शिवसेनेत बंडखोरी करत ५० आमदारांच्या समर्थनाच्या आधारे भाजपाच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीसाठी गेले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज भेट झाली. पंतप्रधानांनी जवळपास दिड तासांचा …
Read More »रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर दास म्हणाले, दुसऱ्या सहामाहीत महागाई कमी होण्याचा अंदाज कौटील्य इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना केले स्पष्ट
देशातील जीवनाश्यक वस्तूंसह सर्वच गोष्टीत मोठ्या प्रमाणावर किंमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना महागाईचे चटके बसत आहेत. त्यातच अनेक नागरीकांकडून महागाईचा सामना करण्यासाठी स्वत:च्याच खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात केल्याची बाब पुढे येत आहेत. यापार्श्वभूमीवर दुसऱ्या सहामाहीत महागाईं हळूहळू कमी होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी आज व्यक्त …
Read More »दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष्य मात्र मेळघाटातील बाधितांच्या मदतीकडे केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »अशोक चव्हाण यांच्याकडून रस्त्याच्या नावाखाली निधीचा गैरवापर नांदेड महापालिका निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांकडून जनतेची दिशाभूल- खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
नांदेड महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशोक चव्हाण यांनी सत्ता जाणार हे निश्चित असतानाही १५० कोटींच्या कामांना मान्यता दिल्याची घोषणा केली. अशा घोषणा करून अशोक चव्हाण हे नांदेडच्या जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »अजित पवार यांचा टोला; युतीच्या काळात मानसन्मान मिळत नाही म्हणून एकनाथ शिंदेनी… धास्तीने फक्त दोघांचा शपथविधी
राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर पहिल्यांदाच टीका करताना म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल ते म्हणाले की हे निधी देत नव्हते. पण मी तुम्हाला सांगतो की, मागच्या टर्मला जेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, तेव्हा त्यांनी मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून फक्त १२ लोकांना संधी दिली होती. …
Read More »ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपा रक्तरंजित कारवायांमध्ये सक्रीय भाजपा व अतिरेक्यांचे संबंध; राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक: डॉ. अजोय कुमार
भारतीय जनता पक्ष ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली देशातील वातावरण रक्तरंजित करत असून अनेक घातपाती कारवाया व अतिरेकी कारवायांत सापडलेले आरोपी व भाजपाचे घनिष्ठ संबंध उघड झाले आहेत. पुलवामा घटना, उदयपूरमधील कन्हैयालाची हत्या, आसाममध्ये अतिरेक्यांना टेटर फंडिग करणारा निरंजन होजाई, या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपींचे भाजपाशी संबंध उघड झाले असून भाजपाच्या ढोंगी …
Read More »संजय राऊतांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; कसले खोके, मिठाईचे का? मुंबई तोडण्याच्या आरोपावर शिंदे म्हणाले अशी काही चर्चा आमच्यात नाही
महाराष्ट्रात शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीवारीवर आले. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तर आज सकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »गिरिष महाजन एकनाथ खडसे यांच्याबद्दल म्हणाले, पंगत बसली अनं बुंदी संपली… महाविकास आघाडीची सत्ता उलथविल्यानंतर खडसेंना लगावला टोला
जळगांव जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचे गिरिष महाजन आणि पूर्वाश्रमीचे भाजपावासी अनं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकिय वैर जगजाहिर आहे. या दोघांमध्ये स्थानिक पातळीवर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखविण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना एकनाथ खडसे यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीसह भाजपामध्ये …
Read More »संजय राऊत यांचा बंडखोरांवर निशाणा; ५० खोके पचणार नाहीत, कशाला कारणे देताय… शांत बसा आणि ठरवा नेमकी शिवसेना कशासाठी सोडली उगीच मानसकि गोंधळ करू नका
राज्यात शिवसेनेतील बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र ११-१२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात या बंडखोरीवर निर्णय होणार असल्याने या बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून बंडखोरांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोरांवर …
Read More »श्रीलंका: नागरिकांचा राष्ट्रपती निवासात ‘राज’पक्षे गोताबाया समुद्रात देशवासियांनी घेतला राष्ट्रपती निवासाचा ताबा
मागील काही महिन्यांपासून श्रीलंकेत पेट्रोल, वीज, रोजगार, औषधे यासह अन्य जीवनाश्वक गोष्टीं संपत आलेल्या आहेत. तसेच महागाईनेही मोठा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या भावनांचा आज उद्रेक होत हजारो, लाखो नागरीकांनी राष्ट्रपती निवासावर मोर्चा काढत निवासाचा ताबा घेतला. विशेष म्हणजे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना याची …
Read More »
Marathi e-Batmya