राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारवर कडक कारवाई कायद्यात दुरुस्ती करणार

वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा-बारवर कडक कारवाई  करण्याबाबत कायद्यात लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा व डान्सबारविरुद्ध कारवाई करण्याचा मुद्दा आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. आमदार भिमराव तापकीर यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाने धर्मादाय रुग्णालयांची नवीन “सवलतीची व्याख्या” तयार केली असून त्या अनुषंगाने अनेक रुग्णालये आता धर्मादाय श्रेणीत …

Read More »

भाजपाकडून प्रदेश कार्यकारणी जाहिर पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची उपाध्यक्ष पदी निवड

मुंबई आणि इतर महानगरपालिकांमधील निवडणुकांनंतर, भाजपाने अखेर मंगळवारी आपली राज्य कार्यकारिणी समिती जाहीर केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील नवीन कार्यकारिणी समितीमध्ये काही जुन्या नेत्यांचा अपवाद वगळता नवीन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नवीन भाजपा राज्य कार्यकारिणी समितीमध्ये १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १२ सचिव, युवा शाखेसाठी १ कोषाध्यक्ष, महिला शाखेसाठी १ …

Read More »

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारवर हल्लाबोल मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचना पुकारली. त्यावर बोलण्यासाठी भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलण्यास सुरुवात करत म्हणाले की, अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी पहिलाच लक्षवेधीचा प्रश्न हा धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनस संदर्भातील आहे. राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी बोनस दिल्यानेच राज्यात महायुती सरकार सत्तेवर आले. मात्र …

Read More »

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा, आता आमदारांकडून येणाऱ्या माहितीवरही नियंत्रण आता लेखी माहिती आधी दिली तरच पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनवर बोलायला संधी देणार असल्याची घोषणा

मागील काही वर्षापासून राज्यात आणि केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भाजपाच्या सरकारकडून अनेक सांसदीय संस्थांवर नियंत्रण मिळवले, या संस्थांमार्फत अनेक संस्थांच्या काराभारावर नियंत्रण आणले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक घटनांमागील कारणांवर बोलताना संबधित संस्थेवरील भाजपाच्या नियंत्रणाची चर्चा सर्वसामान्य व्यक्तीपासून ते आमदार-खासदारांबरोबर खाजगी चर्चेत ती मान्य ही केले जात असल्याने अनेक …

Read More »

मंत्र्याचे कामकाज हस्तांतरण, भास्कर जाधव आक्रमक, राहुल नार्वेकर म्हणाले ही प्रथा २०१९ पासूनची एकनाथ शिंदे यांच्याकडील अतिरिक्त मंत्री पदाचे अधिकार अधिवेशन काळात इतरांकडे

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनास काल पासून सुरुवात झाली. मात्र आज अधिवेशनाचे कामकाज आज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासानंतर शिवसेना उबाठाचे आमदार तथा भावी विरोधी पक्षनेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडील मंत्री म्हणून असलेले अधिकार इतर मंत्र्याकडे वर्ग केल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी …

Read More »

भावविवश रोहित पवार म्हणाले, दादांची वर भेट झाल्यावर हे बटण लावेन, तोपर्यंत दादांच्या जाण्याने राजकारणातील मिश्किल पणा गेला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना आज अनेक नेते भावूक झाले. यात अजित पवारांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश होता. रोहित यांना अजित पवारांच्या आठवणी सांगताना आज सभागृहात अश्रू अनावर झाले. यावेळी रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघातासाठी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची भावुक, ‘मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो’ शोकप्रस्तावा दरम्यान व्यक्त केली भावना

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकातील सुभाषिताचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो; पण मित्रशोक हृदय आणि …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे भेदभाव आणि द्वेषाच्या वातावरणात सौंदळा गावाने एकता, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला

आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे, हा आदर्श राज्यात सर्वदूर पोहचला पाहिजे, असे …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे भावूक उद्घगार, अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावूक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »