राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय. हे धाडस कुठून येते? असा सवालही यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले …
Read More »पाण्यातील नायट्रेट पातळीत वाढः प्रश्नच समजेना, वाद मात्र गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरेंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पवार यांच्या प्रश्नावरून मंत्री-अध्यक्ष संभ्रमात
राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पाणी पुरवठ्यात नायट्रेट-नायट्रोझनचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार त्या पाण्याला फिल्टर करणार की नव्याने फिल्टर बसविणार असा सवाल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित करत यासंदर्भात जी पाच प्रश्न मी उपस्थित …
Read More »सुप्रिया सुळे यांची मागणी, अत्याचाराच्या घटना दुर्दैवी, आरोपींना भरचौकात फाशी द्या राज्यात गुन्हेगारी वाढतेय, असंवेदनशील पणे घटना हाताळल्या जातायत
राज्यात महिला सुरक्षितता ही महत्वाची आहे, पण राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. राजकारण बाजूला ठेवून गंभीर केस मध्ये तपास योग्य झाला पाहिजे. स्वारगेट बस डेपोला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. स्वारगेटची घडलेली घटना ज्यापद्धतीने हाताळली गेली, तेही अतिशय असंवेदनशील आहे, महाराष्ट्रात महिला सुरक्षा धोक्यात आलेली आहे. …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, शेतकरी विरोधी, विसंवादी सरकार म्हणून चहापानावर बहिष्कार मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक आक्रमक
सरकार हे शेतकरी विरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्निकतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याचे विरोधी …
Read More »अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे सरकारला पत्र, केवळ चहापानाचा फार्स अंबादास दानवे यांचा खडा सवाल, विसंवाद आहे म्हणायचे आणि संवादही साधायचा नाही
अर्थसंकल्पिय अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्यावतीने विरोधी पक्षातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत प्रथेप्रमाणे दरवेळी प्रमाणे राज्य सरकारने यावेळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र एकाबाजूला कायदेशीर तरतूदींचे पालन करायचे नाही दुसऱ्याबाजूला विरोधकांच्या सूचनांचा आदरही करायचा नाही मग …
Read More »पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरूणीवर बलात्कारः घटनेचे राजकिय पडसाद विरोधकांकडून पुणे पालकमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीकास्त्रः आरोपीच्या भावाला घेतले ताब्यात
मुंबईनंतर सर्वाधिक गर्दी आणि वर्दळीचे शहर असलेल्या पुणे शहरातील स्वारगेट या प्रमुख एसटी बसस्थानकावर एका व्यक्तीने एका २६ वर्षिय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे पुणे शहर हादरले असून पुण्यात नेमकं पोलिसांच चाललय काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असून पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंची गुप्त भेट? भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली, या दोन नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीवेळी भाजपचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सुध्दा उपस्थित होते. जयंत पाटील यांनी या गुप्त भेटीच्या वृत्ताला …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, नीलम गोऱ्हे यांचे ते वक्तव्य मुर्खपणाचे, यायलाच पाहिजे नव्हते ठराविक कालवाधीतील पक्षांचा कालावधी पाहता असे वक्तव्य करायला नको होते
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेना उबाठामध्ये पदांसाठी अप्रत्यक्ष भ्रष्टाचार होत असल्याचे टीका केली. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर खोचक भाषेत टीका केली. तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी बोलावे असे आव्हानही केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी …
Read More »राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांची मागणी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा लाडकी बहिण योजना फक्त निवडणूक जिंकण्यासाठी होती
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे त्यामुळे अजित पवार यांनी कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. महेश तपासे बोलताना पुढे म्हणाले की, आता अजित पवार म्हणू शकणार नाही …
Read More »सुप्रिया सुळे यांचा निर्धार, आता मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरवून न्याय मागणार हा लढा मी लढणार, माझा शब्द; ग्रामस्थांना आश्वासन, देशमुख आणि मुंडे कुटुंबीयांची सांत्वन भेंट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग येथे दिवंगत सरपंच संतोष देशमुख आणि परळी येथील दिवंगत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. यावेळी …
Read More »
Marathi e-Batmya