दे उपस्थित केले. महावितरण कंपनी …
Read More »नाना पटोलेंचे वक्तव्य, राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार ट्विटरद्वारे केला दावा
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपशेल अपयश आले. एवढेच नाहीतर हातात असलेल्या पंजाब सारख्या राज्याची सत्ता देखील गमावली. यानंतर आता काँग्रेसच्या नेतृत्व बदलाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच काल काँग्रेसची कार्यकारी समितीची बैठक देखील सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. एकीकडे या घडामोडी घडलेल्या असताना दुसरीकडे …
Read More »निवडणूक निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले… ‘तो महाराष्ट्र भी तैयार है’ पंजाबमधील बदल भाजपला अनुकूल नाहीच मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे - शरद पवार
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या उत्तर प्रदेशातील योगींचे सरकार जाणार असल्याचे भाकित करत पंजाब बद्दल सांगणे कठीण असल्याचे वक्तव्य केले. मात्र आज या पाचही राज्यांचे निकाल जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, …
Read More »न्यायालयाच्या निर्देशानुसार फक्त “या” पाच महापालिकांच्या निवडणूका आयोग घेणार नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकांचा समावेश
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी समाजाचे गेलेले आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारने कायदेशीर लढण्याच्या अनुषंगाने तयारी केलेली असतानाच तो पर्यंत या निवडणूका होवू नये यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि मुंबई महापालिका अधिनियम १९६५ या कायद्यात सुधारणा करत निवडणूकीचे सर्वाधिकार राज्य सरकारने स्वतःकेड घेतले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मुदत संपून …
Read More »युध्द परिस्थितीत काँग्रेसनेही नागरीकांना आणले, पण भाजपाच्या प्रवृत्तीची किळस येते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
जवळपास ११ दिवसांपासून युक्रेनविरुद्ध रशियाने सुरु ठेवलेल्या लष्करी कारवाईमुळे जवळपास १० हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये अजूनही अडकलेले आहेत. पण या विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकांची भाषणे व उद्घटाने करत फिरत असल्याची बाब गंभीर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा …
Read More »फोन टॅपिंगचे आदेश देणारे रश्मी शुक्लांचे ‘बिग बॉस’ कोण? बेकायदेशीर फोन टॅप करणाऱ्या रश्मी शुक्ला यांच्यावर तातडीने कारवाई करा
वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर अशाच पद्धतीच्या प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. महाविकास आघाडी सरकारने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी करत रश्मी …
Read More »मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळल्यानंतर राज्य सरकारने घेतला “हा” मोठा निर्णय ओबीसी आरक्षणप्रश्नी राष्ट्रपतीना पत्र
ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळविण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करत आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. परंतु तो अहवालही आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने ओबीसींना राजकिय आरक्षण मिळणे आता पुन्हा दुरापास्त बनले. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहीण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …
Read More »राज्यपाल कोश्यारींनी अभिभाषण अर्धवट सोडणे हा महाराष्ट्राचा अपमान राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार करु !: नाना पटोले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही, या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल अशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू, असा …
Read More »अजित पवार म्हणाले, नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यावर सरकार ठाम, मात्र… अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य
सध्या ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपाकडून आंदोलन इशारा आणि सभागृहाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम आहे. मात्र सध्या उच्च न्यायालयात सुणावनी सुरु …
Read More »
Marathi e-Batmya