केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जोरावर संविधान आणि लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहे. आज देश मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्राकडे पहात असून महाराष्ट्राच्या जनतेवर देशाची भिस्त आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिली आहे. आता पुन्हा तेच काम होणार आहे. भाजपला सत्तेतून हाकलून देण्याच्या प्रक्रियेची …
Read More »नाना पटोलेंची टीका, उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा पण शेतकरी, कर्मचाऱ्यांसाठी नाही जुनी पेन्शन प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढा अन्यथा खुर्ची खाली करा
भारतीय जनता पक्षाचे सरकार कोणत्याही मुद्द्यांवर केवळ सकारात्मक आहे असे म्हणून वेळ मारून नेते पण ठोस निर्णय घेत नाही. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी २० लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन लागू केल्यास आर्थिक बोजा पडेल असे सांगणाऱ्या सरकारकडे मुठभर उद्योगपतींची कोट्यवधींची कर्ज माफ करण्यासाठी पैसा आहे …
Read More »भाग-२: जिल्हा रूग्णालयात कोट्यावधीं रूपयांच्या करामती, फक्त पुरवठा दारांचा फायदा, शासनाचे नुकसान कॅगने सूचना करूनही अनेक गोष्टींची बिले, रजिस्टर दाखविलीच गेली नाहीत
ठाणे जिल्ह्यातील आदीवासी गावांपर्यंत योग्य ती आरोग्य यंत्रणा पोहोचली नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आला आहे. आदिवासींसह सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्याचा लाभ मिळावा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा म्हणून दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा निधी राज्य सरकारकडून जिल्हा नियोजन समिती तर विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो. …
Read More »देवेंद्र फडणवीसांचा निर्धार, धनगर समाजासह वंचितांचा विकास करणारच राज्य अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याबद्दल धनगर समाजाच्या विविध संघटनांतर्फे फडणवीस यांचा सत्कार
धनगर समजासह राज्यातील सर्व उपेक्षित, वंचित समाजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार वचनबद्ध आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळया योजना उपेक्षित, वंचित वर्गापर्यंत पोहचवून दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणू , असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. धनगर समाजासाठी …
Read More »शिंदे-फडणवीसांच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख करणार विधिमंडळात उपोषण ठाकरे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्याचे गलिच्छ राजकारण
सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून या अधिवेशात ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांवर घालण्यात स्थगिती उठविण्याचे आमिष दाखविण्यात येत असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु आहे. मात्र ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी या चर्चेच्या अनुषंगाने मोठे विधान केल्याने भाजपा आणि शिंदे गटाकडून वापरण्यात …
Read More »सुषमा अंधारेंचा सोमय्यांना सवाल: ज्यांच्यासाठी ५० वेळा, २० वेळा ट्विट करत पत्रकार परिषदा घेतल्या, काय झाले त्यांचे? शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्यावरील गुन्ह्यांचे काय झाले
दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांचीच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या आदेशास २४ तासांचा कालावधीही उलटत नाही तोच ईडीने दिड महिन्यात दुसऱ्यांदा मुश्रीफ यांच्या कोल्हापूरातील निवासस्थानावर धाड टाकत उद्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. तत्पूर्वी ठाकरे …
Read More »मोदींच्या ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सला फक्त विरोधी पक्षच दिसतो, ‘अदानी’ दिसत नाही का? ‘अदानी’ महाघोटाळ्याविरोधात सोमवारी १३ तारखेला राजभवनवर धडक मोर्चा व ‘राजभवन घेराव’!: नाना पटोले
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग मिळून गप्प बसले आहे परंतु …
Read More »धनंजय मुंडेंचे बहिण पंकजा मुंडेंना ओपन चँलेंज, मी एमआयडीसी आणली आता तुम्ही… मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही
राज्यातील मुंडे बंधू-भगिनीमधील वाद निवडणूकीच्या तोंडावर सातत्याने उफाळून येत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. तर कधी कधी आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावाही राज्यातील जनतेला पाह्यला मिळाला आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहिण भावातील संघर्ष पुन्हा एकदा पाह्यला …
Read More »आदेशाला २४ तास उलटत नाही तोच ईडीची पुन्हा हसन मुश्रीफांवर धाडः चौकशीला सोमवारी या दिड महिन्यात दुसऱ्यांदा ईडीची कारवाई
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार केली की ईडीची कारवाई होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांचीच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर २४ तास उलटण्याच्या आधीच ईडीने दिड महिन्यात दुसऱ्यांचा हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील …
Read More »देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, पोलीस पाटील यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक विधान परिषदेत बोलताना ६ हजार ५०० इतके मानधन करणार असल्याचे केले स्पष्ट
ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला …
Read More »
Marathi e-Batmya