Eknath-Shinde-Ajit-Pawar-Together

एकनाथ शिंदे यांची भावनिक प्रतिक्रिया, एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणींची हुरहूर; "दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच दादांना खरी आदरांजली" – एकनाथ शिंदे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत त्यांना अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि महायुतीचे शिल्पकार अजितदादा पवार यांच्या आठवणींचे दुःखअशा संमिश्र भावनांनी आजचा दिवस भरून गेल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आजचा दिवस एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू घेऊन आला आहे. अजितदादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. मात्र त्यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर चालत सुखीसमृद्ध महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना बळ मिळोहीच प्रार्थनाअशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचे स्मरण करताना एकनाथ शिंदे म्हणाले कीकार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते कसे ठेवावेवक्तशीरपणादिवसातील प्रत्येक क्षण जनतेसाठी कसा खर्च करावा आणि प्रशासनावर प्रभावी पकड कशी ठेवावीयाचे धडे दादांनी संपूर्ण राजकीय पिढीला दिले. अर्थमंत्री म्हणून महायुतीच्या वचनपूर्तीसाठी त्यांनी मांडलेला अर्थसंकल्पशेतीशेतकरी आणि सहकार क्षेत्रावरील त्यांचा सखोल अभ्यास महाराष्ट्रासाठी नेहमीच प्रेरणादायी राहीलअसेही त्यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले कीमहाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची अनेक स्वप्ने आम्ही एकत्र पाहिली होती. मात्र नियतीने दादांना अकाली हिरावून नेले. त्यामुळे त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करणेहीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली ठरेल.

आपल्या श्रद्धांजली संदेशाचा समारोप करताना शिंदे यांनी भावपूर्ण ओळींमधून अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला.

एकनाथ शिंदे शेवटी म्हणाले की, दिवस येतील-जातीलकालचक्र फिरत राहील…दादांच्या स्मृतींचा सुगंध सदैव दरवळत राहील. महायुतीतील सहकार्यविकासाची समान दृष्टी आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

About Editor

Check Also

राहुल गांधी यांचा खोचक सवाल, काल्पनिक संभाषणात रस नाही, फक्त पोलीस कारवाईचे आदेश दिले होते का? ते आदेश कोणी दिले या उत्तरात आम्हाला रस आहे

“काल्पनिक संभाषणांमध्ये रस नाही.” लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी विद्यार्थी प्रश्नांवर चर्चा करण्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *