स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने त्यांच्या ‘प्रिल्युड टू युनियन बजेट २०२५-२६’ या अर्थसंकल्पपूर्व अहवालात, सर्व शिफारसींमध्ये मुदत ठेवींवरील व्याज उत्पन्नावर १५% कर लागू करण्याची शिफारस केली आहे, जी सध्याच्या स्लॅब-आधारित प्रणालीपेक्षा वेगळी आहे. या प्रस्तावाचे उद्दिष्ट ठेवींवर कर आकारणी इक्विटीशी जुळवून घेणे आणि बँक तरलता स्थिर करणे आहे परंतु …
Read More »एसबीआयचा अहवालः अर्थसंकल्पात कर व्यवस्थेत या सुधारणांची शक्यता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना केल्या शिफारसी
केंद्र सरकार जुन्या कर व्यवस्थेतील सर्व सवलती रद्द करून नवीन कर व्यवस्थेत रूपांतरित करू शकते, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या १ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एसबीआय रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे. अहवालात राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) मर्यादा ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपये करण्याची आणि कलम ८०डी अंतर्गत वैद्यकीय …
Read More »उच्च न्यायालयाकडून ८७ अ खालील करदात्यांचा मार्ग केला मोकळा कर विवरणातील रिबेटचा दावा करण्यास परवानगी
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी करदात्यांसाठी आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८७अ अंतर्गत कर आकारणी वर्ष २०२४-२५ आणि त्यानंतरच्या कालावधीसाठी सवलतीचा दावा करण्याचा मार्ग मोकळा केला, सॉफ्टवेअर अपडेटने कर विवरणपत्रे भरण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अशा दाव्यांवर बंदी घातल्यानंतर काही महिने झाले [द चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स विरुद्ध डायरेक्टर जनरल ऑफ इन्कम टॅक्स …
Read More »प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुरस्कार सन्मार्थींची यादी जाहिर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाच्या मान्यतेने केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध कला, सामाजिक, कृषी, उद्योग व व्यापार क्षेत्रासह, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरवित त्यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली. पद्मश्री पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार देताना प्रामुख्याने विचार केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्काराने अच्युत पालव …
Read More »महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहिर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून पदक देण्यास मान्यता
दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण ४९ व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२४’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील शशिकांत रामकृष्ण गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ …
Read More »महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्रालयाकडून यादी जाहिर
पोलीस पदकांची आज घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण ४८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, तर ४४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील ३९ पोलीस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या …
Read More »राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांचा सन्मान निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव
निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना आज नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन केल्याबद्दल निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि राज्यांना विविध श्रेणीत विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ …
Read More »सायन पुल प्रश्नी भाजपा सरकारच्या उदासीनतेविरोधात मुंबई काँग्रेसचे आंदोलन खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, सायन पुलाच्या संथ गतीच्या बांधकामाचा स्थानिकांना प्रचंड त्रास
सायन पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा मोठा फटका स्थानिक मुंबईकरांना बसत आहे. दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना जीव मुठीत धरून धोकादायक पदपथावरून ये-जा करावी लागत आहे. शाळकरी मुलांनाही जीव धोक्यात घालून शाळेत ये-जा करावी लागत असल्याने पालक सतत चिंतेत असतात. सायन पुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करावे अन्यथा …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, प्रचंड वाढलेले मतदार सरकारने बांग्लादेशातून आणले होते का? भाजपा सरकारच्या काळात मतदारही सुरक्षित नाही, मतदार याद्यातील घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा लढा.
भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी आहे, तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या ९.५४ कोटी असल्याचे जाहीर केले, निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? असा सवाल करत …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचे मोठे वक्तव्य, बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या हातात बेड्या असताना पोलिसांच्या खिशातून रिव्हॉलर कोण काढणार
बदलापूर लैगिंक शोषण प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अक्षय शिंदे याला खोट्या चकमकीत पोलिसांनी हत्या केली असल्याचा ठपका, दंडाधिकाऱ्यांच्या अहवाल ठेवण्यात आला आहे. तसेच हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयानेही स्विकारला आहे. तसेच या चकमकीत पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यातच याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड …
Read More »
Marathi e-Batmya