Tag Archives: unemployment

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल पदवी हातात, नोकरी कुठे? रिक्त सरकारी पदांची भरती कधी?: झीनत शबरीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत असताना, मुंबई युवक काँग्रेसने बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘मेरी डिग्री का क्या?’ या अभियानाची सुरुवात केली. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी गांधी भवन पत्रकार परिषद घेऊन या अभियानाची माहिती दिली. देशातील लाखो तरुण उच्च शिक्षण घेऊन पदव्या मिळवत आहेत; मात्र …

Read More »

अभिजीत दीपके यांची घोषणा, ‘क्या बोलती पब्लिक’ देशव्यापी मोहिम सुरु करणार सप्टेंबर महिन्यापासून अभियानाला सुरुवात

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी ‘क्या बोलती पब्लिक’ या देशव्यापी जनसंपर्क मोहिमेची घोषणा केली. अभिजित दीपके म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीकडून सप्टेंबरपासून देशभरात प्रवास करून नागरिकांशी संवाद साधेल आणि बेरोजगारी, शिक्षण सुधारणा आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांना आपल्या राजकीय अजेंड्याच्या केंद्रस्थानी ठेवेल. दोन दिवसांच्या पक्षीय विचारमंथनानंतर …

Read More »

श्रीनाथ मल्लिकार्जुनन म्हणाले, इंटर्नसाठी जागा २ पण अर्जदार १,२०० बेरोजगारी आणि रोजगार क्षमतेबाबत व्यक्त केली चिंता

अनमॅन्ड डायनॅमिक्सचे सीईओ आणि मुख्य शास्त्रज्ञ श्रीनाथ मल्लिकार्जुनन यांनी भारतातील वाढत्या बेरोजगार आणि रोजगारक्षमतेच्या संकटाबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि असा इशारा दिला आहे की देश “लोकसंख्यात्मक आपत्ती” कडे जात आहे. लिंक्डइनवर एका सविस्तर पोस्टमध्ये, श्रीनाथ मल्लिकार्जुनन यांनी लिहिले आहे की, “मला वाटते की भारतात बेरोजगार आणि रोजगारक्षमतेचे मोठे संकट …

Read More »

कामगार सर्वेक्षणात बेरोजगारीचा दर ६.४ टक्क्यावर स्थिर कामगार दलाच्या सर्व्हेक्षण अहवालात माहिती पुढे

शहरी भागातील बेरोजगारीचा दर (UR) मागील तिमाहीच्या तुलनेत Q3FY25 मध्ये ६.४% वर स्थिर राहिला, परंतु Q3FY24 च्या तुलनेत १०% ने कमी झाला, असे सांख्यिकी मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (PLFS) आकडेवारीवरून दिसून आले आहे. शहरी भागातील महिलांचा UR Q3FY25 मध्ये दुसऱ्या तिमाहीच्या ८.४% वरून ८.१% आणि …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, भाजपाने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून बेरोजगारी वाढवली काँग्रेसने पेसा कायदा आणून आदिवासींचे हक्क अबाधित ठेवले

संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, …

Read More »

राज्य सरकारकडून बेरोजगार-रोजगाराचा डेटा केंद्र सरकार गोळा करणार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली २० विभागांची बैठक लवकरच

रोजगार निर्मितीला केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रमुख प्राधान्य असल्याने, कामगार आणि रोजगार मंत्रालय आता मंत्रालये आणि राज्यांमध्ये नियमित रोजगार- बेरोजगारीचा डेटा संग्रहित करण्यासाठी एकात्मिक यंत्रणेची योजना करत आहे. या प्रस्तावावर, ज्याची चर्चा सुरू आहे, नोकरीच्या बाजारपेठेतील कल आणि आव्हाने समजून घेण्यास आणि पुढील संधी निर्माण करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. हे …

Read More »

काँग्रेसचा सवाल, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर पंतप्रधान एक शब्दही का बोलत नाहीत ?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा महाराष्ट्रात आले, पण राज्याला काहीच दिले नाही. पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्यात तीन-चारवेळा जात आहेत पण जनतेला भेडसावत असलेल्या मुलभूत प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. देशात आज शेतकरी, कष्टकरी कठीण परिस्थितीत जगत आहे, बेरोजगार तरुण नोकरीची प्रतिक्षा करत आहेत, परंतु पंतप्रधान मोदी फक्त राम मंदिर या …

Read More »

राहुल गांधी यांची टीका, मोदींनी तरूणांना मोबाईल बघण्याचा रोजगार दिला

काही दिवसांपूर्वी देशातील दोन तरूणांनी संसदेत उडी मारली. हे दोन तरूण कसे संसदेत आले याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नाही. पण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे ती राहुल गांधी यांनी व्हिडिओ शुट केल्याची. १५० खासदारांना निलंबित का केले असा प्रश्न कोणी विचारत नाही अशी टीका करत काँग्रेस नेते राहुल गांधी …

Read More »

जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून कुशल मनुष्यबळ विकासित करणार

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल.राज्यात सहा ठिकाणी हे सुविधा केंद्र आहेत. परदेशात रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जगातील रोजगाराची मागणी आणि त्याप्रमाणे कौशल्य विकास …

Read More »

या प्रश्नांवर काँग्रेसचा नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’मोर्चा महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व …

Read More »