मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कमी पटसंख्या असेल्या १३०० शाळा बंद नाही तर त्यांचे १ किलोमीटर अंतराच्या परिसरातील इतर शाळांमध्ये समावेश करण्यात आलेले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून त्यांच्या सहली, गँदरींग आदी गोष्टी होत असल्याने त्यांच्या अभ्यासाला गती मिळत असल्याचा दावा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. तसेच या …
Read More »दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याची अन्न व पुरवठा मंत्री बापट यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस दूध भेसळीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे ओरिसा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा करावी अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी लक्षवेधी सूचनेच्या वेळी केली. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले की, याबाबत …
Read More »शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश शेतकऱ्यांना २००१ सालापासून कर्जमाफी देण्याचे सरकारचे मोर्चेकऱ्यांना आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी नाशिकहून मुंबईला काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला राज्य सरकारकडून तितकाच प्रतिसाद मिळाल्यामुळे सोमवारी शेतकऱ्यांच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना २००१ सालापासून कर्जमाफी मिळणार असून कुटुंबातील सर्व खातेदारांची कर्जमाफी होणार आहे. नाशिकहून निघालेला हा लाँगमार्च मुंबईकरांची तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारी रात्रीच आझाद मैदानावर आला. …
Read More »राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपकडून ७ वा उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपैकी एकाचा उमेदवार अडचणीत
मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे. तर भाजपकडून तीन जागांसाठी चवथा उमेदवार महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना उमेदवारी देत विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा यापैकी एका पक्षाचा उमेदवार धोक्यात आणला आहे. या सहाही जागांसाठी विधानसभेचे …
Read More »लाँग मार्चच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर भस्मसात व्हाल विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची राज्य सरकारला इशारा
मुंबई : प्रतिनिधी लाँग मार्चमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत. सरकारने त्यांची तातडीने दखल घेऊन ठोस भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा हा असंतोष, हा ज्वालामुखी, सरकारला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला. सोमवारी विधानसभेत कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी हजारो आदिवासी …
Read More »अखेर काँग्रेसच्या खासदारकीची माळ ज्येष्ठ पत्रकार केतकरांच्या गळ्यात शिंदे, शुक्ला, महाजनांच्या नावावर राहुल गांधी यांनी मारली काट
मुंबई : प्रतिनिधी अखेर मुंबईतून राज्यसभेवर जावू इच्छिणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला, सुशिलकुमार शिंदे आणि रत्नाकर महाजन यांच्या नावावर काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी फूली मारत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना मुंबईतून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा पत्रकारतेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे …
Read More »मुनगंटीवार, बापट, फुंडकर, सवरांना मुख्यमंत्र्यांनी बोलाविले मोर्चेकऱ्यांच्या प्रश्नी चर्चा करण्यासाठी तातडीने हजर राहण्याचे मंत्र्यांना आदेश
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांसह, आदीवासी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नी किसान सभेने काढलेल्या लाँग मार्चची राज्य सरकारने उशीराने का होईना दखल घेत त्यांच्या मागण्याप्रमाणे तोडगा काढण्यासाठी संबधित मंत्र्यांना तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविले आहे. या मंत्र्यामध्ये अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, कृषी मंत्री …
Read More »शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेस, राष्ट्रवादीचाही किसान सभेच्या मोर्चाला पाठिंबा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे होणार सहभागी, विखे-पाटीलही सहभागी होण्याची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी मोर्चा डाव्यांच्या किसान सभेने काढलेल्या मोर्चाला आता शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सहभागी होणार आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील सहभागी होणार असल्याची …
Read More »शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून दोन कट्टर राजकिय शत्रू एकत्र भाजप विरोधासाठी शिवसेनेची आंबेडकरवाद्यांपाठोपाठ आता डाव्यांना मदत
मुंबई : प्रतिनिधी एकेकाळी मुंबईतील लाल बावटा अर्थात डाव्यांचा राजकिय वरचष्मा संपविण्यासाठी शिवसेनेने जंगजंग पछाडले. त्यात त्यांना चांगल्यापैकी यशही मिळाले. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या राजकारणात नेहमीच विळ्या भोपळ्याचे नाते शिवसेना आणि डावे यांच्यात राहीले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आणि भाजप विरोधासाठी लाल बावट्याच्या साथीला आता शिवसेनाही धावली असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. …
Read More »काँग्रेसच्या राज्यसभेची माळ कोणाच्या गळ्यात ? राजीव शुक्ला, सुशिलकुमार शिंदे कि रत्नाकर महाजन
मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या ६ जागांकरीता निवडणूक होत असून या निवडणूकीत महाराष्ट्रातून काँग्रेसकडून तीन नावे अंतिम करण्यात आलेली आहेत. या तीन नावांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र यातील कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार याचा निर्णय दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya