राहुल गांधी यांचा खोचक सवाल, मोदीजी ५ कोटी कुणाच्या सेफमधून निघाले? भाजपाचे विनोद तावडे यांच्या पैसे वाटपाच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांचा सवाल

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महामंत्री अर्थात महासचिव विनोद तावडे यांच्याकडून नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपयांचे वाटप करण्यात येत असल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

त्यातच पाच कोटी वाटपाचे प्रकरणाची कुणकुण लागताच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर हे ही विवांता हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी क्षितीज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्या जवळील एक पैशाची काळी पिशवी दाखवित त्यांच्यासोबत असलेल्या एक डायरीही यावेळी प्रसारमाध्यमांना दाखविली.

तसेच बहुजन आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे हे पाच कोटी रूपये घेऊन विरार मध्ये येत असल्याची माहिती भाजपावाल्यांनीच दिल्याचा आरोप केला. त्यानुसार घटनास्थळी पोहोचल्यानंतर विनोद तावडे हे पैशाचे वाटप करत असल्याचे दिसून आल्याचेही यावेळी सांगितले.

विनोद तावडे यांच्या पाच कोटी वाटपाच्या प्रकरणावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा या विरोधी पक्षांकडून एकच टीकेचा भडीमार सुरु झालेला आहे. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनोद तावडे यांच्या प्रकरणावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत थेट खोचक सवाल केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक एक्सवर पोस्ट केली असून या पोस्टमधून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है घोषणेच्या अनुषंगाने हे पाच कोटी कुणाच्या सेफमधून (अर्थात तिजोरीतून) निघाले आहेत ? असा सवाल करत जनतेचा पैसा लुटून कोणी टेम्पो पाठविला होता असा खोचक सवालही यावेळी केला.

राहुल गांधी यांनी सोबत विनोद तावडे यांचा विवांता हॉटेलमधील एक व्हिडीओही शेअर केला आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *