Editor

जयकुमार रावल यांचे आश्वासन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा, सोबतच सामान्य ग्राहकांचे हितही जपले जावे, यासाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योगास चालना देण्यावर भर देण्यास शासन कटीबद्ध असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री रावल यांनी कांदा प्रक्रिया व साठवणुकीच्या उपाययोजनांवर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

म्हसोबावाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली, “मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न, तो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट …

Read More »

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची सहा आश्वासने सातवा वेतन आयोग, महिला सुरक्षा, प्रशासनात पारदर्शकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या जनतेला सहा आश्वासने दिली, तसेच राज्यातील आर्थिक गैरव्यवस्थापन आणि ढासळत्या कायद्याच्या राज्यावरून तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. २३ एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या हल्दिया येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी, पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यास कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचे, प्रशासनात पारदर्शकता आणण्याचे, भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी करण्याचे, …

Read More »

अमेरिका-इराण युद्धबंदी दरम्यान लेबनॉनच्या संभ्रमास पाकिस्तान जबाबदार लेबनॉनवर इस्रायलचा मोठा हल्ला केल्याने शस्त्र संधीवर ताण

८ एप्रिल, २०२६ हा पाकिस्तानसाठी आनंदाचा दिवस होता. कारण, अमेरिका-इराण शस्त्रसंधीमध्ये मध्यस्थी करून पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठा राजनैतिक विजय मिळवला होता. तथापि, काही तासांतच, इराणचा मित्र असलेल्या लेबनॉनवर इस्रायलने सर्वात मोठा हल्ला केल्याने शस्त्रसंधीवर ताण आला, ज्यात शेकडो लोक मारले गेले. संभ्रम – लेबनॉन शस्त्रसंधीचा भाग होता की …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, सभ्यता, सुसंस्कृतपणा विचारात घेऊन बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार बारामतीतून उमेदवारी माघारी घेतली असली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम, २०२९ ला बारामतीत काँग्रेसचा आमदार

बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे, कुठेही थांबता कामा नये ही भूमिका आहे. पण याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजस्यपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती, त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा …

Read More »

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे स्टार प्रचारक जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे पाटील, प्रा. राम …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपटास मान्यता प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची दिली माहिती

कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी परिसरातील सुमारे …

Read More »

आशिष जयस्वाल यांची माहिती, पारंपरिक पुजाऱ्यांसाठी राज्यस्तरीय सर्वसमावेशक धोरण लवकरच पुजाऱ्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी शासनाचे सकारात्मक पाऊल

राज्यातील विविध देवस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या सेवा देणाऱ्या पारंपरिक पुजारी समाजाच्या हक्क व संरक्षणासाठी शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, त्यांच्या सन्मान व उपजीविकेची हमी देणारे सर्वसमावेशक राज्यस्तरीय धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस धर्मादाय आयुक्त एस. एस. कलोती, विधी व न्याय …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी अंमलबजावणीवर भर द्यावा ‘विकसित महाराष्ट्र 2047’ला वेग

राज्य आणि देशासाठी २०२६ ते २०३० हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात योग्य निर्णय आणि अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्राला केवळ मोठी अर्थव्यवस्था नव्हे, तर दरडोई  उत्पन्नात  महाराष्ट्राला अग्रेसर  राज्य बनविणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या “विकसित महाराष्ट्र 2047” या महत्त्वाकांक्षी व्हिजनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील चार वर्षांत २०३० पर्यंत मोजता …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, राज्यात ‘हब आणि स्पोक मॉडेल’ द्वारे अवयवदान व प्रत्यारोपण चळवळ व्यापक करा 'हब अँड स्पोक मॉडेल' चळवळ गतीमान करावा

महाराष्ट्रातील अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात ‘हब अँड स्पोक मॉडेल’ राबवून अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मीरा -भाईदर व मुंबई येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंत्रालयात अवयव प्रत्यारोपण उपाययोजना व आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, वैद्यकीय अधिकारी व संबंधित तज्ज्ञ …

Read More »