आरबीआयकडून रेपो रेट अर्थात व्याजदरांवरील महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी सरकार ऑक्टोबरपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये नवीन बाह्य सदस्यांची नियुक्ती करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. आरबीआय RBI चे गव्हर्नर आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेले निवड समिती येत्या दोन आठवड्यांत संभाव्य उमेदवारांची शिफारस करेल ज्याची घोषणा …
Read More »गोल्ड बाँड मुदत पूर्वची तारीख रिझर्व्ह बँकेकडून जाहिर २० दिवसांसाठी खिडकी उघडी राहणार, फक्त ३० बॉण्डसाठी तारीख
भारतीय रिझर्व्ह बँकेने मे २०१७ ते मे २०२० दरम्यान जारी केलेल्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या मुदतपूर्व पूर्ततेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मध्यवर्ती बँक ११ ऑक्टोबर ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ३० एसजीबी SGB ची पूर्तता करण्याची योजना आखत आहे. विमोचन किंमत द्वारे घोषित केली जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) …
Read More »रामदास आठवले यांची मागणी,… बदलापुरकरांवरील गुन्हे रद्द करा पुरुष मदतनीस ठेवणे चुकीचे
बदलापूर मधील अत्यंत लहानग्या मुलींवरील अत्याचाराची घटना महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे.मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ उत्स्फूर्त आंदोलन करणाऱ्या बदलापूरवासियांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत. बदलापूर मधील त्या आंदोलकांना अटक करू नये अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत अशी माहिती …
Read More »मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर रोजी गणेशोत्वाच्या काळात जड वाहनांना प्रवेश बंद
गणेशोत्सवासाठी गणेश मुर्तीचे आगमन, गणेशमुर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १५५ मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मुंबई …
Read More »उद्धव ठाकरे यांची घोषणा, मी स्वतः तोंडाला काळी फित लावू बसणार जी तत्परता दाखविली, तशी न्याय देण्यातही दाखवा
बदलापुर अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली. परंतु राज्यातील महायुती सरकारला धडकी भरताच सरकार पुरस्कृत लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकिय पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही असा निकाल दिला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत …
Read More »मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज पात्र सामाजिक न्याय विभागाची माहिती
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये ३ हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यात २ लाख १४ हजार ९७८ अर्ज पात्र झाले आहेत. राज्यात मुंबई विभागात २९ हजार ९९, …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा आरोप, भाजपाला ४०० जागांचे बहुमत मिळाल्या… महायुती सरकारला बदलापूर घटनेचे गांभिर्य नाही- नाना पटोले
भारतीय जनता पक्ष व आरएसएस देशाला तोडू पहात आहेत पण राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रा काढून देशाला जोडण्याचे काम केले आहे. भाजपा आजही धर्म व जातीच्या आधारावर देश तोडण्याचे काम करत आहे. लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने लोकशाही व राज्यघटना वाचवली. ४०० जागांचे बहुमत मिळाले …
Read More »उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मविआचे बंद ऐवजी काळ्या फिती आंदोलन शरद पवार, नाना पटोले आणि शिवसेना उबाठा कडून भूमिका जाहिर
बदलापूर मधील चिमूरडींवरील झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला राजकिय हेतूनं प्रेरित झालेले आंदोलन म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केल्यानंतर हे आंदोलना राजकिय हेतूने प्रेरित होते हे दाखविण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून सातत्याने वक्तव्ये करण्यात येत आहेत. विरोधक महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंदचे आंदोलन हाणून पाडण्याचे प्रयत्नही सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि अजित …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, राजकिय पक्षांना महाराष्ट्र बंद करता येणार नाही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या विरोधात अॅड गुणरत्न सदावर्ते न्यायालयात
बदलापूर येथील दोन चिमुरड्यांवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. मात्र सत्ताधारी भाजपाप्रणित महायुती सरकारकडून विरोधकांच्या महाराष्ट्र बंदच्या विरोधात भूमिका घेण्याच्या तयारीत होते. तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. …
Read More »चित्रा वाघ यांचा आरोप, बदलापूर घटनेवरून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न
बदलापूरमध्ये राज्यासाठी लज्जास्पद घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली. मात्र महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चित्रा वाघ बोलत होत्या. यावेळी भाजपा प्रदेश महिला मोर्चा प्रदेश …
Read More »
Marathi e-Batmya