Tag Archives: congress

विजय वडेट्टीवार यांचा इशारा, ओबीसींच्या जनगणेसाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट,राज्य सरकारने यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवून कृती आराखडा बनवा

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा आणि आरक्षणाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या मागणीमुळे केंद्र सरकारला ओबीसी जनगणनेबाबत भूमिका घ्यावी लागली, मात्र जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यातील नागरिकांचा माहितीचा अधिकारच काढून टाकण्याचे प्रयत्न राजपत्रातील बेकायदेशीर तरतुदी रद्द करा

सरकारी कारभारात पारदर्शकता असावी आणि त्याचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी काँग्रेसप्रणित युपीए सरकारने जनतेला ऐतिहासिक असा माहिती अधिकार कायद्याचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार दिला आहे, पण सध्याच्या सरकारने मात्र नागरिकांना माहितीपासून दूर ठेवण्यासाठी अडथळ्यांची भिंत उभी केली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात गंभीर कायदेशीर त्रुटी व मूळ कायद्याशी …

Read More »

खासदार वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे लेखी हमीची मागणी धारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी

धारावीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सध्या सुरू असून, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ इमारती उभारण्यापुरता मर्यादित नसून धारावीतील नागरिकांच्या सर्वांगीण सामाजिक, आर्थिक विकासाशी निगडित आहे. त्यामुळे धारावीतील रहिवासी, त्यांचे रोजगार, उद्योगधंदे आणि स्थानिक सामाजिक व्यवस्था (इकोसिस्टम) यांना या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी ठेवणे अत्यावश्यक आहे. या सर्व  मुद्द्यांचा विचार करून एक विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस …

Read More »

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

वर्षा गायकवाड

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम राबविताना पक्षपातीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. एसआयआर (SIR) मोहिम राबविताना काही बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात पुढील तीन-चार वर्षात कोणत्याच निवडणुका नाहीत, त्यामुळे मुंबईत एसआयआर (SIR) मोहिम राबविताना घाईघाईत न करता त्यासाठी वेळ द्यावा …

Read More »

अनंत गाडगीळ यांचा सवाल, आचारसंहितेत धोरणात्मक निर्णय जाहीर कसे केले ?

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांची ‘कर्जमाफी’ व नाशिकच्या कुंभमेळाव्यानिमित्त तपोवनासाठी आर्थिक तरतूद या गोष्टींना आमचा आक्षेप नाही. परंतु, महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या निमित्तानं आचारसंहिता लागू असताना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती नेमक्या निवडणूक काळातच कशा जाहीर केल्या जातात, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी विचारला आहे. अनंत गाडगीळ पुढे …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, भाजपाकडून संविधानावरील हल्ला अव्यातपणे सुरु इंडिया ब्लॉकच्या बैठकीत म्हणाले सर्व विरोधी पक्षांनी एकजूटी राहणे आवश्यक असल्याचे आवाहन

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकशाही संस्थांना कमजोर करत असल्याचा आरोप केला. तसेच “संविधानावरील हल्ला अव्याहतपणे सुरू आहे” आणि तपास यंत्रणांचा “राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी सातत्याने वापर केला जात,” असल्याचा आरोपही केला. इंडिया ब्लॉकच्या बैठकीत मतदार याद्यांची विशेष सखोल उजळणी (SIR), परीक्षेचे पेपरफुटी, कथित …

Read More »

घरगुती गॅसच्या किंमतीत २९ रुपयांनी वाढ तीन महिन्यातील ही दुसरी दरवाढ

भारतात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत आजपासून प्रति सिलिंडर २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर वाढलेले ऊर्जेचे दर पेलणे सरकारी तेल कंपन्यांना कठीण जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीमुळे दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, दारू दुर्घटनासंदर्भातील मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झाले? मालवणी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणारे गृहविभागाचे निर्देश दुर्लक्षित, राज्य सरकार सर्व विभागात अपयशी

पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारुमुळे २२ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कारवाईचे नाटक करत २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली,पण ही कारवाई समाधानकारक नाही. २०१५ साली मालवणीमध्ये विषारी दारुमुळे १०६ जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, या समितीच्या शिफारशींवर सरकार व प्रशासनातील …

Read More »

टीव्हीजेला काँग्रेसने पाठिंबा दिल्याप्रकरणी द्रमुक इंडिया आघाडीपासून लांब ८ जूनच्या बैठकीपासून लांब राहण्याचा निर्णय

एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्षाने ८ जून रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित इंडिया ब्लॉक बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, कारण विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये झालेल्या नाट्यमय राजकीय फेरबदलामुळे काँग्रेससोबतच्या संबंधांमध्ये निर्माण झालेला दुरावा आता अधिकच वाढला आहे. द्रमुकचा दीर्घकाळचा मित्रपक्ष असूनही, तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी अभिनेता विजयच्या टीव्हीकेला …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून विरोधी उमेदवारांना कोट्यवधींच्या ऑफर्स सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली; भाजपाला इलेक्शन नाही तर नॉमिनेशन सिस्टिम आणायचीय

भारतीय जनता पक्षाची सर्वत्र सत्ता असतानाही आणखी सत्ता हवी या सत्तेच्या हव्यासापोटी ते लोकशाही मुल्ये पायदळी तुडवत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपाने नैतिकता गुंडाळून सर्व हातखंडे वापरले आहेत. भाजपाला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टिम’ …

Read More »