मुंबईः प्रतिनिधी भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. भाजपा आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले. भाजपाने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. …
Read More »भाजपा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगली राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या आशीर्वादाने झाल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीच्या सूत्रधारांना जेरबंद करण्याऐवजी भाजपा तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खटले दाखल केले जात आहेत. प्रशासनाने भाजपा कार्यकर्त्याना खोटया नाट्या गुन्ह्याखाली अडकवणे थांबवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव अवमान याचिकेप्रकरणी मजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाविरोधात न्यायालयात याचिका दाखल
मुंबईः प्रतिनिधी भाजपाच्या नेत्याने दाखल केलेल्या अवमान याचिकेप्रकरणी सुणावनीसाठी राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा निर्णय गिरगांव मॅजिस्ट्रेट न्यायालयाने दिल्याने सदरच्या निर्णयाच्या विरोधात आणि दाखल करण्यात करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. भाजपा सदस्य महेश हुकुमचंद श्रीश्रीमल यांनी …
Read More »मलाना क्रिम घेवून बोलल्याने बापूंचे विचार संपतील असा समज असेल तर चूक महात्मा गांधी ही व्यक्ती नाही विचार आहेत आणि हा विचार जगाने स्वीकारलाय-नवाब मलिक
मुंबईः प्रतिनिधी अशी एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही असे राष्ट्रवादी …
Read More »हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घ्या भाजपाच्या आव्हानाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे प्रतिआव्हान
मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करुन पुन्हा निवडणुका घ्या या भारतीय जनता पक्षाच्या आव्हानाला काँग्रेसनेही प्रतिआव्हान दिले आहे. भाजपामध्ये हिम्मत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे प्रतिआव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले …
Read More »प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतोः महाराष्ट्रात “काय द्याचं” बोला राज्य भाजपाच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत आघाडी सरकारवर घणाघात
मुंबई: प्रतिनिधी आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली …
Read More »लाल गहू मागणारा भारत आज मोदींमुळे साठ सत्तर देशांना कोरोना लस निर्यात करतोय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसवर उपरोधिक टीका
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपा …
Read More »शेलारांचे मलिकांना प्रत्युत्तर, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही त्या फोटोवरून शेलार आक्रमक
मुंबईः प्रतिनिधी नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा असल्याचे प्रत्युत्तर भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथआ अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …
Read More »भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहास आणि भविष्यही नाही के.सी. वेणुगोपाल, एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत सेवाग्राम येथील काँग्रेस प्रशिक्षण शिबिराचा समारोप संपन्न
सेवाग्राम: प्रतिनिधी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहास ही नाही आणि भविष्यही नाही. त्यामुळे ते इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच ते खोटी माहिती पसरवून स्वातंत्र्यांच्या इतिहासाचा आणि काँग्रेस नेत्यांची बदनामी करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी स्वातंत्र्याचा इतिहास आणि काँग्रेस …
Read More »मलिकांचा सवाल, रझा अकादमीच्या कार्यालयात आशिष शेलार काय करत होते? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी राज्यात हिंसाचार होण्याच्या आधी भाजपाचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून काय करत होते?, कोणाशी बैठक करत होते ? असा सवाल करत अमरावती येथील हिंसाचारासाठी मुंबईतील आमदाराने पैसे पाठविले असून त्यासाठी तेथील तरूणांना पैसे दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात …
Read More »
Marathi e-Batmya