Tag Archives: bjp

धर्मवीर की स्वराज्यरक्षक ? वादावर शरद पवारांचे महत्वपूर्ण विधान ठाण्यात जातो तेव्हा धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. दरम्यान स्वतः अजित पवार हे दोन दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा माध्यमांसमोर …

Read More »

संजय राऊत यांची टीका, टोळी गँगवारमध्ये किंवा पोलिस एनकाऊंटरमध्ये मारले जातात शिंदे गट एक टोळी असल्याने त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही

हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील राजकिय वातावरण काही काळ शांत राहिल असे वाटत असतानाच भाजपाने संभाजी महाराजांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकिय वातावरण गरम करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात आज शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आणखीनच भर घालत राजकिय वातावरण चांगलेच तापविले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे …

Read More »

सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना सवाल, मग यांना मारहाणीची भाषा कराल का? कंगना राणावत, केतकी चितळे, अमृता फडणवीस यांचे फोटो शेअर करत केला सवाल

मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद हीच्या चित्र-विचित्र फॅशनवरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतीच उर्फी हिच्यावर टीकेची झोड उठवत तीला थोबडविण्याची धमकी दिली. त्यास प्रत्युत्तर म्हणून उर्फी जावेद हीनेही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळात असताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या …

Read More »

अदानी विरोधात कर्मचारी संपावर तर अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज आज मध्यरात्रीपासून तीन दिवसीय संपाला सुरुवात

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच सध्या पश्चिम उपनगरापूरती मर्यादीत असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने मुंबई उपनगर वगळता इतरत्रही वीज वितरणाची परवानगी विद्युत नियामक आयोगाकडे मागितली आहे. या विरोधात वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आजपासून तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपकाळात वीजग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात खंड पडू …

Read More »

लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसह ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ किसन कथोरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, प्रदेश सचिव संदीप …

Read More »

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट, मोदींनी राणेंना दिली समज पीएला काढून टाका नाही तर मंत्रीपद काढून घेईन

भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकिय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. त्यातच आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेल्या पीएने अनेकांना गंडा घातल्याने त्या पीएला काढून टाकण्याची समज दिल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. त्या पीएला आधी हाकला नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून …

Read More »

अहमदनगराच्या नामांतराची तयारी सरकारकडून सुरू, आता जिल्हा विभाजनाचीही मागणी बाहेरच्या व्यक्तीच्या मागणीवरून नामांतर नको तर स्थानिकांच्या मागणीवरून करा

अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर असे करावे, ही मागणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यानुसार राज्य सरकारने महापालिकेकडून ठराव मागविला असतानाच आता नामांतरासोबतच जिल्ह्याच्या विभाजनचा मुद्दा पुन्हा पुढे आला. यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी परस्पर विरोधी मते व्यक्त केली. आमदार पडळकर …

Read More »

विनायक राऊत म्हणाले, नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा, सगळं सत्य समोर येईल रमेश गोवेकर, सत्यजित भिसे, बाळा यांच्या हत्या प्रकरणांचे सत्य समोर आणायचं असेल तर

राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा विरूद्ध शिवसेना आणि आता भाजपा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात एकमेकांच्या विरोधातील कुरघोड्या संपता संपत नाहीत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सतत झडत असतात. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, आता रमेश …

Read More »

मालेगांव स्फोटप्रकरणी न्यायालयाने प्रसाद पुरोहितांची याचिका फेटाळली लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरील गुन्हे रद्दबातल करण्यास नकार

२००८ साली मालेगांव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात लेफ्ट.कर्नल प्रसाद पुरोहित यांचा सहभाग असल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणि नंतर एनआयएने अटक केली. तसेच याप्रकरणी पुरोहित यांने बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना प्रशिक्षण दिल्याचा आणि अनेकांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती पुढे आली होती. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर प्रसाद पुरोहित यांना जामिन मिळाला. त्यानंतर आपल्यावरील आरोप …

Read More »

नार-पार-गिरणा योजनेच्या सर्व मान्यता दोन महिन्यात देण्याची कार्यवाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

“नार-पार-गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कडे पाठविण्यात आला असून येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळवून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »