मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, पुणे विषारी दारूकांड प्रकरणात कठोर कारवाई पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रकरणी दिले आदेश

पुणे विषारी दारू कांड ही एक प्रकारे केलेली हत्याच आहे. त्यामुळे या घटनेत अतिशय कठोर कलमे लावण्यात येत असून या  प्रकरणाची सर्व पाळेमुळे खणून काढण्यात येतील. तसेच  ही इकोसिस्टिम नष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

पुणे विषारी दारूकांडात सुमारे १३ जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत. आणखी काही जण रूग्णालयात गंभीर स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझे पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून  आणखी काही लोक यात सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. जे पिडित  गंभीर रूग्ण आहेत त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात पोलीस विभाग आणि राज्य  उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे. विषारी दारूकांडामागची संपूर्ण साखळी शोधून अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. या घटनेत  संपूर्ण इकोसिस्टिम शोधून ती नष्ट करण्यात येईल, असेही सांगितले.

About Editor

Check Also

संसद परिसरातील नाटकात पूजारी झालेले खासदार पप्पू यादव यांच्यावर दिल्लीत हल्ला आधी चप्पल भिरकावली आणि नंतर चाकूने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

बिहारच्या पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना दिल्लीत एका पत्रकार परिषदेदरम्यान एका व्यक्तीने चप्पल फेकल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *