एसएससी बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून विद्यार्थ्यांवर अनेक गोष्टी लादल्या जाताहेत. इतर कुठलेही राज्य या गोष्टी करत नाहीये, महाराष्ट्र एवढी आग्रही भूमिका का घेतोय ? एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका असे इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिला. …
Read More »उद्धव, राज ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून भाजपाला भरली धडकी हिंदी भाषेच्या विरोधात दोन्ही ठाकरे एकत्र
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत. मराठी माणूस, मराठी भाषा यासाठी लढणारे ठाकरे बंधू मैदानात उतरत असताना भाजपाच्या मनात धडकी भरली आहे. आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये, म्हणून भाजपाने नवी रणनीती आखण्याची तयारी केली आहे. राज्यात पहिली पासून हिंदीची …
Read More »मनसे सोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईलच शिवसेना उबाठा आणि मनसे युतीबाबत पहिल्यांदाच भाष्य
शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्यात युतीचे सकारात्मक संकेत आहेत. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईलच. इशारा देणार नाही, काही दिवसांत बातमी देईन. उद्धव ठाकरे यांनी असेही म्हटले की त्यांच्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही गोंधळ नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताही गोंधळ नाही. या विधानानंतर ठाकरे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची ग्वाही, महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची ग्वाही,…तर काँग्रेस भाजपा विरोधात लढत राहिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, होत्याचं नव्हतं झालं तर येणा-या पिढीला आपण काय उत्तर देणार? महाराष्ट्र दिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य़क्ष जयंत पाटील यांचं भावनिक पत्र
सध्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक भावनिक पत्र प्रसिद्ध केले. त्यात जयंत पाटील म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. …
Read More »एकनाथ शिंदे यांचा इशारा, महाराष्ट्रातून पाकिस्तानी नागरिक ताबडतोब चालते व्हा बुलढाण्यात शिवसेनेकडून आभार सभेचे आयोजन
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहेत. महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून पाकिस्तानात ताबडतोब चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला जागेवरच ठोकतील, असा निर्वाणीचा इशाऱा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. बुलढाणा येथे आयोजित आभार सभेत …
Read More »संजय राऊत म्हणाले की, इकडे ही ठाकरे तिकडेही ठाकरे आम्ही सध्या… राज ठाकरे यांच्या आवाहनावर उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद शिवसेना उबाठाची मांडली भूमिका
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि चुलत बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी कोणतेही वाद, भांडणं किरकोळ आहेत, तसेच एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार काही कठिण नाही. फक्त प्रश्न आहे तो इच्छेचा असे वक्तव्य करत ठाकरे बंधू एकत्र येण्याचे राजकिय संकेत दिले. …
Read More »राज यांच्या आवाहनावर उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱ्यांच्या पंगतीला नको आड येणाऱ्यांच्या घरी मी जाणार नाही, कोणाचे आगत स्वागत करणार नाही
नुकतेच राज ठाकरे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टला मुलाखत देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आमच्यातील वाद क्षुल्लक आहेत, पण महाराष्ट्र मोठा असल्याचे सांगत ते वाद, भांडणे महाराष्ट्रासाठी मिटवायला माझी तरी इच्छा आहे. पण माझ्या एकट्याच्या इच्छेचे काय समोरच्याची पण इच्छा असायला हवी असे सांगत शिवसेना उबाठाचे प्रमुख …
Read More »संजय निरूपम यांची स्पष्टोक्ती, वक्फ आणि मंदीराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न चुकीचा विचारांपासून दूर गेलाला उबाठा पक्षच कृत्रिम झालाय
बाळसाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेला आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडणारा उबाठा पक्षच कृत्रिम झालाय, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय निरुपम पुढे म्हणाले की, उबाठा गटाने बाळासाहेबांचे भाषण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धीमत्ता) वापर करुन दाखवले. पण खरतर उबाठा …
Read More »
Marathi e-Batmya