राजकारण

हसन मुश्रीफ यांची माहिती, एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या विकास शुल्कातील बदल तसेच विद्यार्थ्यांना ओबीसी धर्तीवर शुल्क सवलतीबाबत शासन सकारात्मक

राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील बदल तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक शुल्क सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्रालयामध्ये आज राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, सीबीआयचे दोनवेळा छापे, मग महाराष्ट्र पोलीस काय करत होते? महाराष्ट्रात ‘जामतारा’ सारख्या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधींच्या लूटीचा गोरखधंदा;

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट यासाठी कुप्रसिद्ध आहे पण ‘जमतारा’ प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरु आहे, असा गंभीर आरोप करत या प्रकरणात आयपीएस अधिकारी दत्ता कराळे व दोन पोलीस अधिक्षक यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नारीवंदन आरक्षण २०२४ पासूनच लागू करावं अशी मागणी, का केलं नाही? पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर संसदेचे विशेष अधिवेशन

खऱ्या अर्थानं जर नारी वंदन हा विषय संवेदनशीलता आणि जिव्हाळ्याचा राहिला असता भाजपचा, तर २०२३ साली हे बील जेव्हा पास झालं, त्यावेळेस काँग्रेसनं आग्रह धरला होता की २०२४ पासूनच हे आरक्षण लागू करावं, तेव्हा लागू का नाही केलं? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावेळी केला. पुढे बोलताना अतुल …

Read More »

नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया स्थगित करा सर्वोच्च न्यायायलयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर माडंली भूमिका

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भातील उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया स्थगित करावी तसेच   या संदर्भातील बदर समितीचा  संपूर्ण अहवाल त्वरित सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पाठवलेल्या पत्राद्वारे केली. नाना पटोले पुढे म्हणाले की, आरक्षण हा काही विशिष्ट व्यक्ती …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, आयआयटी बॉम्बे येथे ७२० कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये ६००० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या क्वांटम क्षेत्रातील प्रगतीस मोठा वेग मिळाला. त्याचबरोबर, महाराष्ट्र शासनानेही या क्षेत्रात पुढाकार घेत ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू केले असून, उद्योग-सिद्ध मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यात आयआयटी बॉम्बे येथे ७२० कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात असून, ही भारतातील …

Read More »

हसन मुश्रीफ यांचे आवाहन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा

महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांच्या प्रगतीचा  सविस्तर आढावा मंत्रालयामध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही वैद्यकीय महाविद्यालये …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा महायुती सरकारकडून ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना हे गृहविभागाचे अपयश

महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून महाराष्ट्रापर्यंतच्या ड्रग्ज कॉरिडॉरमधून हे विष आपल्या राज्यात येत आहे. राजकीय आशिर्वादामुळेच ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ बनवण्याचे पाप महायुतीने केले आहे. महाराष्ट्राच्या तरुणाईला बरबाद करणाऱ्या महायुती सरकारला जनता कदापी माफ करणार …

Read More »

नितीशकुमारांना आव्हान देणाऱ्या सम्राट चौधरींनाच बिहारचे मुख्यमंत्री पद जदयु-भाजपाच्या नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्री होते आता पदोन्नती

मंगळवारी सम्राट चौधरी यांची बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली, ज्यामुळे नितीश कुमार यांच्या दोन दशकांहून अधिक काळाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आणि राज्याच्या राजकारणातील वर्चस्वाचा अंत झाला. २००५ पासून बहुतेक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी शांतपणे राजीनामा दिला आणि आपले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे सूत्रे सोपवली. परंतु या घडामोडीत चौधरींसाठी …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने माढा आणि सोलापूर मधील सर्व कार्यकारण्या बरखास्त नव्याने सर्व कार्यकारणीची स्थापना करणार

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील माढा व सोलापूर या दोन लोकसभा क्षेत्र मतदारसंघातील जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख पदापर्यंतच्या शिवसेना पक्षाच्या तसेच युवा सेना, महिला सेना, अंगीकृत संघटनांच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे असे सोबतच्या लेखी प्रसिद्धी पत्राद्वारे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी जाहीर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, फडणवीसांना गृहखातेच काय, महाराष्ट्राचा कारभारही झेपेना; खुर्ची खाली करा गोरेगावमधील नेस्को संकुलातील ड्रग्ज पार्टीची भनक पोलिसांनी कशी लागली नाही; टक्केवारी, हप्ते व ‘वसुली’ एवढ्याच कामासाठी यंत्रणा आहेत का?

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये दारु व ड्रग्जचा खुलेआम वापर करण्यात आला. ड्रग्जमुळे दोघांचे मृत्यू होईपर्यंत पोलीस व सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या, आता कारवाईचे नाटक सुरु आहे पण मुंबईतील एका भागात चार ते पाच हजार तरुण तरुणांची ड्रग्ज पार्टी होते, याची भनक पोलीसांना कशी लागली नाही. मुंबईतील ही …

Read More »