विशेष बातमी

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि त्यांचे स्वयंघोषित वर्कर स्वच्छता कर्मचारी, साफसफाई कामगार आणि वैद्यकीय पथक

आंदोलन नक्की कोणाचे असते? ज्याने ते सुरू केले त्याचे? जे प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहतात त्यांचे? की जे पडद्यामागून ते चालू ठेवण्यासाठी शांतपणे काम करतात त्यांचे? याचे कोणतेही एकच बरोबर उत्तर नाही — पण एका गोष्टीशी मात्र कोणीही असहमत होऊ शकत नाही: व्यासपीठ आणि माईक कदाचित एका व्यक्तीचे किंवा — या …

Read More »

सोनम वांगचुक यांचा सरकारला आंदोलनातून बाहेर पडण्यासाठी तीन मार्गी पर्याय नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळतेय

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला जर कोणी केंद्रबिंदू म्हणून एकत्र धरून ठेवले असेल, तर ते सोनम वांगचुक आहेत. लडाखमधील या कार्यकर्त्यांने या आंदोलनाला बळ देण्यासाठी आठवडेभर अन्नाचा त्याग केला आहे. केंद्र सरकारला जर कशाची चिंता वाटत असेल, तर ती बेमुदत उपोषणावर बसलेल्या वांगचुक यांची आहे. त्यांचे उपोषण सोडवल्यास या समस्येवर …

Read More »

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासंदर्भात एनएसए ऑर्डरला दुभार मान्यता देण्यास नकार दिल्ली पोलिसांची माहिती

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी त्या दाव्यांचे खंडन केले ज्यात ‘नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट’ (NSA) अंतर्गत प्रतिबंधात्मक अटकेच्या अधिकारांची मुदतवाढ ही ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या नेतृत्वाखालील नीट NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनाशी जोडली गेली होती. पोलिसांनी स्पष्ट केले की, हा आदेश आंदोलने सुरू होण्यापूर्वीच जारी केलेली एक नियमित प्रशासकीय नूतनीकरण प्रक्रिया होती. जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचे …

Read More »

४४ हजार कोटींचे ‘अर्बन चॅलेंज फंड’ अभियान; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशीच शासन निर्णय जारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशीच आज नगर विकास विभागाने  ‘अर्बन चॅलेंज फंड’ अभियानाची राज्यातील सर्व ४२३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढला आहे. राज्यात ४४ हजार ८०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प यातून आकाराला येणार असून यामुळे शहरांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास …

Read More »

परळीत नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठी १३ हेक्टर शासकीय जमीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

बीड जिल्ह्यातील परळी येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय उभारण्यासाठी १३ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. महसूल व वन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. सर्व्हे क्रमांक ४७८ मधील १३ हेक्टर …

Read More »

एकनाथ शिंदे यांची भावनिक प्रतिक्रिया, एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणींची हुरहूर; "दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच दादांना खरी आदरांजली" – एकनाथ शिंदे

Eknath-Shinde-Ajit-Pawar-Together

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत त्यांना अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि महायुतीचे शिल्पकार अजितदादा पवार यांच्या आठवणींचे दुःख, अशा संमिश्र भावनांनी आजचा दिवस भरून गेल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आजचा दिवस एका डोळ्यात आनंद …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’ला बळ पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन

राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे …

Read More »

आयपीएलची संस्थापक ललित मोदी १६ वर्षांनी भारतात परतणार फेमा प्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर ललित मोदी यांचा निर्णय

Lalit Modi looks forward to India return

आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी २००९ च्या इंडियन प्रीमियर लीग दक्षिण आफ्रिका फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) प्रकरणात अपीलीय न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर १६ वर्षांनी भारतात परतण्याची योजना असल्याचे म्हटले आहे. २०१० पासून भारताबाहेर राहत असलेल्या ललित मोदी यांनी सांगितले की, न्यायाधिकरणाच्या निकालाने १६ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईचा …

Read More »

मेदांता रूग्णालयातून सोनम वांगचुक यांचे पत्र कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिल्यास उपोषण स्थगित करण्यास तयार

सोनम वांगचुक

सोनम वांगचुक यांनी बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी आणि परीक्षेसंबंधित मुद्द्यांवरून सोमवारी झालेल्या ‘चलो संसद‘ मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर कोणतीही शिक्षात्मक किंवा प्रतिशोधात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिल्यास ते २५ व्या दिवशी सुरू असलेले आपले उपोषण संपवण्यास तयार असल्याचे जाहिर केले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, गेल्या १० वर्षांत १५२ वेळा प्रश्नपत्रिका फुटल्या पण एकाही प्रकरणात शिक्षा नाही शिक्षण व्यवस्था भ्रष्ट बनलीय

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सरकार भारताच्या विद्यार्थ्यांना अपयशी ठरवत असल्याचा आरोप केला. गेल्या १० वर्षांत १५२ वेळा प्रश्नपत्रिका फुटल्या असून एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोपही यावेळी केला. ‘कॉकरोच जनता पार्टी‘च्या (CJP) आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ हातावर काळी पट्टी बांधून, निषेध केला. तसेच राहुल गांधी यांनी आरोप केला की, …

Read More »