Tag Archives: भाजपा

चंद्रकात पाटील म्हणाले, त्यांना सत्तेत यायचं… संजय राऊत यांचे प्रत्युत्तर अमित शाह… चंद्रकांत पाटील यांच्या चिमट्यावर संजय राऊत यांचा खोचक टोला

लोकसभा निवडणूकीत भाजपाचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीत मात्र भाजपाप्रणित महायुतीला भरघोस जागा मिळाल्या. त्यानंतर त्यानंतर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची किमान तीन ते चार वेळा विधान भवनात भेट झाली. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचीही मुख्यमंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मोदीजी, सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद व अशोभनीय

संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल काँग्रेस …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकरः आंबेडकरवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या बारामती येथील राज्यस्तरीय राजकिय परिषदेतील भाषणाचा संपादित भाग

सर्वप्रथम आंबेडरवादी विचार काय आहेत हे समजून घेतले पाहिजे. अर्थात मर्यादित वेळेत जे मी मांडणार आहे ते काही परिपूर्ण आंबेडकरवादी विचार असे म्हणता येणार नाही. आंबेडकरवादी विचाराची फार मोठी व्याप्ती आहे. माणूस, समाज, देश डआणि जग व्यापून टाकणारा विचार एका तासात मांडणे केवळ अशक्य. आणि त्याही पेक्षा तो मांडण्याची माझीही …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार

२०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतक-यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. तसेच वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा प्रकल्प, …

Read More »

रायगडावरील कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी केल्या या मागण्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे ही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी अमित …

Read More »

ममता बँनर्जी यांची घोषणा, पंतप्रधान मोदी यांच्या वक्फ कायद्याची अंमलबजावणी करणार नाही एक्सवरून दिला इशारा, दंगलग्रस्त भागातील पाहणीनंतर एक्सवरील ट्विटमधून दिली माहिती

नरेंद्र मोदी सरकारने राज्यात नव्याने लागू केलेल्या वक्फ कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर करून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त भागात जाऊन शांततेचे आवाहन केले. एक्स वर ट्विट करत मुख्यमंत्री ममता बँनर्जी म्हणाल्या की, “आम्ही या विषयावर आमची भूमिका स्पष्ट केली आहे – आम्ही या कायद्याचे …

Read More »

कर्मठ आणि अभ्यासू म्हणणारे फडणवीस यांच्या वक्तव्याचा अमित शाह यांच्याकडूनच त्रिफाळा तिलक महाराज कोण, शिवाजी महाराजांची जयंती कोणी सुरु केली? अमित शाह यांना यांना अचूक माहिती द्या

फार पूर्वी २०१४ पूर्वीच्या कोणी एके काळी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात आणि भारत देशावरही होती. परंतु सत्ता राखण्यासाठी आणि जातीय समिकरणं कायम राखण्यासाठी खोट्या माहितीचा आधार घेतल्याची चर्चा कधी ऐकिवात नाही. पण सध्या महाराष्ट्रात आणि भारताच्या केंद्रातील सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून खोट्या माहितीचा प्रचार सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच छत्रपती शिवाजी …

Read More »

राज्यमंत्री अर्जून मेघवाल म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा भाजपाने राखला सन्मान भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यशाळा संपन्न

संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता पार्टीने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला. विरोधकांनी बाबासाहेब, संविधान आणि भारतीय जनता पार्टी बाबत पसरवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देत कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत सत्य पोहोचवावे असे आवाहन केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी केले. प्रदेश भाजपातर्फे …

Read More »

आशिष शेलार यांची घोषणा, पुनर्विकासित कामाठीपुराला नामदेव ढसाळ नगर नाव सार काही समष्टीसाठी कार्यक्रमात केली घोषणा

ज्या कामाठी पुरातील व्यथा वेदना कवी नामदेव ढसाळ यांनी मांडल्या त्या कामाठी पुराच्या पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागात उभी राहिल तेव्हा या भागाला महान कवी नामदेव ढसाळ नगर असे यांचे नाव दिले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी कल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. …

Read More »

बंधू राज, मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपस्थित केली शंका

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाद सुरू झाला. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उडी टाकली आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही ना …

Read More »