मुंबई: प्रतिनिधी शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र, अशा शाळांमधून देखील दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करावा असे स्पष्ट निर्देश …
Read More »शिवसेना नाव देताना छत्रपतींच्या वारसांना विचारले होते का? वड्याला नाव देताना कुठे गेला होता मान उदयनराजे भोसलेंचे शिवसेनेवर टीकास्त्र
पुणेः विशेष प्रतिनिधी वादग्रस्त ठरलेल्या आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरून अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त करत वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे गेला होता मान, शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?, अशा प्रश्नांची सरबती शिवसेनेवर करत शिवसेनेचे नाव बदलून …
Read More »सामाजिक न्याय विभागाचा सर्वंकष विकास आराखडा सादर करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व आवश्यक तो निधी अनुसूचित जातीच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनांचा व निधीचा सर्वंकष असा विकास आराखडा त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी …
Read More »म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या पुनर्विकासातून १२ लाख घरे १५ दिवसात पत्रा चाळ आणि वसाहतींचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबई शहराला भेडसावणाऱ्या घरांचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली असून म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या क्लस्टर डेव्हलपमेंट अर्थात समुह पुनर्विकास करण्याची तयारी म्हाडाने दाखविली आहे. तसेच पुनर्विकासातून १२ लाख घरे उपलब्ध होणार असल्याने यासंदर्भातील प्रस्ताव १५ दिवसात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हाडाला दिल्याची माहिती मंत्रालयातील …
Read More »मुनगंटीवारांच्या आक्षेपाला “पवार हे मोदींचे गुरू” चे उत्तर राष्ट्रवादीने लिहिले खुले पत्र
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे प्रेरणास्थान आणि श्रध्दास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने सर्वस्तरातून भाजपावर टीका सुरु झाली. या टीकेला प्रतित्तुर म्हणून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोदींना आजके शिवाजी म्हटल्याचे चालत नसेल तर शरद पवार यांना रयतेचा राजा म्हटल्याचे कसे चालते असा सवाल केला. त्यास …
Read More »छत्रपतींचा अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात काँग्रेस तीव्र आंदोलन करणार उद्या राज्यभर तीव्र आंदोलन करण्याची प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही ‘आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ या …
Read More »वित्त विभाग आणि अजित पवारांना चिंता २५ हजार कोटींची आणायचे कोठून प्रश्नाने सतावून सोडले
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ७ वेतन आयोग देण्यात आला. माला मात्र जवळपास ४ वर्षातील पगारीतील तफावत देण्यासाठी आणखी २५ हजार कोटींची गरज लागणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा कोठून असा प्रश्न वित्त विभागाबरोबरच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना पडला असल्याची माहिती वित्त विभागातील …
Read More »शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द खरा करून दाखविला म्हणून मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार स्व.बाळासाहेबांच्या जंयतीदिनी शिवसेनेतर्फे भव्य सत्कार
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत शिवसैनिकाला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसविण्याचा शब्द शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आपण दिल्याची भावनिक आठवण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून सातत्याने करून दिली जात होती. त्या शब्दानुसार शिवसैनिकास मुख्यमंत्री पदी बसविल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा भव्य सत्कार शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली. हा …
Read More »वाहन कायद्यातील दंड आणि शिक्षेबाबत केंद्राने पुर्नविचार करावा तरतूदीबाबत पत्र पाठविणार मंत्री परब य़ांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याविषयी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. मात्र दंड आणि शिक्षा यात तफावत असल्याने त्याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होणार असल्याने यातील तरतूदींचा फेरविचार करावी अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी …
Read More »वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी सायबर सुरक्षा महत्वाची बीएसईमध्ये ‘सायबर सिक्युरिटी कॉन्फरन्स-२०२० मध्ये तज्ञ मोहंती यांचे मत
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी ‘सायबर सुरक्षा’ हा आता महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच भांडवली बाजार आणि सामान्यांच्या गुंतवणूकीचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीचे सदस्य एस. के. मोहंती यांनी आज येथे केले. सेबी, बाँम्बे स्टाँक एक्स्चेंज अर्थात बीएसई आणि …
Read More »
Marathi e-Batmya