संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उद्गार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले. यावेळी विधान परिदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलताना म्हणाले की, सभागृहात …
Read More »राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका मात्र महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ संसदेचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब
लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या संविधानावरील चर्चेची सुरुवात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संविधान ही कोणत्याही एका पक्षाची देणगी नाही असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केल्याने विरोधकांच्या विरोधानंतर राज्यसभा …
Read More »संसदेत पुन्हा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यसभा आणि लोकसभेत कामकाज ठप्प
पहिल्या आठवड्यातील धुसफूसानंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सकाळी पुन्हा सुरू झाले. तथापि, अदानी प्रकरणी आणि मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या विरोधामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज फारसे झाले नाही. तसेच विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे संसदेचे कामकाज करण्यात तहकूब करण्यात आले. आता मंगळवारी संसदेची पुन्हा बैठक होणार आहे. विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीत लोकसभेचे कामकाज …
Read More »राज्यसभेच्या १२ रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्या महाराष्ट्रातील जागांसाठी मतदान
देशभरातील विविध राज्यातून रिक्त होणाऱ्या १२ राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडूण गेल्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे ही मुंबईतून लोकसभेवर निवडूण गेल्याने त्यांचीही राज्यसभेतील जागा रिक्त झाली आहे. या रिक्त झालेल्या …
Read More »पंकज चौधरी यांची राज्यसभेत माहिती, ९.९० लाख कोटीहून अधिक रक्कम रायट ऑफ मागील पाच वर्षातील कर्ज रकमेची दिली आकडेवारी
शेड्युल्ड कमर्शिअल बँकांकडून गेल्या पाच वर्षात सरासरी ₹५ च्या लिखित-ऑफ रकमेपैकी ₹१ देखील वसूल करता आला नाही. आर्थिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ९.९० लाख कोटींहून अधिक रक्कम माफ करण्यात आली आहे. याच कालावधीत, फक्त ₹१.८४ लाख कोटी वसूल केले जाऊ शकले, जे एकूण लेखी रकमेच्या फक्त …
Read More »NEET UG प्रश्नी संसदेत विरोधकांचा गोंधळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित सोमवारपर्यंत कामकाज तहकूब
भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आभार प्रस्ताव मांडला. एनईईटीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घातला. जनता दल JD(S) खासदार आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी NEET मुद्द्यावर सरकारचे समर्थन केले, तर अध्यक्ष जगदीप धनकड यांनी खासदार सागरिका घोष, डेरेक ओब्रायन आणि साकेत गोखले …
Read More »चंद्रकांत हंडोरे यांची ग्वाही, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांचा संसदेत आवाज उठवू
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत चैत्यभूमी, पांजरपोळ व चेंबूर येथे महापुरुषांना अभिवादन केले. विधानपरिषद निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झालेले चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहाच उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली …
Read More »राज्यसभेसाठी काँग्रेसची यादी जाहिरः सोनिया गांधी, चंद्रकांत हंडोरे, अभिषेक मनु सिंघवी…
राज्यसभेच्या एकूण रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरु झाली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे जवळपास सक्रिय राजकारणातून दूर रहावे लागत आहे. तसेच हिंडण्या फिरण्यावरही मर्यात येत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोनिया …
Read More »संसद सुरक्षेच्या मुद्यावरून निलंबित खासदारांचे आंदोलन सुरुच
संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद न देता निवेदन अद्याप केले नाही. उलट विरोधकांच्या गैरहजेरीतच राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज चालविले जात आहे. या पार्श्वभूमीवर संसदेतील दोन्ही सभागृहाच्या निलंबित सदस्यांनी महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर लोकशाही वाचवा अशी मागणी करणाऱे फलक …
Read More »संसदेची सुरक्षा विकसित भारतात नाही का? पंतप्रधान मोदी,अमित शाह कधी बोलणार
शहिद भगतसिंग यांनी ब्रिटीश राजवटीच्या काळात भारताला स्वातंत्र मिळावे म्हणून आणि त्यावेळच्या तरूणाईचा आवाज पोहोचविण्यासाठी ब्रिटीश संसदेत कमी तीव्रतेचे बॉम्ब टाकत देशातील जनतेचे म्हणणे मांडणारी काही पत्रके भिरकावली होती. अगदी तशाच पध्दतीची कृती देशातील ६ तरूणांनी मोदी-शाह यांनी गुलामी मानसिकतेमधून बाहेर पडले पाहिजे म्हणून नवी संसद (सेंट्रल व्हिस्टा) उभारलेल्या संसदेत …
Read More »
Marathi e-Batmya