Tag Archives: congress

काँग्रेससह विरोधकांचा आरोप, मतचोरीचा नवा फंडा १२ राज्यात एसआयआर बिहारनंतर आता आता १२ राज्यात खेळ

काँग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगावर मोदी सरकारशी संगनमत करून मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) अंतर्गत १२ राज्यांमध्ये “मत चोरीचा खेळ” राबवल्याचा आरोप केला. पक्षाने आरोप केला की बिहारच्या सुधारणेच्या मोहिमेनंतर, ज्यामध्ये ६९ लाख नावे वगळण्यात आली होती, आता तीच “मतदार फेरफार करण्याची पद्धत” देशभरात पसरवली जात आहे. एक्स X वर …

Read More »

सचिन सावंत यांचा टोला, केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर-२ सरकारला तीन वर्षे का लागली ? अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशीला सीबीआयला ५ वर्षे लागली; पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार?

भाजपा सरकारने सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी गैरवापर केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत व पालघर साधू प्रकरणात मविआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी करण्यास सीबीआयला ५ वर्षे लागली आता पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित करून पालघर साधूंची केस …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली टीका राजधर्माला शोभत नाही फलटणची घटना राजकारणाचा विषय नाही तर महिला सुरक्षेची म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ज्या संवेदना व्यक्त केल्या आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनात असल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्याअनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी …

Read More »

राहुल गांधी यांनी डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवरून व्यक्त केली खंत सुसंस्कृत समाजाला हादरवून टाकणारी शोकांतिका

बलात्कार आणि छळाला सामोरे गेल्यानंतर महाराष्ट्रातील सातारा येथील डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी शोकांतिका असल्याची भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. डॉ संपदा मुंडे यांच्यावर यंत्रणेने अत्याचार आणि छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्ट वरून व्यक्त केली …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी

भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा भाजपा डाव भाजपा सरकार फक्त लाडके उद्योगपती व कंत्राटदारांचे

वर्षा गायकवाड

निवडणुका आल्या की भारतीय जनता पक्ष जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवत असते. लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपा समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणातही भाजपा द्वेषाचे विष कालवत आहे. भाजपाच्या कटेंगे, बटेंगे, एक है तो सेफ है, अशा विषारी प्रचाराला बळू पडू नका, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महिला डॉक्टरच्या आत्महत्येने गृह विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या कारावी लागली ही घटना पोलीस विभागाला लाज आणणारी आहे. गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नाही, फलटणची घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटावी आणि तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे दिवाळीचे ३ दिवस सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम, कपड्यांचे वाटप व आरोग्य कॅम्पचे आयोजन

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या सणाचे वर्णन केले जात असले तरी आजही समाजातील लाखो लोक या सण, उत्सवापासून वंचित आहेत. आपण दिवाळीचा आनंद आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह साजरा करतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ सण नसून माणसांमधील नाळ अधिक घट्ट …

Read More »

महागठबंधन मधील जागा वाटप अडचणीत असताना राजदची पहिली यादी जाहिर १४३ जागांवर उमेदवार यादी प्रसिद्ध

महागठबंधन जागावाटपाच्या अडचणीत असताना राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) सोमवारी बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये १४३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. राजद नेते तेजस्वी यादव वैशाली जिल्ह्यातील राघोपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ६ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले मतचोरीचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग गप्प, आयोगाविरोधात मोर्चा निघत असेल तर काँग्रेसचे समर्थनच

देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यासंदर्भात बोलताना काँग्रेस …

Read More »