Tag Archives: bjp

काँग्रेसचा आरोप, ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून शाळकरी मुलांमध्ये भाजपाचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परिक्षा पे चर्चा’साठी शाळा व विद्यार्थी वेठीस

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम सरकारी असताना राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या आडून भारतीय जनता पक्ष शाळकरी मुलांमध्ये पक्षाचा प्रचार करत असून हे अत्यंत गंभीर असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

शरद पवारांवरील आंबेडकरांच्या आरोपावर राऊतांचा बचाव तर पाटील यांच्याकडून अप्रत्यश दुजोरा शरद पवार भाजपाच्या संपर्कात संशय वाढला

राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केल्याचे नुकतेच जाहिर केले. वंचितचा समावेश अद्याप महाविकास आघाडीत झालेला नसतानाच वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मविआ नेते शरद पवार हे भाजपाबरोबर होते, आणि आजही भाजपासोबत असल्याचा गंभीर आरोप केला. आंबेडकरांच्या या आरोपनंतर ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, सरकार ४० नव्हे तर १३ कोटींसाठी चालवायचे असते… लोकच भूंकप घडवून आणतील

राज्यातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत विजय मिळविल्यानतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नायगांव येथे क्रांतीज्योतील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भेट दिली. त्यानंतर सातारा क्लब येथे प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यावेळी रोहित पवार बोलताना म्हणाले, सरकार …

Read More »

पहाटेच्या शपथविधीवरून जयंत पाटलांकडून थेट “शरद पवारां”कडे बोट नंतर “कयास”चे स्पष्टीकरण अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा बोलण्यास नकार

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात औट घटकेचे सरकार स्थापन झाले. त्यासाठी भल्या पहाटेच फडणवीस-पवार यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या शपथविधीवरून आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य करत त्या पहाटेच्या शपथविधी मागे आमचे प्रमुख नेते शरद पवार यांची …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ७५ तही महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी झ़ग़डावे लावतेय लोकशाही व संविधान वाचवण्याचा राहुल गांधींचा लढा पुढे नेऊया

देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी जनतेला झ़ग़डावे लागत आहे. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ व महान ग्रंथ ‘संविधान’ या देशाला दिले, पण मागील ८ वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी …

Read More »

जून्या पेन्शनवरून काँग्रेसचा सवाल, ‘धमक’ होती तर फडणवीस आतापर्यंत झोपले होते का? विधान परिषद निवडणुकीत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीसांचा ‘जुन्या पेन्शन’चा डाव

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची ‘धमक’ फक्त आपल्यातच आहे अशी फुशारकी मारायलाही त्यांनी कमी केले नाही. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी पेन्शन …

Read More »

अजित पवारांचे समर्थन करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांकडून आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची री… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ फडणवीसांकडून जूनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा सुतोवाच

नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यातील शिक्षकांकडून जूनी पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात येत असल्याचा मुद्दा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून विधान परिषद आणि विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या मुद्यावर राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून्या पेन्शन योजनेबाबत अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत ही योजना लागू …

Read More »

सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर, फडणवीसजी मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला अधिकार किती? तुम्हाला माहित फडणवीसांनी केलेल्या आरोपावरून अंधारे यांची टीका

काल मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून तुरूंगात टाकण्याची सुपारी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिली होती असा आरो केला. फडणवीस यांच्या या आरोप तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावल्यानंतर ठाकरे गटाच्या …

Read More »

फडणवीसांच्या आरोपावर अजित पवार म्हणाले, अशी चर्चा झालीच नाही उभ्या महाराष्ट्राला माहित आहे आम्ही जे बोलतो ते किती स्पष्ट बोलतो

आज सकाळी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर गुन्हे दाखल करण्याचे आणि तुरुंगात टाकण्याची सुपारी अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती असा खळबळजनक आरोप केला. फडणवीसांच्या या आरोपाला तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपातील …

Read More »

माजी गृहमंत्र्यांच्या उत्तरावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी वळसे-पाटलांवर आरोप केलाच नाही माझ्यावरील कारवाईसाठी वरून आदेश आले होते

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार होते. अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच किंवा सुपारी त्यावेळचे मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिलं होतं असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस …

Read More »