बँलेट पेपरवर निवडणूका घ्या आणि संशय दूर करा कर्नाटकच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उपरोधिक टीका करत मागणी

मुंबई : प्रतिनिधी

प्रत्येक निवडणूकीत लागणारे निकाल हे वेगवेगळे असतात. त्यानुसार कर्नाटक विधानसभेचा निकाल लागलेला आहे. एकाबाजूला देशातील पोटनिवडणूकांमध्ये भाजपचा पराभव होत आहे. त्यामुळे मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएम मशिन्सबाबत संशय निर्माण होत आहे. त्यामुळे भाजपने एकदा बँलेट पेपरवर निवडणूका घेवून लोकांच्या मनातील शंका दूर करावी अशी उपरोधिक मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज मंगळवारी जाहीर झाले. या निकालांचे कल जाहीर होतानाच भाजपला १०० हून अधिक जागा मिळाणार असल्याचे स्पष्ट होताच उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना त्यांनी वरील मागणी केली.

दरम्यान, कर्नाटक राज्यात भाजपने मारलेल्या मुसंडीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जे जिंकले त्यांचे अभिंदन. मात्र जिंकून सत्तेवर आलेल्यांनी कर्नाटकातील मराठी माणसांचा सन्मान करावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशिन्सचा विजय असो अशी खोचक टीका करत यावर स्पष्टपणे बोलण्याचे टाळले.

About Editor

Check Also

लक्ष्मीदर्शन करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार घटनात्मक पदावर बसलेल्या विधान सभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य, महाविकास आघाडीची टीका

राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *