मुंबईः प्रतिनिधी राजकिय फायद्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे काम तत्कालीन सरकारने केले. यासंदर्भातच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतरच चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ६ आठवड्यात याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मंत्रालयातील विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघात आयोजित …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे धनंजय मुंडेंना आदेश अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि करिअर प्रशिक्षण आयोजित करा
मुंबईः प्रतिनिधी सामाजिक न्याय खात्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्धी आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस …
Read More »विषय एकच, सनदी अधिकारीही एकच मात्र चौकशीसाठी नियुक्ती दोनवेळा पत्राचाळ प्रकरणी माजी अधिकारी जोसेफ यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडून पुन्हा नियुक्ती
मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबईतील म्हाडाच्या पुर्नविकासात झालेल्या गोंधळामुळे अनेक वर्षापासून रहिवाशांना हक्काची घरे मिळाली नाहीत. याची गंभीर दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी सनदी अधिकारी जॉनी जोसेफ यांची नियुक्ती चौकशी करण्यासाठी केली होती. आता त्याच विषयावर पुन्हा चौकशी कम शिफारसीसाठी याच सनदी अधिकाऱ्यांची विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी …
Read More »गृहनिर्माण मंत्री आणि अध्यक्षांच्या संघर्षातून म्हाडा कर्मचाऱ्यांची सुटका म्हाडा अध्यक्षाची नियुक्ती मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून अखेर रद्द
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थानापन्न होवून दोन महिने झाले तरी सरकारमधील मंत्र्यांमध्ये अद्याप एकदिलाचे सुर अद्याप जुळले नाही. म्हाडा कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रिडा आणि स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याच्या कारणावरून म्हाडा अध्यक्ष आणि नवे गृहनिर्माण मंत्री यांच्यात निर्माण झालेला संघर्षातून मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे म्हाडाच्या कर्मचाऱ्यांची सुटका झाल्याची धक्कादायक …
Read More »CAA विरोधी आंदोलकांच्या रेट्यापुढे पोलिसांची माघार राज्यघटनेच्या उद्देशिका वाचनास दिली २० मिनिटांची परवानगी
कल्याणः प्रतिनिधी संपुर्ण देशभरात CAA अर्थात केंद्राच्या नागरीकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही भारताचे लोक समितीतर्फे येथील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात येणार होती. सुरुवातीला पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली. मात्र आंदोलनकर्त्ये नियोजित जमा होवू लागल्याने अखेर पोलिसांनीच माघार घेत आंदोलनकर्त्यांना अवघ्या २० मिनिटांची …
Read More »अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस मात्र शेअर बाजार कोसळलाच एलआयसी आणि आयडीबीआय समभाग विक्रीच्या घोषणेचा परिणाम
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी देशाच्या अर्थकारणाला दिशा देणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून झाल्यानंतर त्याचे अत्यंत प्रतिकूल पडसाद शेअर बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अर्थात निर्देशांक तब्बल ९८८ अंकांनी कोसळला. तर विमा क्षेत्रातील कंपन्यांसह वाहन उद्योग, पायाभूत सुविधा व धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचीही मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आल्याने शेअर्सचे भाव गडगडले. …
Read More »पत्रकार संजय घावरे यांचा कलाश्रम पुरस्काराने सन्मान डॉ.संध्या पुरेच्या यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
मुंबईः प्रतिनिधी दिवंगत स्वातंत्र्यसैनिक डॅा. परशुराम पाटील कलाकेंद्र कलाश्रमच्या वतीनं प्रत्येक महिन्यात निधन पावलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारीतेत लक्षवेधी कामगिरी करणारे वरिष्ठ वार्ताहर संजय घावरे आता या दिग्गजांच्या पंक्तीत विराजमान झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील आणि कलाश्रमच्या संचालिका …
Read More »माहिती न देताच अर्थमंत्री म्हणाल्या शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम योजनांची शेतकऱ्यांना उस्तुकता
नवी दिल्लीः प्रतिनिधी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीकरीता १६ कलमी कार्यक्रम आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. मात्र १६ कलमी कार्यक्रम काय आहेत याची माहिती देण्याचे टाळले. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या …
Read More »फायद्यातील LIC आणि IDBI च्या समभाग विक्रीच्या घोषणेसह इतर महत्वाच्या अर्थसंकल्पीय घोषणा अर्थमंत्री सीतारामनकडून मागासवर्गीय, आदीवासींसाठी घोषणांचा पाऊस
नवी दिल्लीः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी फायद्यातील ओएनजीसी कंपनीतील समभाग विक्रीला मान्यता देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यापाठोपाठ रेल्वेच्या खाजगीकरणास मान्यता दिली. आता फायद्यातील आणि केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारांना वित्त पुरवठा करणाऱ्या एलआयसी आणि आयडीबीआय या दोन फायद्यातील वित्तीय संस्थांच्या समभाग विक्रीच्या प्रस्तावाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला …
Read More »पाच लाखाहून अधिक उत्पन्न कमाविणाऱ्यांसाठी नवी करप्रणाली अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा
नवी दिल्लीः प्रतिनिधी आर्थिक सर्व्हेक्षणात भाकित केल्याप्रमाणे पाच लाखापर्यंतच्या उत्पन्न कमाविणाऱ्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. तर त्याहून अधिक उत्पन्न कमाविणाऱ्यांना १० टक्के, १५ टक्के, २० टक्के, २५ टक्के आणि ३० टक्के आयकर भरावा लागणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. संसदेत आज अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी वरील घोषणा …
Read More »
Marathi e-Batmya