Tag Archives: भाजपा

पेगासस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, खाजगी व्यक्ती विरोधात स्पायवेअर वापरल्यास चौकशी २०२१ च्या खटल्याच्या सुनावणीप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने पेगासस स्पायवेअर प्रकरणाची सुनावणी करताना असे निरीक्षण नोंदवले की, राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्पायवेअर असलेल्या देशाकडे काहीही गैर नाही आणि खरी चिंता ही आहे की ते कसे आणि कोणाविरुद्ध वापरले जाते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की खाजगी व्यक्तींविरुद्ध स्पायवेअर वापरल्याच्या आरोपांची चौकशी केली जाईल. इस्रायली स्पायवेअर पेगासस वापरून …

Read More »

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा

जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …

Read More »

विजय वडेट्टीवार यांच्या त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी वेळ असतो का? असा सवाल विधानसभेतील  काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी आज केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी विधाने करणे म्हणजे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असेही यावेळी म्हणाले. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांचे म्हणणे आपण …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा मोदींवर टीकास्त्र, सर्वपक्षिय बैठकीला उपस्थित राहण्यापेक्षा बिहारमध्ये भाषण… पंतप्रधान मोदी यांच्या मोठमोठ्या गप्पा मारता येतात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (२८ एप्रिल २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “देशाचा स्वाभिमान दुखावला जात असताना पंतप्रधान मोदी बिहारमधील निवडणूक रॅलीत भाषण देत होते हे देशाचे दुर्दैव आहे,” असे ते …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, औद्योगिक विकास; सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार उद्योग पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान दिली ग्वाही

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येईल. शेंद्रा आणि बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रियल रिंगरोड तयार करुन, ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) क्लस्टरसाठी ५ एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. औद्योगिक प्रदर्शन व …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, गृहमंत्र्यांची भूमिका समंज्यसपणाची समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी मांडली भूमिका

पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लेखोरांना सोडणार नाही असे वक्तव्य केले. तसेच या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात काही निर्णयही घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी भूमिका स्पष्ट …

Read More »

पियुष गोयल यांचे पहलगाम हल्ल्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य,…मग असे हल्ले होत राहणार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पियुष गोयल यांच्यावर टीका

काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. त्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशात अद्याप अनेकांना दुःख झालेले आहे. तसेच या दुःखातून अद्याप अनेक जण बाहेर आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, प. बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान हिंदू नरसंहाराविरोधात भाजपा बंगाली प्रकोष्ठ चे धरणे आंदोलन

संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, कोर्टाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदूंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, सरकार सांगत होतं दहशतवाद संपवला पण पहलगाम हल्ला… पहलगाममधील हल्ला देशविरोधी, त्यावर राजकारण नको

केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. आता काही चिंता नाही, पण जम्मू कश्मीर मधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर केली. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारला सहकार्य …

Read More »

बिहारमधून पंतप्रधान मोदी यांचा इशारा, दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मधुबनी येथील जाहिर सभेत बोलताना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. त्यानंतर बिहार मधील मधुबनी येथे आयोजित एका जाहिर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना, या हल्ल्यामागील दहशतवादी आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल असा इशारा दिला. पंतप्रधान मोदींनी बिहारच्या मधुबनी येथील सभेत बोलत होते. यावेळी …

Read More »