Tag Archives: congress

सतिश उकेंच्या आडून मला व काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र सतीश उकेंमुळे भाजपाचे काही नेते कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने ईडीमार्फत कारवाई

नागपूरचे वकील सतिश उके यांना ईडीने अटक केल्यानंतर नाना पटोले यांच्या वकीलाला अटक असा अपप्रचार केला जात आहे. राज्यात काँग्रेस पक्षाला समर्थन वाढत असल्याने जाणीवपूर्वक माझी व काँग्रेस पक्षाची बदनामी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले …

Read More »

स्वतःच्या डिग्रीचा पत्ता नाही, तेच आता विद्यार्थ्यांना परिक्षेबद्दल मार्गदर्शन करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार?

महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारीसह देशात ज्वलंत प्रश्न असताना त्यावर लक्ष देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. जनता महागाईने होरपळत आहे, तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत. ‘चाय पे चर्चा’, ‘परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? असा प्रश्न …

Read More »

शरद पवारांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला युपीएबाबतचा “हा” ठराव युपीएच्या अध्यक्ष पदी शरद पवारांची निवड करा

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसतंर्गत अध्यक्ष पदावरून राजकिय घमासान सुरु झालेले असतानाच युपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत एक ठराव करण्यात आला. त्यावर अद्याप शरद पवार यांची प्रतिक्रिया अद्याप …

Read More »

भाजपाची काळी जादू चालणार नाही मविआ सरकार ५ वर्ष चालणार!: नाना पटोले

भाजपाने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला. परंतु तो फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने कटकारस्थाने करत आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपाची तडफड होत असून महाविकास आघाडी सरकारवर भाजपाची काळी नजर आहे. परंतु भाजपची ही काळी जादू काही चालणार नाही आणि मविआ सरकार पूर्ण ५ वर्ष चालणार, असा विश्वास काँग्रेस …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पराभूत झाल्याने काँग्रेसला सोडू नका तर मजबूत करा काँग्रेस नेत्यांना केली मौल्यवान सूचना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जितके खवय्ये म्हणून प्रसिध्द आहेत. तितकेच राजकारणाच्या पलिकडे जावून मैत्री जपणारे नेते म्हणूनही ते परिचीत आहेत. मात्र आज त्यांनी चक्क काँग्रेस नेत्यांनाच पक्ष सोडून न जाण्याची विनंती करत पक्ष मजबूत करण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. एका प्रसार माध्यमाच्या कार्यक्रमात नितीन …

Read More »

शिवसेनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला खोचक सवाल, ही सत्ता स्वप्नातरी बघितली होती का? उपनेते तानाजी सावंत यांनी डागली तोफ

आज आमचा निधी, आम्हाला जे अधिकारी हवेत ते मिळत नाहीत. आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागते आणि ते गालातल्या गालात हसत आमच्या सर्व आमदारांची चेष्टा करतात. प्रचंड नाराजी आमची या दोन पक्षांवरती आहे हे मी जाहीरपणे सांगतो. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी बघितली होती का? असा खोचक सवाल करत केवळ आमच्या पक्षप्रमुखांच्या …

Read More »

जाती-धर्मामध्ये फूट पाडून राज्य करण्याचे भाजपाचे राजकारण देश वाचवण्याची लढाई फक्त काँग्रेस पक्षच लढू शकतो!: इमरान प्रतापगडी.

केंद्रातील सत्तेत असलेले भारतीय जनता पक्षाचे मनसुबे चांगले नाहीत. देश अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. जातीयवादी शक्तींपासून देश वाचवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. ही लढाई सोपी नाही, परंतु ह्या शक्तीला हरवण्याची ताकद फक्त काँग्रेस पक्षातच असून त्यासाठी …

Read More »

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र, केली “ही” मागणी महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी

राजस्थान व छत्तिसगड या काँग्रेसशासित राज्यांनी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी असून राज्य सरकारकडे त्यांनी वारंवार पाठपुरावाही केला आहे. राज्य सरकारने आता वेळ न घालवता त्यांच्या मागणीचा विचार करून निर्णय घेऊन त्यांना …

Read More »

एमआयएम खासदार जलिल म्हणाले, मते हवीत ना? मग या युती करा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला प्रस्ताव

२०१४ सालापासून एमआयएमकडून देशभरातील अनेक राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे करून निवडणूकीत उतरत आहे. एमआयएमला मिळणाऱ्या मतांमुळे काँग्रेससह अनेक पक्षांना विशेषत: बिगर भाजपातेर पक्षांना फटका बसत आहे. त्यामुळे एमआयएम पक्षावर भाजपाची बी टीम म्हणून आरोप केला जात आहे. यापार्श्वभूमीवर एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सगळं संपवायचेय ना? भाजपाला पराभूत …

Read More »

जी-२३ नेत्यांच्या बैठकीनंतर आझाद सोनिया गांधींच्या भेटीला, भेटीनंतर म्हणाले… विरोधकांना पराभूत करण्यावर एकमत

पाच राज्यातील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर गांधी कुटुंबियांवकडून राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली. परंतु काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना पदावर कायम ठेवले. नेमके त्याच दिवशी जी-२३ च्या नेत्यांची गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर …

Read More »