Breaking News

ठाणे न्यायालयाचे आदेश, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा हेट स्पीच प्रकरणी वकील खुश खंडेलाल यांनी दाखल केली होती याचिका

ठाण्यातील एका न्यायालयाने ३ फेब्रुवारी रोजी पोलिसांना महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश दिले, ज्यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी विविध समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्याच्या उद्देशाने विधान केल्याचा आरोप आहे. न्यायिक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, ठाणे, न्यायाधीश महिमा सैनी यांनी भाईंदर पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)/राष्ट्रवादी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळाः अटक केलेल्यास कारणांची माहिती देणे मूलभूत अधिकार जर कारणांची माहिती न दिल्यास २२(१) चे उल्लंघन होईल

एका महत्त्वपूर्ण निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी असे सांगितले की अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला अटकेच्या कारणाबाबत लवकरात लवकर माहिती देणे हा मूलभूत अधिकार आहे [विहान कुमार वि हरियाणा राज्य]. तपास अधिकाऱ्याने असे करण्यात अयशस्वी झाल्यास घटनेच्या अनुच्छेद २२(१) चे उल्लंघन होईल, त्यामुळे अटक अवैध ठरेल असा स्पष्ट निर्वाळाही यावेळी दिला. सर्वोच्च …

Read More »

शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला मतदानाचा अधिकारः सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली मतदानाची परवानगी दिल्यास स्थानिक मतदान संख्येवर परिणाम होईल

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (८ फेब्रुवारी) त्यांच्या मतदारसंघाबाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची नावे मतदार यादीतून त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणी हस्तांतरित करण्याची परवानगी देणारी आणि निवडणूक नियमावलीच्या तरतुदींना आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कुमार यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा आशावाद, आमदार संमेलन क्षमता वृद्धींगत करण्याचे व्यासपीठ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित राष्ट्रीय आमदार संमेलन

राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या माध्यमातून राजकारणातील ध्येय, मनातील विचार संवादात्मक पद्धतीने मांडण्यासाठी व आपल्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रीय विधायक संमेलन भारततर्फे देशातील आमदारांसाठी दोन दिवसीय क्षमता वृद्धी कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरुड येथे आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी …

Read More »

पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे नवे आदेशः फाईल थेट पाठवा फाईली थेट राज्यपालांच्या मंजूरीसाठी पाठवा

दिल्लीत भाजपा २७ वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत असतानाच पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारला लक्ष्य करण्यास केंद्रातील भाजपा सरकारने सुरुवात केली आहे. तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यानंतर त्यांच्या ठिकाणी राज्यपाल पदावर आलेल्या गुलाबचंद कटारिया यांनी आज नवे आदेश जारी केले असून राज्य सरकारने (प्रशासनाने) राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी,… गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांचे पूनर्वसन वांद्र्यातच करा वांद्र्यातील रहिवाशांचे मालाड-मालवणीत पुनर्वसन का? ३०५ चौरस फुटांची घरे देण्याच्या हमीचे काय झाले?

मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन वास्तूचा प्रकल्प वांद्रे शासकीय वसाहतीत उभारला जात आहे. या प्रकल्पाला कुठलाही विरोध नाही. मात्र, गेल्या ५० वर्षांपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांवर आणि व्यावसायिकांवर अन्याय करु नका. स्थानिकांचे पुनर्वसन वसाहतीतच किंवा जवळच्या परिसरातच करावे आणि या मागणीवर निर्णय होईपर्यंत PAP सदनिकांची वाटप प्रक्रिया आणि सोडत कार्यक्रमाला स्थगिती द्यावी …

Read More »

मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे ९ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन

राज्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून कर्करोग निदान व उपचारासाठी तसेच राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी रविवार ९ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे …

Read More »

नाना पटोले यांची टीका, लाडक्या बहिणींच्या तीन भावांची महाराष्ट्रातील लाखो बहिणींशी गद्दारी योजना सुरु करतानाच निकष लावण्याचे शहाणपण का सुचले नाही? अपात्र ठरवून लाखो बहिणींनी घोर फसवणूक.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील लाखो माता भगिनींची घोर फसवणूक केली आहे. मतांसाठी सरसकट सर्व बहिणींना १५०० रुपये देऊन त्यांची मते घेतली व सत्तेवर आल्यानंतर मात्र या बहिणींना दिलेल्या मदतीला कात्री लावण्याचे पाप केले जात आहे. सरकारने ५ लाख बहिणींना अपात्र केले असून …

Read More »

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० हून अधिक !

महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर …

Read More »

भाजपाच्या विजयासाठी महाकुंभमधील मोदी-शाह-रामदेव यांची डुबकी कामाला आली अमेरिकेने भारतीय नागरिकांना दिलेल्या अपमानजनक वागणूकीचा मात्र दिल्लीतील मतदारांवर कोणताच परिणाम नाही

मागील महिनाभर दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा माहोल दिल्लीसह संपूर्ण देशभरात भाजपाने उभारण्यात यशस्वीरित्या निर्माण करण्यात नेहमीप्रमाणे यश मिळवले. या माहौलमध्ये भाजपाची आघाडी आणि निवडणूकीच्या दृष्टीकोनातून दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना लीकर पॉलीसी प्रकरणी तुरुंगात टाकण्यापासून ते त्यांच्या शासकिय निवासस्थानी आणि बँक खात्यांची झाडा झडती …

Read More »