Tag Archives: भाजपा

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर भाजपापासून बेटी बचाव

भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणते पण ते वस्तुस्थिती तशी नाही. भाजपात गुंड, मवाली, माफिया यांना आमदार, खासदार, मंत्री केले जाते, आता तर भाजपा बलात्काऱ्यांनाही पक्षात संधी देत आहे. बदलापूरमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने स्विकृत नगरसेवक करून विकृतीचा कळस गाठला आहे, असा घणाघाती हल्लाबोल करत …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भाजपा आता बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारा पक्ष बनतोय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावा

राज्यात महिलांची सुरक्षितता ही गंभीर चिंतेची बाब बनली असून, सत्ताधाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत तीव्र …

Read More »

काँग्रेसची तक्रार, निवडणूक आयोगाची दखल, मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस मुख्यमंत्री फडणवीसांच्या आचारसंहिता भंगाबाबत काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ जानेवारी २०२६ रोजी मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये एका खाजगी चॅनेल व त्यांच्या टीमला दिलेल्या मुलाखतीद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी ही माहिती दिली. या संदर्भात, ९ जानेवारी २०२६ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भाजपा व राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? सांस्कृतिक शहर, विद्यचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज; गुंडगिरी व कोयता गँगचे माहेरघर

राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता, सत्तेतून बाहेर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निकोप, पारदर्शक व भयमुक्त निवडणुकांना राज्यात हरताळ पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरु दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, मुंबईत गेल्या तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले? किती परत पाठवले ? केंद्रीय गृहमंत्रालयाकडे माहिती उपलब्ध नाही, आरटीआयमधून माहिती पुढे

भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीत बांगलादेशी -रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे अत्यंत हिन राजकारण करते. मुंबई महानगरपालिका निवडणूक सुरू झाल्यापासून भाजपाचे मंगलप्रभात लोढा व अमित साटम यांनी हिंदु मुस्लीम वाद उकरून काढला. मुंबईत गेल्या तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले? परत पाठवले ? हा प्रश्नाचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माहिती अधिकारात …

Read More »

ममता बँनर्जी यांचा इशारा, जर मी तोंड उघडले तर जगात खळबळ उडेल ईडी कारवाईवरून मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचा अमित शाह यांना इशारा दिला

तृणमूल काँग्रेसचे राजकीय सल्लागार असलेल्या आय-पॅकच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकल्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी इशारा दिला की, जर त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर एका विशिष्ट मर्यादेपलीकडे दबाव आणला गेला, तर त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोळसा घोटाळ्यातील सहभाग असल्याचा दावा करत त्याचे तपशील उघड करतील. कोलकाता येथे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपाला ओवैसींचा MIM ही चालतो हे भाजपाचे नैतिक अधःपतन अंबरनाथ व अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड

अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. काँग्रेसने कारवाई केली पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतले, यातून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही पक्षाशी युती करत असून अकोटमध्ये …

Read More »

सचिन सावंत यांची टीका, भाजपा हा ‘ढ’ पक्ष; अभ्यास न करता बरळण्याचे काम मुंबईत मुस्लीम लोकसंख्या वाढल्याचा आरोप ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता

भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत नाही कारण त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून ते सातत्याने हिंदू मुस्लीम मुद्दा उकरून काढतात. मुंबईत मुस्लीमांची लोकसंख्या वाढली हा मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा आरोप अभ्यासात कच्च्या असणाऱ्या व्यक्तीचा आहे. भाजपा व अमित साटम यांना झोपेत व स्वप्नातही मुस्लीमच दिसतात. …

Read More »

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला, संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यावर जलिल यांचे आरोप

छत्रपती संभाजी नगरातील बायजीपुरा जिन्सी भागात महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी गेलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी इम्तियाझ जलील यांना वाहनातून बाहेर खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु इम्तियाज जलील यांनी या कारणामागे भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे असल्याचा …

Read More »