Breaking News

राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी केली केंद्राकडे ‘ही’ मागणी अतिरक्त दोन इको बटालियनची केंद्राकडे मागणी

राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या सहकार्यातून वृक्षलागवड करून हरित क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न करण्याच्यादृष्टीने औरंगाबाद येथील पहिल्या इको बटालियन कंपनीस आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी …

Read More »

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांच्या बचावासाठी काँग्रेसचे नौटंकी आंदोलन भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांना अपुरी मदत, शेतकऱ्यांची वीज तोडणी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेसच्या मुठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »

‘अग्निपथ’च्या नावाखाली देशातील करोडो तरुणांची मोदी सरकारकडून क्रूर थट्टा शेतकरी, कामगार, व्यापाऱ्यांनतर आता तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र

नुकतेच केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत लष्करात भरती होवू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी तात्पुरती लष्करी नोकरी हमी देणाऱ्या अग्निपथ या योजनेची घोषणा केली. त्यावरून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर तरूणांचा उद्रेक पहायला मिळत असून बिहारमध्ये तर ही योजना मागे घ्यावी यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला …

Read More »

महावितरण मीटर रीडिंग प्रकरणी ४७ एजन्सीज बडतर्फ मीटर रीडिंगबाबत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट

लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी महावितरणने गेल्या फेब्रुवारीपासून विविध उपाययोजनांना सुरवात केली आहे. यामध्ये हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. …

Read More »

योगी सरकारच्या बुलडोझरला सर्वोच्च न्यायालयाचा लगाम पुढील सुनावणी २१ जूनला

मागील काही महिन्यापासून उत्तर प्रदेशात झालेल्या जातीय हिंसाचाराला फक्त विशिष्ट समुदायातील व्यक्तींना जबाबदार ठरवून त्या व्यक्तींच्या घरावर बुलडोझर चालवित नेस्तानाभूत करण्याचे प्रकार उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सुरू केले. या निर्णयामुळे अनेक निष्पाप व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे आणि त्या व्यक्तींच्या घरांवर जाणीवपूर्वक बुलडोझर चालवित बेघर करण्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला भाजपाचा आगामी लोकसभा निवडणूकीचा प्लॅन… बैठकीनंतर दिली माहिती

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडी विशेषत: शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभूत करत भाजपाच्या धनंजय महाडिक यांचा आर्श्चयकारक विजय घडवून आणल्यानंतर भाजपाने आता आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत आगामी …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा; सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही राहुल गांधींवरील ईडी चौकशीविरोधात राजभवनवर धडक मोर्चा

केंद्रातील भाजपा सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, स्टेजवर होतो मी ऐकले, अजित पवार यांनी… विधान परिषद निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल-चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद निवडणुकीसाठी नियोजन पूर्ण झाले असून राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल आणि पक्षाचे सर्व पाच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय …

Read More »

पर्यटकांच्या सोयीसाठी गेट वे ऑफ इंडियासह ‘हि’ ठिकाणे आकर्षक करणार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या परिसराचा पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने विकास करून तो अधिक आकर्षक करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. गेट वे ऑफ इंडिया परिसराचा विकास करण्यासाठी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा …

Read More »

जयंत पाटील केंद्रीय मंत्र्यांना म्हणाले, युपीए सरकारच्या काळातील ‘ती’ योजना पुन्हा सुरू करा धरण सुरक्षितता कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील धरणांच्या सुरक्षिततेला गती मिळावी - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

देशातील ४० टक्के मोठी धरणे महाराष्ट्रात असून  केंद्र शासनाच्या ‘धरण सुरक्षितता कायदा-२०२१’ अंतर्गत या धरणांच्या सुरक्षिततेला गती  देण्यात यावी, अशी मागणी आज राज्याचे  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केली. त्याचबरोबर क्षारामुळे धरणाखालील जमीन नापीक झाली आहे, अशा जमीनी शेतीखाली येण्यासाठी २०१४ पूर्वी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए केंद्र शासनाचा विशेष कार्यक्रम …

Read More »