राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तब्बल ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. त्यानंतर राज्यात उध्दव ठाकरेंचा गट सोडून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला संसदेतील अनेक खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राज्यात सुरु झालेली असतानाच …
Read More »शरद पवार यांनी केलेल्या भाकितावर चंद्रकांत पाटील म्हणाले, जे म्हणायचे असते ते… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला देत केले वक्तव्य
भाजपा आणि शिंदे गटाने एकत्रित येत राज्यात नवीन सरकार स्थापन केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यानी त्यांचे स्वागत केले. यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारच्या भवितव्याबाबत केलेल्या भाकितावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले, …
Read More »उध्दव ठाकरे यांच्या माईक हिसकाविण्याच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, काळजी करू नका आम्ही एकमेकांना देणारे, घेणारे नाही
विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काल विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोलत असताना माईक खेचून घेतला. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देताना नागपूरात पोहोचलेल्या …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; रेल्वे बंद झाली तर बसेस रस्त्यावर आणा महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून घेतला परिस्थितीचा आढावा
मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले २४ तासात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रेल्वेची २५ अशी ठिकाणे आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी …
Read More »संजय राऊत यांचा टोला; २०० जागांची भाषा दिल्लीतील नेत्यांची, राज्यातील नव्हे आमदार संतोष बांगर यांच्या शिंदे गटात जाण्यावर केले भाष्य
गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना परत आणण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या आमदाराने विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत शिवसेनेला मोठा झटका दिला. यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. जे आमदार …
Read More »ठाण्याच्या १५ वर्षाखालील प्रणयने आशियाई कुस्तीत मिळविले रौप्य पदक महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा
मागील काही दिवसात शिवसेनेचे बंडखोर नेते तथा ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आपल्याच वरिष्ठ नेत्यांना सत्ता संघर्षाच्या लढाईत चितपट करत आपल्या हाती सत्ता राखली. तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचाच मल्ल असलेल्या प्रणय चौधरी यांने बहारीन येथील आशियाई कुस्ती स्पर्धेत आपल्या अलौकिक कामगिरीने अनेकांचे डोळे दिपवत रौप्य पदक जिंकत महाराष्ट्राच्या मानात …
Read More »राष्ट्रवादीचा सवाल, तुम्ही सत्कारात व्यस्त; नैसर्गिक आपत्तीत लोकांनी करायचं काय ? प्रवक्ते महेश तपासे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना सवाल
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव काल विधानसभेत जिंकला. त्यानंतर नागपूरात देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करत त्यांचा मोठा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यातच मागील …
Read More »उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांना इशारा, अश्रुंची किंमत मोजावीच लागणार महिला रणरागिनींच्या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी दिला इशारा
मागील २४-२५ वर्षापासून ज्यांच्या विरोधात आपण लढत होतो. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखविला. तर ज्यांना सोबत घेवून आपण पुढे निघालो तो आज आपला एक नंबरचा शत्रु निघाला असून तर ज्यांच्या जीवावर आपण पुढे निघालो होतो त्यांनी तर पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका करत त्यांच्या खंजीर खुपसण्यामुळे ज्या शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रु आले, …
Read More »मुंबईसह ‘या’ भागात १०० मिलीपेक्षा जास्त पाऊस, मुख्यमंत्री शिंदेंचे लक्ष एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश
राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ …
Read More »नाना पटोले म्हणाले, या संकटातून देश वाचला पाहिजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी
राज्यातील शेतकऱ्यांवरील आस्मानी सुल्तानी संकटातून सुटका कर आणि त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या विठ्ठलाकडे केली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिंडीत सहभागी होत संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर येथील अकलूज येथे …
Read More »
Marathi e-Batmya