Breaking News

वरळी बीएमडब्ल्यू हिट अँण्ड रन प्रकरण : आरोपी मिहिर शहाच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ठेवले बोट युक्तिवाद पूर्ण; निर्णय ठेवला राखून

एखाद्या व्यक्तीला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास (रंगेहात) त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे, ही निव्वळ एक औपचारिकता ठरते, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने गुरुवारी वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. …

Read More »

कोणी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यावी? शरद पवार यांचा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर शरद पवार यांची खोचक टीका

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर १८ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. हा राहिलेला कमी कालावधी पाहता प्रत्येक राजकिय पक्षाच्या नेत्याकडून प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यावर आरोपांचा धडका अद्याप सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, भाजपाने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून बेरोजगारी वाढवली काँग्रेसने पेसा कायदा आणून आदिवासींचे हक्क अबाधित ठेवले

संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, …

Read More »

ईडीची ठाणेसह मालेगाव, नाशिक सूरतसह अन्य ठिकाणी छापेमारी, १२५ कोटींचा आरोप विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आणला होता पैसा

सध्या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बेनामी पैशाच्या वाटपावरून सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केला जात आहे. यापार्श्वभूमीवर ईडीने आज ठाणे, नवी मुंबई, मालेगाव, नाशिक, सूरत व अहमदाबादमध्ये व्यापारी आणि बनावट कंपन्याशी संबधित २४ ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली. तसेच याप्रकरणी बँक खाती आणि १२५ कोटी रूपयांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. मालेगांव येथील …

Read More »

ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय महाविकास आघाडी आणि भाजपा महायुती दोन्ही सारखेच

जर ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय असल्याचे वंचित बहुजन आघाडीने ट्विटद्वारे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात वारंवार भूमिका मांडत आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींसाठी आरक्षण कमकुवत …

Read More »

पवन खेरा यांचा आरोप, भाजपामुळे प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजारांची लूट ‘बटेंगे तो पॉकेट कटेंगे’ और ‘भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे’!

भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून ५०० रुपये किलो तर कांदा १०० रुपया किलो झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये …

Read More »

ईपीएफ पेन्शन योजनेतून पेन्शन मिळवायचीय मग या गोष्टी करा सरकारी नोकरदार, खाजगी नोकरदारांसाठीचे निवृत्ती वेतन

ईपीएफ EPF पेन्शन योजना पगारदार व्यक्तींसाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु अनेकांना त्याच्याशी निगडित मौल्यवान पेन्शन फायद्यांची माहिती नसते. ईपीएफ EPF योजना कर्मचाऱ्यांना केवळ सेवानिवृत्ती निधी तयार करण्यास मदत करत नाही तर कर्मचारी पेन्शन योजना (EPS) द्वारे आजीवन पेन्शन देखील प्रदान करते. …

Read More »

सरकारच्या सार्वजनिक मालकीच्या काही कंपन्यातील भांडवलात ८ टक्के घट रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आणि ओएनजीएस

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी (CPSEs) कॅपेक्समध्ये सुधारणा करूनही, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-ऑक्टोबरमध्ये एनएचएआय NHAI आणि रेल्वेसह सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे एकूण भांडवली भांडवल ८% कमी झाले. रेल्वे आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे गुंतवणुकीची मंद गती या उपक्रमांच्या एकूण कामगिरीवर सतत जोर देत आहे. सीपीएसई CPSE आणि इतर एजन्सी ज्यांचे …

Read More »

आरबीआयच्या यादीत या पाच बँकाचे नाव पुरेसे भागभांडवल राखण्यात या बँकाना यश

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने बुधवारी सांगितले की स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक देशांतर्गत पद्धतशीर महत्त्वाच्या बँका (डी-एसआयबी) म्हणून राहिल्या. एसबीआय आणि एचडीएफसी बँकेला एप्रिल २०२५ पासून अतिरिक्त भांडवली बफर राखणे आवश्यक आहे, असे त्यात म्हटले आहे. पद्धतशीरपणे महत्त्वाच्या बँका अशा वित्तीय संस्था आहेत …

Read More »

प्रधानमंत्री जनधन योजनेतील १०.५ कोटी खात्यांची पुन्हा केवायसी १० वर्षे पूर्ण झाल्याने खाते धारकांकडून पुन्हा केवायसी

प्रधानमंत्री जन धन योजनेतंर्गत केंद्र सरकारने बँकांना १० वर्षे पूर्ण केलेल्या १०.५ कोटी पंतप्रधान जन धन योजना खातेधारकांसाठी नवीन ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांसाठी पुन्हा केवायसी KYC प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी सर्व भागधारकांसह वित्तीय सेवा (DFS) विभागाचे सचिव एम नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या आठवड्याच्या …

Read More »