मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपा …
Read More »शेलारांचे मलिकांना प्रत्युत्तर, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही त्या फोटोवरून शेलार आक्रमक
मुंबईः प्रतिनिधी नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा असल्याचे प्रत्युत्तर भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथआ अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …
Read More »भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहास आणि भविष्यही नाही के.सी. वेणुगोपाल, एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत सेवाग्राम येथील काँग्रेस प्रशिक्षण शिबिराचा समारोप संपन्न
सेवाग्राम: प्रतिनिधी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहास ही नाही आणि भविष्यही नाही. त्यामुळे ते इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच ते खोटी माहिती पसरवून स्वातंत्र्यांच्या इतिहासाचा आणि काँग्रेस नेत्यांची बदनामी करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी स्वातंत्र्याचा इतिहास आणि काँग्रेस …
Read More »मलिकांचा सवाल, रझा अकादमीच्या कार्यालयात आशिष शेलार काय करत होते? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी राज्यात हिंसाचार होण्याच्या आधी भाजपाचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून काय करत होते?, कोणाशी बैठक करत होते ? असा सवाल करत अमरावती येथील हिंसाचारासाठी मुंबईतील आमदाराने पैसे पाठविले असून त्यासाठी तेथील तरूणांना पैसे दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात …
Read More »राज्यातील हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा-भाजपा आ. नितेश राणे यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला आणि रझा अकादमी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा, अशा मागण्या भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केल्या. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »काँग्रेस जनतेच्या दरबारात महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे ‘जनजागरण अभियान’!: नाना पटोले
वर्धा- मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई गगणाला भिडली आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी, दुकानदार यांना भांडवलदारांचे गुलाम करुन मोदी सरकारने जगणे कठीण केले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देश २५ वर्षे मागे गेला असतानाही जनतेच्या हिताचे निर्णय …
Read More »प्रिय चेतन भगत, धर्मनिरपेक्षतता हा काही तितकासा वाईट नाही तर सुंदर शब्द आहे लेखन:स्वामिनाथन एस.अंकलेश्वरीया अय्यर
तु जे काही तुझ्या कॉलममध्ये लिहितोस ते मला आवडतं. परंतु तु नुकताच लिहिलेला “Hate smug liberals? But don’t hate secularism just because they like it” अर्थात ‘आत्मसंतुष्ट उदारमतवाद्यांच्या तिरस्कार? परंतु धर्मनिरपेक्षितेचा तिरस्कार करू नका कारण त्यांना ते फार आवडते’. उदारमतवादी लोक आत्मसंतुष्ट असण्याबाबत मला माहिती आहे. मात्र मला सर्वाधिक काळजी …
Read More »मविआला रोखण्यासाठी भाजपा ठरविणार या मुद्यांवर रणनीती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार असून भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांबाबत बैठकीत पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी दिली. केशव उपाध्ये म्हणाले …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, “अब हिंदू मार नहीं खाएगा” अमरावती हिंसाचारानंतर भाजपाची प्रतिक्रिया
पुणे: प्रतिनिधी त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे. पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडलं ती, हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अब हिंदू मार नहीं खाएगा, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. १९९३ च्या दंगलीत …
Read More »आशिष शेलारांनी ठाकरे सरकारला दिली रक्तपिपासूची उपमा रक्तपिपासू ठाकरे सरकारमुळेच एसटीच्या ४० कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या
मुंबई: प्रतिनिधी आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची आज भेट घेत ॲड आशिष शेलार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना साथ आणि समर्थन देत असल्याचे सांगत आणि सरकारला इशारा देत म्हणाले, की गुमान चर्चा करा, सोपा मार्ग काढा, सरळ विलनीकरण करा त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा. ४० जणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेलं हे सरकार …
Read More »
Marathi e-Batmya