Breaking News

केंद्रापाठोपाठ राज्याचीही सरकारी कर्मचाऱ्यांना गुढी पाडवा भेटः महागाई भत्त्यात वाढ केंद्राप्रमाणे राज्यातही ३ टक्के वाढ

अवघ्या काही दिवसांवर नव हिंदू वर्ष सुरु होणार असून या नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेत ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, गुढी पाडव्याला मुख्यमंत्री घेणार “तो” निर्णय निर्बंध आणि मास्क मुक्तीबाबतचा निर्णय गुढी पाढव्याच्या दिवशी

मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने राज्यातील जनता निर्बंधात रहात आहे. मात्र मागील दोन-तीन महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात मास्क मुक्ती आणि निर्बंध मुक्तीचा निर्णय होणार का याबाबत राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहीलेले असताना या विषयी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण विधान करत …

Read More »

नाना पटोलेंनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र पाठवित करून दिली “या” गोष्टीची आठवण किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची केली मागणी

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्या (CMP) आधारे हे सरकार चालवण्याचे ठरले होते. कोरोना संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला होता. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ, पाडव्याच्या मुहुर्तावर मोदीं सरकारचा निर्णय डीएमध्ये ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गजन्य आजारपणामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. तसेच आर्थिक आघाडीवरही राज्यांबरोबर केंद्राची परिस्थिती बिकट होती. मात्र आता कोविडचा प्रभाव ओसरल्याने आणि आर्थिक गाडी रूळावर येवू लागल्याने गुढी पाढव्याचा मुहुर्त साधत मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डिए अर्थात महागाई भत्यात वाढ …

Read More »

पाटील म्हणाले, शरद पवारांना द्यायचं की नाही तो त्यांचा प्रश्न, पण जिंकणार मोदीच विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी करू दे

युपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात ते …

Read More »

शरद पवारांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला युपीएबाबतचा “हा” ठराव युपीएच्या अध्यक्ष पदी शरद पवारांची निवड करा

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसतंर्गत अध्यक्ष पदावरून राजकिय घमासान सुरु झालेले असतानाच युपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत एक ठराव करण्यात आला. त्यावर अद्याप शरद पवार यांची प्रतिक्रिया अद्याप …

Read More »

वीज कर्मचाऱ्यांच्या संपप्रकरणी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी दिले “हे” आश्वासन वीज खाजगीकरणाला विरोध करणार असल्याचे आश्वासन

महाराष्ट्रासह देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी वीज खाजगीकरणाच्या विरोधात संपाचे हत्यार उपसल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवित संप मागे घेण्याची विनंती केली. परंतु तरीही वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरुच ठेवल्याने आज दुपारी निश्चित झालेली बैठकी रद्द करण्यात आली. मात्र पुन्हा आज संध्याकाळी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांनी दिलेल्या …

Read More »

शेलारांच्या मागणीवर गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, प्रतिक्रिया देत बसलो तर … गुढीपाडवा, रामनवमीसाठी लवकरच अधिसूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

गुढी पाढवा आणि रामनवमी सण अगदी तोंडावर आले तरी अद्याप गृह विभागाकडून त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली नसल्याच्या मुद्यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावत हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा खोचक सवाल केला. त्याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना …

Read More »

३७० हटविल्यानंतर काश्मीरमध्ये घेतल्या इतक्या लोकांनी जमिनी, केंद्राची संसदेत माहिती अवघ्या ३४ लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली

मोठा गाजावाजा करत काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला. त्यास नुकतीच तीन वर्षेही पूर्ण झाली. हा निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमध्ये देशातील इतर नागरीकही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी करून रहायला जातील अशा अनेक वल्गना भाजपाकडून करण्यात येत होत्या. तसेच काश्मीरमधील लोकांची रोटी-बेटी व्यवहार होईल अशा हवेतल्या कल्पनाही मांडण्यात आल्या. …

Read More »

पोट निवडणूकीच्या प्रचारात चंद्रकात पाटील म्हणाले, मोदींचे हात बळकट करण्यासाठी मते द्या प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची प्रचारात आघाडी घरोघरी जाऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा पोट निवडणूकीतील कामगिरीवर चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे भवितव्य ठरणार असले तरी आता काहीही करून ही जागा निवडूण आणायचीच असा चंग चंद्रकांत पाटील यांनी बांधला आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे हात मजबूत करण्यासाठी भाजपा उमेदवार सत्यजीत …

Read More »