Breaking News

चंद्रकांत पाटील यांचा डिफेन्स; ‘अग्निपथ’च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतुने तरुणांचे करिअरचे कायमचे नुकसान

लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने असून त्यातून गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित तरुणांना कोणतीही नोकरी मिळणे अशक्य होईल व त्यांचे करिअरचे कायमस्वरुपी नुकसान होईल, अशी जाणीव भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी करून …

Read More »

भुयारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, कशाला पराचा कावळा करताय… असं बोलत असतात असे सांगत दुर्लक्ष करण्याचे आवाहन

Ajit Pawar

विधान परिषद निवडणूकीसाठी येत्या २० जून रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत झालेल्या दगाफटक्याची पुर्नरावृत्ती होवू नये यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या खबरदारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना …

Read More »

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार भुयार यांचा टोला, संजय राऊतांना मतपेटी… राऊतांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर भुयार यांनी लगावला टोला

काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणूकीच्या दरम्यान महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महाविकास आघाडीतील मते फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची नावे घेत यांचीच मते …

Read More »

अग्निपथच्या अग्नीरोषावर संजय राऊत म्हणाले, ठेकेदारीवर गुलाम घेता येवू शकतं पण सैन्य… पंतप्रधान मोदींची प्रत्येक योजना…हा तर सैन्यदलाचा अपमान

मागील काही दिवसात केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत लष्कर भरतीसाठी कंत्राटी पध्दतीची अग्निपथ ही योजना जाहिर करण्यात आली. मात्र या योजनेच्या घोषणेनंतर अग्निपथच्या विरोधात उत्तर भारतातील अनेक राज्यात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये तरूणांनी आपला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली असून आपला रोष अग्निचा …

Read More »

दहावीचा निकाल ९६.९४ टक्के; उत्तीर्णमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आवड आणि कल यानुसार पुढील मार्ग निश्चित करा- शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड

“कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही आपल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने, धैर्याने, संयमाने व परिश्रमाने अभ्यास पूर्ण करत दहावीची परीक्षा दिली. शिक्षणाप्रती त्यांच्या या समर्पणभावाला सलाम,” अशा भावना शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केल्या. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या …

Read More »

‘ड्रायव्हर’च्या ट्रोलवरून रोहित पवार यांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले… स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने करत असतो

नुकतेच देशातील आघाडीचे उद्योगपती तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे उद्योजक गौतम अदानी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात गेले होते. त्यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गौतम अदानीच्या गाडीचे सारथ्य केल्याचे फोटो आणि …

Read More »

नोटीस बजाविल्यानंतर नुपूर शर्मा गायब; मुंबई पोलिस घेतेय शोध रझा अकादमीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नुपूऱ शर्मा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले. मात्र, अद्याप नुपूर शर्मा मुंबई पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्या कुठे गेल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या …

Read More »

राहुल गांधींवरील ईडी कारवाईविरोधात राज्यभर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक महिला काँग्रेसचा ईडी कार्यालयावर धडक मोर्चा

केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांचा आवाज दडपू पहात आहे. ईडीने राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी केली असून पुन्हा चौकशीला बोलावले आहे. चौकशीच्या नावाखाली राहुल गांधी यांचा मोदी सरकार छळ करत आहे. भाजपा सरकारच्या या दडपशाहीविरोधात …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचा दम; काम प्रत्यक्ष भेट देऊन पाहणार, गतीने पण दर्जेदार करा जलवाहिनी, जलकुंभ उभारणी आणि खोदकामास वेग

औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करतांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा. मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी करणार आहे असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना एकप्रकारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. आज मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्षामार्फत करावयाच्या कामात समाविष्ट झालेल्या या योजनेचा विस्तृत आढावा घेतला. …

Read More »

विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीला धक्का; देशमुख-मलिक यांना परवानगी नाहीच तात्पुरता जामिन देण्यात न्यायालयाचा नकार

राज्यसभा निवडणूकीच्या वेळी मतदान करता यावे याकरिता मंत्री नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख यांनी तात्पुरता जामीन मिळावा यावा अशी मागणी करणारी याचिका विशेष न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात केली. मात्र त्यावेळी ईडीने केलेला युक्तीवाद या दोन्ही न्यायालयाने मान्य करत तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला. आता पुन्हा एकदा विधान परिषद …

Read More »