Editor

तंबाखूमुक्त महाराष्ट्र करूया आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र तंबाखुमुक्त करण्याच्या दिशेने आपण कार्य करावयास हवे. तंबाखू विरोधी अभियान ही एक चळवळ म्हणून कायमस्वरूपी रूजविणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे जागतिक आरोग्य संघटना व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्यास मंजुरी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्ष‍ित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पत पुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत …

Read More »

१५ दिवसात दूध पिशव्यांच्या पुनर्प्रक्रियेचा आराखडा सादर करा अन्यथा कारवाई करण्याचा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी पंधरा दिवसाच्या मुदतीमध्ये दूध संघांनी पिशवीबंद दूध पिशव्यांची संकलन, पुनर्खरेदी (बायबॅक) किंवा पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) व्यवस्थेचा आराखडा सादर करावा. मुदतीत योग्य ती कार्यवाही करण्यास असमर्थ ठरणाऱ्या पॅकींग दूध प्रकल्पांवर प्लास्टिक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज दिला. प्लास्टिकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक …

Read More »

राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करणार छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करू नये, चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरते स्वच्छतागृहे सुरू करण्याचे …

Read More »

विधानसभेलाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची महाआघाडी संयुक्त बैठकीत एकत्रितपणे लढवण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा

मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्यात आली व आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

Read More »

विदर्भ-मराठवाडयातील उद्योगांना २०२४ पर्यंत विद्युत शुल्क माफ उद्योग विकास-रोजगाराला मिळणार चालना

मुंबई: प्रतिनिधी विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांना विद्युत शुल्कात माफीची सवलत २०१३ ते २०१९ पर्यंत देण्यात आली होती. ही सवलत पुढील पाच वर्ष म्हणजे २०२४ पर्यंत लागू करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ऊर्जा विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ मराठवाड्यात …

Read More »

राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीड‍िंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी पर‍िस्थ‍िती असून बहुतांशी …

Read More »

चंद्रकांत खैरेंचे पुर्नवसन करण्यावाचून भाजपाकडे पर्याय नाही पराभवाला शिवसेनेसह भाजपही जबाबदार

औरंगाबादः जगदीश कस्तुरे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत औरंगाबादेत हिंदू मतांच विभाजन भाजपामुळे झाल्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरेंना निसटता पराभव पत्करावा लागला.ही गोष्ट चंद्रकांत खैरेंनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षातही आणून दिलेली आहे. यामुळे एम.आय.एम. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तीयाज जलील यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. या घटनेमुळे औरंगाबादेत …

Read More »

विधानसभा निवडणूकीपूर्वी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एमआयएमचे नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांचा आरोप

औरंगाबादः प्रतिनिधी लोकसभेच्या निवडणूकीनंतर काही पक्षाचे पदाधिकारी जनतेमध्ये दहशत पसरवत आहेत. कारण प्रचाराकरिता त्यांच्याकडे मुद्देच नसल्याचा आरोप एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, औरंगाबादेत विमान, रेल्वे सेवा वाढवण्यावर भर दिला जाईल, कौशल्य विद्यापीठ …

Read More »

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. डॉ. पायल नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तीला राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. ही बाब तिच्याबरोबर शिक्षण घेत …

Read More »