Tag Archives: विधानसभा निवडणूक

तेजस्वी यादव यांचा आरोप, सुधारीत मतदार यादीतून माझे नाव गायब निवडणूक आयोग म्हणते, तेजस्वी यादव यांचा दावा खोटा

बिहारमधील राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शनिवारी असा आरोप केला की, विधानसभा निवडणूकीसाठी बिहारमध्ये प्रकाशित झालेल्या सुधारित मतदार यादीतून त्यांचे नाव गायब आहे. राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले की, “माझे नाव मतदार यादीतही नाही. मी निवडणूक कशी लढवू?”, असा सवालही यावेळी केला. तेजस्वी यादव यांच्या दाव्यानंतर लगेचच, …

Read More »

विधानसभा निवडणुकः वाढलेल्या ७६ लाख मतांच्या याचिकेवर २५ जूनला निकाल प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या याचिके संदर्भात याचिकेवर अंतिम निकाल

राज्यातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत आक्षेप नोंदवित वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी त्यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट …

Read More »

विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात उद्या गुरुवार १२ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीतील आंदोलनात सहभागी होणार

विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार दिनांक १२ जून रोजी राज्यभर मशाल मोर्चे काढून …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोग म्हणते, राहुल गांधी यांनी माध्यमांऐवजी आयोगाऐवजी थेट संपर्क साधावा आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीबाबत एक खास लेख लिहित मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला. त्यानंतर या लेखाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशपातळीवर उमटले. तर राहुल गांधी यांनी लेखाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे भाजपाच्या नेत्यांकडून देण्यास सुरुवात झाली. त्यावरूनही काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, महाराष्ट्रात विधान सभेची झालेली निवडणूक ही मॅच फिक्सिंग राज्यातील महाराष्ट्र विरोधी सरकार घालवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागत

महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, या निवडणुकीत नेमकी काय झालं याचं सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, …

Read More »

आमदार महेश सावंत यांना उच्च न्यायालयाचे समन्स सदानंद सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

माहिम विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे नवनिर्वाचित आमदार महेश सांवत यांच्या आमदाराकीला शिंदे गटाचे सदानंद सरवणकर यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. त्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने महेश सावंत यांना शुक्रवारी समन्स बजावले आहे. तसेच भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले. उच्च न्यायालयाच्या न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठासमोर सदा सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर …

Read More »

दी दी दिल्ली वाली प्यारी दीदीः सत्तेत कोण बसणार महाराष्ट्राची पुर्नरावृत्ती दिल्लीत होणार की.....

आता दिल्लीची दिदी प्रसिद्धीला येऊ लागली आहे. प्रिय दिदीचा प्रिय भाऊ कोण होणार याचे रहस्य ८ फेब्रुवारी रोजी ईव्हीएम मशीनमधून बाहेर येणाऱ्या जादूच्या आकृत्यांना उघडेल. ५ फेब्रुवारीला ईव्हीएम मध्ये प्रत्येकाचे मन गोळा झाले आहे, जे ६० टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. दिदीनीही आपले मत मांडले आहे. परिणाम येईपर्यंत, भावांच्या हृदयाचे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तीवादानंतर, उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस निवडणूक आयोगाला बजावली नोटीस, दोन आठवड्यानंतर होणार सविस्तर सुनावणी

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी (३ फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. मतदानाच्या अधिकृत बंद वेळेनंतर (सायंकाळी ६ वाजता) ७५ लाखांहून अधिक मते पडली आणि जवळजवळ ९५ मतदारसंघांमध्ये अनेक विसंगती आढळल्या, ज्यामध्ये मतदान झालेल्या मतांची संख्या आणि मोजणी झालेल्या मतांची संख्या जुळत नाही, असा …

Read More »

आशिष शेलार यांचा राहुल गांधीवर पलटवार, आत्मपराभवाचे प्रदर्शन… संसदेतील राहुल गांधी यांच्या दाव्यावर केली टीका

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत एकदम ७८ लाख मतदार वाढल्याचे सांगत हे मतदार कोठून आले याचे गौडबंगाल असल्याचा दावा केला. त्यावरून भाजपाचे मंत्री तथा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार करत …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, महाराष्ट्राच्या निवडणूकीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार मेक इन इंडिया चांगली योजना पण अयशस्वी ठरली

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चेवर आभार प्रदर्शन व्यक्त करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर चौफेल हल्ला चढवला. तसेच निवडणूकीच्या काळात झालेल्या अफरातफरीवरही भाष्य केले. राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूकीत एक धक्कादायक गोष्टी पुढे आली आहे. ती म्हणजे अहमदनगरमधील एका …

Read More »